शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

वॉटर कप २०१९ स्पर्धेत भोकर, लोह्याचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:50 IST

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा करण्यात आली असून या स्पर्धेत जिल्ह्यातील भोकर व लोहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे़

ठळक मुद्दे८ एप्रिल ते २२ मे दरम्यान होणार स्पर्धा

राजेश वाघमारे ।भोकर : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा करण्यात आली असून या स्पर्धेत जिल्ह्यातील भोकर व लोहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे़मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्यातील तालुक्यांची निवड करण्यात आली़ २४ जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांमध्ये यावर्षी ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ३१ जानेवारी २०१९ पर्यंत फॉर्म भरता येणार आहे.राज्याच्या जलसमृद्धीचा प्रवास अखंड सुरू राहण्यासाठी पाणी फाऊंडेशनने निवडलेल्या तालुक्यांतील सर्व गावांना आमंत्रण देण्यात आले आहे. यासंदर्भात मुंबई येथे आयोजित केलेल्या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पानी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, नामदेव ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी गावांची निवड केली़८ एप्रिल ते २२ मे २०१९ दरम्यान ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या विजेत्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रूपये ५० लाख रूपये आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या गावाला १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत विजयी होणा-या गावांना देण्यात येणा-या एकूण बक्षिसांची रक्कम ९.१५ कोटी राहणार आहे. स्पर्धेतंर्गत पानी फाउंडेशनच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.यावर्षी परत पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा २०१९ साठी तालुक्याची निवड करण्यात आली असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी अनेक गावे सरसावली आहेत. यासाठी जानेवारीअखेर ते मार्चमध्ये पाणी बचतीच्या तंत्राचे प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रत्यक्ष स्पर्धेला ८ एप्रिलपासून सुरुवात होवून २२ मे रोजी स्पर्धा संपणार आहे. दरम्यान, तालुका समन्वय सुगंध पळसे व गजानन वाहूळकर यांच्यासह महसूल, कृषी, वनविभाग आणि पंचायत समिती स्तरावर प्रशासन सहकार्य करणार आहे.या स्पर्धेत तालुक्यातील हाडोळी गावाने प्रथम क्रमांक मिळवून पानी फाऊंडेशनचे १० लाख व महाराष्ट्र शासनाचे ५ लाख असे एकूण १५ लाख रुपयांचे बक्षीस पटकावले. द्वितीय क्रमांकाच्या दिवशी खु.गावाला महाराष्ट्र शासनाचे ५ लाख मिळाले तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या वाकद गावाला ३ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते.४५ दिवसांचा कालावधी४५ दिवसांच्या या कालावधीतील स्पर्धेत 'श्रमदान', पाणलोट उपचारांचे नियोजन आणि निर्मिती यांचा समावेश राहील.ज्यामुळे जमिनीतील पाणीपातळी वाढण्यास मदत होईल. निवडलेल्या तालुक्यांतील प्रत्येक महसुली गाव या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र आहे. पहिल्या विजेत्या तीन गावांना ७५ लाख, ५० लाख व ४० लाख रूपये पारितोषिक देण्यात येणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा