शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

वॉटर कप २०१९ स्पर्धेत भोकर, लोह्याचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:50 IST

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा करण्यात आली असून या स्पर्धेत जिल्ह्यातील भोकर व लोहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे़

ठळक मुद्दे८ एप्रिल ते २२ मे दरम्यान होणार स्पर्धा

राजेश वाघमारे ।भोकर : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा करण्यात आली असून या स्पर्धेत जिल्ह्यातील भोकर व लोहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे़मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्यातील तालुक्यांची निवड करण्यात आली़ २४ जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांमध्ये यावर्षी ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ३१ जानेवारी २०१९ पर्यंत फॉर्म भरता येणार आहे.राज्याच्या जलसमृद्धीचा प्रवास अखंड सुरू राहण्यासाठी पाणी फाऊंडेशनने निवडलेल्या तालुक्यांतील सर्व गावांना आमंत्रण देण्यात आले आहे. यासंदर्भात मुंबई येथे आयोजित केलेल्या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पानी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खान, किरण राव, पानी फाऊंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, नामदेव ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी गावांची निवड केली़८ एप्रिल ते २२ मे २०१९ दरम्यान ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये पहिल्या विजेत्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रूपये ५० लाख रूपये आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या गावाला १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत विजयी होणा-या गावांना देण्यात येणा-या एकूण बक्षिसांची रक्कम ९.१५ कोटी राहणार आहे. स्पर्धेतंर्गत पानी फाउंडेशनच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.यावर्षी परत पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा २०१९ साठी तालुक्याची निवड करण्यात आली असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी अनेक गावे सरसावली आहेत. यासाठी जानेवारीअखेर ते मार्चमध्ये पाणी बचतीच्या तंत्राचे प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रत्यक्ष स्पर्धेला ८ एप्रिलपासून सुरुवात होवून २२ मे रोजी स्पर्धा संपणार आहे. दरम्यान, तालुका समन्वय सुगंध पळसे व गजानन वाहूळकर यांच्यासह महसूल, कृषी, वनविभाग आणि पंचायत समिती स्तरावर प्रशासन सहकार्य करणार आहे.या स्पर्धेत तालुक्यातील हाडोळी गावाने प्रथम क्रमांक मिळवून पानी फाऊंडेशनचे १० लाख व महाराष्ट्र शासनाचे ५ लाख असे एकूण १५ लाख रुपयांचे बक्षीस पटकावले. द्वितीय क्रमांकाच्या दिवशी खु.गावाला महाराष्ट्र शासनाचे ५ लाख मिळाले तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या वाकद गावाला ३ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते.४५ दिवसांचा कालावधी४५ दिवसांच्या या कालावधीतील स्पर्धेत 'श्रमदान', पाणलोट उपचारांचे नियोजन आणि निर्मिती यांचा समावेश राहील.ज्यामुळे जमिनीतील पाणीपातळी वाढण्यास मदत होईल. निवडलेल्या तालुक्यांतील प्रत्येक महसुली गाव या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र आहे. पहिल्या विजेत्या तीन गावांना ७५ लाख, ५० लाख व ४० लाख रूपये पारितोषिक देण्यात येणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा