शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

माहूर शहरासह ४० गावांत पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:42 IST

माहूर शहरासह तालुक्यातील ४० गावांची जलवाहिनी म्हणून पैनगंगा नदीच्या पाण्याचे नागरिक जलपूजन करीत असतात़ त्याच पैनगंगा नदीचे पात्र नोव्हेंबर महिन्यातच कोरडेठाक पडल्याने शहरासह खेडेगावात भीषण जलसंकट उभे टाकले आहे़

ठळक मुद्देपैनगंगा नदीपात्र कोरडे बंधाऱ्यात साठवलेले पाणी नदीपात्रात सोडण्यास नकार, नळयोजना वांझोटी

श्रीक्षेत्र माहूर : माहूर शहरासह तालुक्यातील ४० गावांची जलवाहिनी म्हणून पैनगंगा नदीच्या पाण्याचे नागरिक जलपूजन करीत असतात़ त्याच पैनगंगा नदीचे पात्र नोव्हेंबर महिन्यातच कोरडेठाक पडल्याने शहरासह खेडेगावात भीषण जलसंकट उभे टाकले आहे़ नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पैनगंगा नदी पात्रावरील बंधा-यात साठवलेले पाणी पात्रात सोडण्याची मागणी होत आहे़श्हरासाठी नळयोजना बनविण्यात आली़ परंतु पाणीच नसल्याने ती वांझोटी ठरत आहे़ माहूर शहरासह अनेक गावांची नळयोजना पैनगंगा नदी पात्रावरून बनविण्यात आल्या़ दुष्काळी परिस्थितीत बंधा-यातील पाणी नदीपात्रात सोडले जाईल या आश्ेवरच आहेत़ परंतु तीन बंधा-यापैकी एकाही बंधा-याचे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत नसल्याने हे बंधारे काय कामाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे़ कामधंदे सोडून प्रशासनास जागे करण्यासाठी वारंवार आंदोलनचे करायचे काय किंवा राजकीय हेव्यादाव्यापोटी पदाधिका-यांना बदनाम करण्यासाठी मोर्चे तक्रारी करून वेळ मारून न्यायची, अशी चर्चा तालुकाभर होत आहे़ या भानगडीत मात्र तालुक्यातील नागरिकांना विनाकारण वेळ व पैसा खर्ची घालावा लागत असून चिमटा धरणाच्या भागनडीत मदनापूर व उनकेश्वर येथील दोन बंधा-याचे काम रोखण्यात आल्याने नदीपात्र कोरडे पडले आहे़नदीपात्रातील पाणी संपल्याने उद्भव विहिरीजवळ नदीपात्रात जेसीबीद्वारे मोठा खड्डा करण्यात आला व दोन बोअर पाडण्यात आले़ परंतु येथेही पाणी न लागल्याने नगर पंचायतच्या प्रयत्नांच्या पदरी निराशाच पडली़ नळयोजना परिपूर्ण असूनही पाणीच नसल्याने दररोज लागणारे ३० लक्ष लिटर पाणी अणायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे़पर्यायी व्यवस्था म्हणून शहराला लागून असलेले भोजंता तलाव खांडाखोरी तलाव गुंडवळ तलाव या तलावातून पाणी घेण्याचे ठरविण्यात आले़ नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मुख्याधिकारी विद्या कदम, लेखापाल तथा कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी यांच्यासह सर्व नगरसेवकांनी देवदेवेश्वर संस्थानचे महंत मधुकर बाबा शास्त्री कविश्वर यांना विनंती केल्याने भोजंता तलावातून माहूर शहरास ८ दिवसाआड पाणीपुरवठा होत असून सर्व तलावात २ महिने पुरेल इतका पाणीसाठा असून पैनगंगा नदीपात्रात हिंगणी, दिघडी बंधा-याचे पाणी न सोडल्यास शहरासह तालुक्यात दुष्काळ धूमाकूळ घालेल यात शंका नाही़

  • नदीपात्रात असलेल्या कोल्हापुरी बंधा-यात सात ते आठ फुट पाणी साचते़ दररोज ३० लाख लिटर पाणी या बंधा-यातून घेतल्यास महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा या बंधा-यात साचल्याने बंधा-याची २० फुट उंची वाढविणे किंवा हिंगणी-दिगडी बंधाºयावरून या बंधा-यापर्यंत पाईपलाईन टाकणे या दोन पर्यायाचे वरिष्ठांकडे दाखल करण्यात आलेले प्रस्ताव धूळखात पडलेले असून तालुक्यात व माहूर शहरात विरोधी पक्षांची सत्ता असल्याने एकही काम वेळेवर होत नसल्याने चढाओढीच्या राजकारणात अधिकारीही सत्ताधा-यांची बाजू घेत असल्याने तालुक्यातील शेकडो विकासकामे रेंगाळल्याने सामान्य माणूस पाण्यासह इतर सुविधांपासून वंचित राहत आहे़
  • नगर पंचायत माहूरकडून ल़पा़ विभागाकडे नदीपात्रातील बंधा-यातील पाणी आरक्षण करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला़ परंतु नदीपात्रात खुले पाणी सोडता येणार नसल्याचे पत्र देवून शासनाकडे नागरिकांनी पाणी मागू नये असे पत्र देत मागणीचे दरवाजेच बंद करण्यात आले आहेत़

 

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाईPainganga Sancturyपैनगंगा अभयारण्य