शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

वॉटर कप २०१९ स्पर्धेत भोकर, लोह्याचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:50 IST

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा करण्यात आली असून या स्पर्धेत जिल्ह्यातील भोकर व लोहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे़

ठळक मुद्दे८ एप्रिल ते २२ मे दरम्यान होणार स्पर्धा

राजेश वाघमारे ।भोकर : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा करण्यात आली असून या स्पर्धेत जिल्ह्यातील भोकर व लोहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे़मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्यातील तालुक्यांची निवड करण्यात आली़ २४ जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांमध्ये यावर्षी ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ३१ जानेवारी २०१९ पर्यंत फॉर्म भरता येणार आहे.राज्याच्या जलसमृद्धीचा प्रवास अखंड सुरू राहण्यासाठी पाणी फाऊंडेशनने निवडलेल्या तालुक्यांतील सर्व गावांना आमंत्रण देण्यात आले आहे. यासंदर्भात मुंबई येथे आयोजित केलेल्या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पानी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, नामदेव ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी गावांची निवड केली़८ एप्रिल ते २२ मे २०१९ दरम्यान ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या विजेत्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रूपये ५० लाख रूपये आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या गावाला १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत विजयी होणा-या गावांना देण्यात येणा-या एकूण बक्षिसांची रक्कम ९.१५ कोटी राहणार आहे. स्पर्धेतंर्गत पानी फाउंडेशनच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.यावर्षी परत पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा २०१९ साठी तालुक्याची निवड करण्यात आली असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी अनेक गावे सरसावली आहेत. यासाठी जानेवारीअखेर ते मार्चमध्ये पाणी बचतीच्या तंत्राचे प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रत्यक्ष स्पर्धेला ८ एप्रिलपासून सुरुवात होवून २२ मे रोजी स्पर्धा संपणार आहे. दरम्यान, तालुका समन्वय सुगंध पळसे व गजानन वाहूळकर यांच्यासह महसूल, कृषी, वनविभाग आणि पंचायत समिती स्तरावर प्रशासन सहकार्य करणार आहे.या स्पर्धेत तालुक्यातील हाडोळी गावाने प्रथम क्रमांक मिळवून पानी फाऊंडेशनचे १० लाख व महाराष्ट्र शासनाचे ५ लाख असे एकूण १५ लाख रुपयांचे बक्षीस पटकावले. द्वितीय क्रमांकाच्या दिवशी खु.गावाला महाराष्ट्र शासनाचे ५ लाख मिळाले तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या वाकद गावाला ३ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते.४५ दिवसांचा कालावधी४५ दिवसांच्या या कालावधीतील स्पर्धेत 'श्रमदान', पाणलोट उपचारांचे नियोजन आणि निर्मिती यांचा समावेश राहील.ज्यामुळे जमिनीतील पाणीपातळी वाढण्यास मदत होईल. निवडलेल्या तालुक्यांतील प्रत्येक महसुली गाव या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र आहे. पहिल्या विजेत्या तीन गावांना ७५ लाख, ५० लाख व ४० लाख रूपये पारितोषिक देण्यात येणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा