शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

दीडशे सिंचन विहिरी खोदूनही पाणीप्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:11 AM

ऐन हिवाळ्यातच पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीही वीस गावांची तहान टँकरवरच भागविणार की काय? असे चित्र आहे.

ठळक मुद्देहदगाव तालुका वीस गावांतील तहान यंदाही टँकरवरच भागणार

हदगाव : जानेवारी, मार्च, एप्रिल व जून या कालावधीमध्ये १५० नवीन सिंचन विहिरी खोदल्या. परंतु, अद्यापही त्याची कामे पूर्ण झाली नाहीत. यामुळे ग्रामस्थांना ऐन हिवाळ्यातच पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीही वीस गावांची तहान टँकरवरच भागविणार की काय? असे चित्र आहे.तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा (९५० मिमी) ६५० मिमी पाऊस झाला. सुरुवातीला धो-धो पाऊस झाल्याने तो जमिनीत मुरण्याऐवजी वाहून गेला. तालुक्यात दोन नद्या व २८ तलाव असूनही पाण्याची समस्या काही भागात गंभीरच आहे. मनाठा, तामसा, तळणी, निवघा या सर्कलमधील २० गावांंना टँकरने पाणीपुरवठा सुरु होता. यावर्षी तेच चित्र आहे. पळसा व मनाठा या दोन गावांसाठी मुख्यमंत्री पेयजल योजना मंजूर झाली. कामेही सुरु केले. परंतु या उन्हाळ्यात त्या योजनेचे पाणी मिळण्याची सूतराम शक्यता नाही.जलयुक्त शिवार अभियानात ५०-७० गावांमध्ये पाणी आडवा, पाणी जिरवा प्रयोग झाला. परंतु पाणीप्रश्न ‘जैसे थे’ आहे. दोन्ही नद्यांचे पाणी कुठेही न थांबता वाहून जात असल्याने नदीकाठावरील गावांतही पाणीटंचाई आहे.प्रत्येक कुटुंबात खाजगी बोअर झाल्यामुळे पाणीपातळी खोल गेली आहे. दोनशे फूट खोलीपर्यंत बोअर घेण्याचा शासनाचा नियम असला तरी शेतात व घरी पाचशे ते सातशे फुटांपर्यंत बोअर घेतले जातात. शंभर मीटर अंतरापर्यत दुसरा बोअर घेता येत नाही. परंतु, घराघरांमध्ये बोअर झाल्यामुळे जमिनीची चाळणी होऊन पाणीपातळी खालावली आहे.दरवर्षी पाणीटंचाईच्या बैठका होतात.शाश्वत पाणी आणण्याचे आश्वासन हवेतच विरले की काय ? असा प्रश्न पडला आहे. तीन-चार वर्षांपासून हालचाली बंद आहेत. सध्या बरडशेवाळा गावात पाण्याची तीव्रटंचाई सुरु आहे. एक किलोमीटर अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. कुठे नियोजन नसल्यामुळे पाणीटंचाई आहे तर कुठे पाणीपुरवठा योजनेची कामे रखडल्यामुळे पाणीटंचाई आहे. १२ डिसेंबरला पाणीटंचाई निवारणार्थ आराखड्यावर बैठक आहे. या बैठकीमध्ये मागील कामाचा आढावा घेतला तर परिस्थिती लक्षात येईल.

  • येत्या एक-दोन महिन्यांत तामसा, मनाठा, वडगाव, तळणी, पेवा, ठाकरवाडी, कनकेवाडी, सावरगाव, उमरी, कोंढूर, दिग्रस, निवघा, साप्ती आदी गावात पाणीटंचाई होऊ शकते. शाश्वत पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी तहानलेल्या गावांची मागणी आहे.
  • जलयुक्त शिवार अभियानात ५०-७० गावांमध्ये पाणी आडवा, पाणी जिरवा प्रयोग झाला. परंतु पाणीप्रश्न ‘जैसे थे’ आहे. दोन्ही नद्यांचे पाणी कुठेही न थांबता वाहून जात असल्याने नदीकाठावरील गावांतही पाणीटंचाई आहे.
  • प्रत्येक कुटुंबात खाजगी बोअर झाल्यामुळे पाणीपातळी खोल गेली आहे. दोनशे फूट खोलीपर्यंत बोअर घेण्याचा नियम असला तरी सातशे फुटांपर्यंत बोअर घेतले जातात.
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई