शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

माहूर शहरासह ४० गावांत पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:42 IST

माहूर शहरासह तालुक्यातील ४० गावांची जलवाहिनी म्हणून पैनगंगा नदीच्या पाण्याचे नागरिक जलपूजन करीत असतात़ त्याच पैनगंगा नदीचे पात्र नोव्हेंबर महिन्यातच कोरडेठाक पडल्याने शहरासह खेडेगावात भीषण जलसंकट उभे टाकले आहे़

ठळक मुद्देपैनगंगा नदीपात्र कोरडे बंधाऱ्यात साठवलेले पाणी नदीपात्रात सोडण्यास नकार, नळयोजना वांझोटी

श्रीक्षेत्र माहूर : माहूर शहरासह तालुक्यातील ४० गावांची जलवाहिनी म्हणून पैनगंगा नदीच्या पाण्याचे नागरिक जलपूजन करीत असतात़ त्याच पैनगंगा नदीचे पात्र नोव्हेंबर महिन्यातच कोरडेठाक पडल्याने शहरासह खेडेगावात भीषण जलसंकट उभे टाकले आहे़ नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पैनगंगा नदी पात्रावरील बंधा-यात साठवलेले पाणी पात्रात सोडण्याची मागणी होत आहे़श्हरासाठी नळयोजना बनविण्यात आली़ परंतु पाणीच नसल्याने ती वांझोटी ठरत आहे़ माहूर शहरासह अनेक गावांची नळयोजना पैनगंगा नदी पात्रावरून बनविण्यात आल्या़ दुष्काळी परिस्थितीत बंधा-यातील पाणी नदीपात्रात सोडले जाईल या आश्ेवरच आहेत़ परंतु तीन बंधा-यापैकी एकाही बंधा-याचे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत नसल्याने हे बंधारे काय कामाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे़ कामधंदे सोडून प्रशासनास जागे करण्यासाठी वारंवार आंदोलनचे करायचे काय किंवा राजकीय हेव्यादाव्यापोटी पदाधिका-यांना बदनाम करण्यासाठी मोर्चे तक्रारी करून वेळ मारून न्यायची, अशी चर्चा तालुकाभर होत आहे़ या भानगडीत मात्र तालुक्यातील नागरिकांना विनाकारण वेळ व पैसा खर्ची घालावा लागत असून चिमटा धरणाच्या भागनडीत मदनापूर व उनकेश्वर येथील दोन बंधा-याचे काम रोखण्यात आल्याने नदीपात्र कोरडे पडले आहे़नदीपात्रातील पाणी संपल्याने उद्भव विहिरीजवळ नदीपात्रात जेसीबीद्वारे मोठा खड्डा करण्यात आला व दोन बोअर पाडण्यात आले़ परंतु येथेही पाणी न लागल्याने नगर पंचायतच्या प्रयत्नांच्या पदरी निराशाच पडली़ नळयोजना परिपूर्ण असूनही पाणीच नसल्याने दररोज लागणारे ३० लक्ष लिटर पाणी अणायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे़पर्यायी व्यवस्था म्हणून शहराला लागून असलेले भोजंता तलाव खांडाखोरी तलाव गुंडवळ तलाव या तलावातून पाणी घेण्याचे ठरविण्यात आले़ नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मुख्याधिकारी विद्या कदम, लेखापाल तथा कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी यांच्यासह सर्व नगरसेवकांनी देवदेवेश्वर संस्थानचे महंत मधुकर बाबा शास्त्री कविश्वर यांना विनंती केल्याने भोजंता तलावातून माहूर शहरास ८ दिवसाआड पाणीपुरवठा होत असून सर्व तलावात २ महिने पुरेल इतका पाणीसाठा असून पैनगंगा नदीपात्रात हिंगणी, दिघडी बंधा-याचे पाणी न सोडल्यास शहरासह तालुक्यात दुष्काळ धूमाकूळ घालेल यात शंका नाही़

  • नदीपात्रात असलेल्या कोल्हापुरी बंधा-यात सात ते आठ फुट पाणी साचते़ दररोज ३० लाख लिटर पाणी या बंधा-यातून घेतल्यास महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा या बंधा-यात साचल्याने बंधा-याची २० फुट उंची वाढविणे किंवा हिंगणी-दिगडी बंधाºयावरून या बंधा-यापर्यंत पाईपलाईन टाकणे या दोन पर्यायाचे वरिष्ठांकडे दाखल करण्यात आलेले प्रस्ताव धूळखात पडलेले असून तालुक्यात व माहूर शहरात विरोधी पक्षांची सत्ता असल्याने एकही काम वेळेवर होत नसल्याने चढाओढीच्या राजकारणात अधिकारीही सत्ताधा-यांची बाजू घेत असल्याने तालुक्यातील शेकडो विकासकामे रेंगाळल्याने सामान्य माणूस पाण्यासह इतर सुविधांपासून वंचित राहत आहे़
  • नगर पंचायत माहूरकडून ल़पा़ विभागाकडे नदीपात्रातील बंधा-यातील पाणी आरक्षण करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला़ परंतु नदीपात्रात खुले पाणी सोडता येणार नसल्याचे पत्र देवून शासनाकडे नागरिकांनी पाणी मागू नये असे पत्र देत मागणीचे दरवाजेच बंद करण्यात आले आहेत़

 

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाईPainganga Sancturyपैनगंगा अभयारण्य