शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

उमरी शहरात तिसऱ्या दिवशीही निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:18 IST

चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेला उमरी शहराचा वीजपुरवठा सलग तिस-या दिवशीही चालू झाला नाही. त्यामुळे ६ जून रोजी शहरात पाच टँकरने पाणी पुरवठ्याची सोय नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आली होती.

ठळक मुद्देवीस वर्षांत पहिल्यांदाच टँकरने पाणीपुरवठा पाण्यासाठी नागरिकांची गर्दीवादळवा-यामुळे जनजीवन विस्कळीत

उमरी: चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेला उमरी शहराचा वीजपुरवठा सलग तिस-या दिवशीही चालू झाला नाही. त्यामुळे ६ जून रोजी शहरात पाच टँकरने पाणी पुरवठ्याची सोय नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आली होती.मंगळवारी संध्याकाळी झालेल्या चक्रीवादळाने सर्वत्र दाणादाण उडाली होती. शहरात अनेक ठिकाणी विजेचे खांब भुईसपाट झाले. रानोमाळ तारा तुटून पडल्या. हे सर्व खांब उभे करुन वीजपुरवठा सुरळीत करणे हे महावितरण समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे अजून दोन-तीन दिवस तरी शहराचा वीजपुरवठा नियमित होणे शक्य नाही. वीज पुरवठा नसल्याने याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला. शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद पडला त्यामुळे गुरुवारी सकाळपासून नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. विंधन विहिरीतून जनरेटरद्वारे पाण्याचा उपसा करून टँकर भरले जात आहेत. या पाच टँकरद्वारे शहरातील विविध गल्लीबोळातून पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था गुरुवारी सकाळपासून चालू झाली.पाण्यासाठी लोकांनी मोठमोठ्या रांगा लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. गेल्या वीस वर्षात पहिल्यांदाच उमरी शहरात अशा प्रकारे पाणीपुरवठा करणारे टँकर फिरत असल्याचे दिसून येत आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे हे सर्व पाणीपुरवठ्याच्या या यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत.शहराची व्याप्ती लक्षात घेता ही यंत्रणा अत्यंत तोकडी पडत आहे. मात्र आहे. त्या परिस्थितीत लोकांना टँकरचे पाणी घेतल्याशिवाय कसलाच पर्याय नाही. विजेची सर्व उपकरणे बंद पडल्याने थंड पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. भोकर शहरातून उमरीत थंड पाण्याचे कॅन विक्रीसाठी दाखल झाले. पन्नास रुपयाला एक याप्रमाणे या कॅनची हातोहात विक्री झाली. गुरुवारी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत उमरी शहरातील काही भागात विद्युत पुरवठा चालू होईल, अशी माहिती महावितरणचे अभियंता सुनील कासनाळे यांनी दिली. ग्रामीण भागातील जवळपास पन्नास ते साठ खेड्यामध्ये मात्र विजेची समस्या गंभीर बनली आहे.तारा तुटून पडल्यामंगळवारी संध्याकाळी झालेल्या चक्रीवादळाने सर्वत्र दाणादाण उडाली होती. शहरात अनेक ठिकाणी विजेचे खांब भुईसपाट झाले. रानोमाळ तारा तुटून पडल्या. हे सर्व खांब उभे करुन वीजपुरवठा सुरळीत करणे हे महावितरण समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. वीजपुरवठा नियमित होणे गरजेचे आहे़ 

उमरी शहरासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे मात्र चक्रीवादळासारख्या नैसर्गिक संकटात विजेअभावी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. चक्रीवादळाने उमरी शहरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच विजेअभावी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. मात्र आम्ही नागरिकांच्या पाठीशी आहोत-अनुराधा सदानंद खांडरे, नगराध्यक्ष उमरी

 

शहराला पाणीपुरवठा होणा-या गोरठा येथील न.पा.च्या विहिरीवर जनरेटरद्वारे पाण्याचा उपसा करून गुरुवारी सायंकाळपर्यंत शहराला पाणीपुरवठ्याची सोय होईल. विद्युत पुरवठा सुरळीत होताच सर्वत्र पाणी पुरवठा चालू होईल. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.- काकासाहेब डोईफोडे, मुख्याधिकारी , नगरपरिषद उमरी.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईRainपाऊसelectricityवीज