शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

उमरी शहरात तिसऱ्या दिवशीही निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:18 IST

चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेला उमरी शहराचा वीजपुरवठा सलग तिस-या दिवशीही चालू झाला नाही. त्यामुळे ६ जून रोजी शहरात पाच टँकरने पाणी पुरवठ्याची सोय नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आली होती.

ठळक मुद्देवीस वर्षांत पहिल्यांदाच टँकरने पाणीपुरवठा पाण्यासाठी नागरिकांची गर्दीवादळवा-यामुळे जनजीवन विस्कळीत

उमरी: चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेला उमरी शहराचा वीजपुरवठा सलग तिस-या दिवशीही चालू झाला नाही. त्यामुळे ६ जून रोजी शहरात पाच टँकरने पाणी पुरवठ्याची सोय नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आली होती.मंगळवारी संध्याकाळी झालेल्या चक्रीवादळाने सर्वत्र दाणादाण उडाली होती. शहरात अनेक ठिकाणी विजेचे खांब भुईसपाट झाले. रानोमाळ तारा तुटून पडल्या. हे सर्व खांब उभे करुन वीजपुरवठा सुरळीत करणे हे महावितरण समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे अजून दोन-तीन दिवस तरी शहराचा वीजपुरवठा नियमित होणे शक्य नाही. वीज पुरवठा नसल्याने याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला. शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद पडला त्यामुळे गुरुवारी सकाळपासून नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. विंधन विहिरीतून जनरेटरद्वारे पाण्याचा उपसा करून टँकर भरले जात आहेत. या पाच टँकरद्वारे शहरातील विविध गल्लीबोळातून पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था गुरुवारी सकाळपासून चालू झाली.पाण्यासाठी लोकांनी मोठमोठ्या रांगा लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. गेल्या वीस वर्षात पहिल्यांदाच उमरी शहरात अशा प्रकारे पाणीपुरवठा करणारे टँकर फिरत असल्याचे दिसून येत आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे हे सर्व पाणीपुरवठ्याच्या या यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत.शहराची व्याप्ती लक्षात घेता ही यंत्रणा अत्यंत तोकडी पडत आहे. मात्र आहे. त्या परिस्थितीत लोकांना टँकरचे पाणी घेतल्याशिवाय कसलाच पर्याय नाही. विजेची सर्व उपकरणे बंद पडल्याने थंड पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. भोकर शहरातून उमरीत थंड पाण्याचे कॅन विक्रीसाठी दाखल झाले. पन्नास रुपयाला एक याप्रमाणे या कॅनची हातोहात विक्री झाली. गुरुवारी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत उमरी शहरातील काही भागात विद्युत पुरवठा चालू होईल, अशी माहिती महावितरणचे अभियंता सुनील कासनाळे यांनी दिली. ग्रामीण भागातील जवळपास पन्नास ते साठ खेड्यामध्ये मात्र विजेची समस्या गंभीर बनली आहे.तारा तुटून पडल्यामंगळवारी संध्याकाळी झालेल्या चक्रीवादळाने सर्वत्र दाणादाण उडाली होती. शहरात अनेक ठिकाणी विजेचे खांब भुईसपाट झाले. रानोमाळ तारा तुटून पडल्या. हे सर्व खांब उभे करुन वीजपुरवठा सुरळीत करणे हे महावितरण समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. वीजपुरवठा नियमित होणे गरजेचे आहे़ 

उमरी शहरासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे मात्र चक्रीवादळासारख्या नैसर्गिक संकटात विजेअभावी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. चक्रीवादळाने उमरी शहरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच विजेअभावी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. मात्र आम्ही नागरिकांच्या पाठीशी आहोत-अनुराधा सदानंद खांडरे, नगराध्यक्ष उमरी

 

शहराला पाणीपुरवठा होणा-या गोरठा येथील न.पा.च्या विहिरीवर जनरेटरद्वारे पाण्याचा उपसा करून गुरुवारी सायंकाळपर्यंत शहराला पाणीपुरवठ्याची सोय होईल. विद्युत पुरवठा सुरळीत होताच सर्वत्र पाणी पुरवठा चालू होईल. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.- काकासाहेब डोईफोडे, मुख्याधिकारी , नगरपरिषद उमरी.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईRainपाऊसelectricityवीज