शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनी केला 'दादां'चा करेक्ट कार्यक्रम; भाजपत असते, तर लोकसभेची उमेदवारी मिळाली असती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 19:47 IST

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी चव्हाणांची साथ सोडत भाजपत प्रवेश केला होता.

नांदेड : काँग्रेसकडून तीन वेळेस खासदार अन् पुन्हा भाजपवासी झालेले भास्करराव खतगावकर यांनी आपल्या सूनबाई मिनल खतगावकर यांना राजकारणात स्टॅन्ड करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर पुन्हा काँग्रेसची वाट धरली. रुसवे-फुगवे, अंतर्गत तडजोडी करीत नायगावमधून त्यांनी मिनल खतगावकर यांना रिंगणात उतरविले होते, परंतु या ठिकाणी भाजपच्या राजेश पवार यांनी त्यांचा पराभव केला, तर दादांचे प्राबल्य असलेल्या देगलूर मतदारसंघातही लोकसभेत भाजपला लीड मिळाली. त्यामुळे पक्षांतरामुळे दादांचाच करेक्ट कार्यक्रम झाल्याची चर्चा रंगली आहे. 

जिल्ह्याच्या राजकारणातील मुरब्बी नेतृत्व असलेल्या भास्करराव खतगावकर यांनी नांदेड लाेकसभेचे तीन वेळेस प्रतिनिधित्व केले होते. काँग्रेसचे ते अशोकराव चव्हाण यांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचे दिग्गज नेते होते, परंतु केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी चव्हाणांची साथ सोडत भाजपत प्रवेश केला होता. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात शिवाजीनगर आणि बाबानगर अशी दोन सत्ताकेंद्रे झाली होती. भाजपची सर्व सूत्रे खतगावकरांच्या निवासस्थानावरून हलत होती, परंतु राज्याच्या राजकारणात सत्तानाट्य झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे सार्वजनिक बांधकाममंत्री झाले. त्यामुळे खतगावकर यांनी भाजपला रामराम करीत काँग्रेसची वाट धरली, परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चव्हाणांनी भाजपत प्रवेश केला. त्यावेळी खतगावकर यांनी सून मिनल खतगावकर यांच्यासह पुन्हा हाती कमळ धरले. मिनल यांच्यासाठी लोकसभेची उमेदवारी मिळावी, म्हणून दादांनी भरपूर प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्यानंतर, आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत नायगावमधून भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठीही फिल्डिंग लावण्यात आली होती, परंतु भाजपकडून हिरवा कंदील मिळत नसल्याने अखेर दादांनी सूनबाई मिनल यांच्यासह पुन्हा काँग्रेसचा हात हातात धरला. नायगावमधून मिनल यांना रिंगणात उतरविण्यात आले. त्यावेळी वसंतराव चव्हाण कुटुंबीयांशी खतगावकरांचे बिनसले होते, परंतु दादांनी आपल्या राजकीय कौशल्याचा वापर करून चव्हाण कुटुंबीयांशी जुळवून घेतले. त्यामुळे मिनल यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला, असे बोलले जात होते, परंतु वारंवार केलेले पक्षांतर मतदारांना काही रुचले नाही. त्यामुळे मतदारांनी पुन्हा एकदा आपले वजन भाजपच्या राजेश पवार यांच्या पारड्यात टाकले. मिनल खतगावकर यांचा तब्बल ४७ हजार ६२९ मतांनी दारुण पराभव झाला. या पराभवामुळे आता खतगावकर कुटुंबीयांचे राजकारणात भवितव्य काय? अशी चर्चा होत आहे. त्यांचे वजन असलेल्या देगलूर मतदार संघात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेत काँग्रेसला १ हजार १८० मतांची लीड होती. यावेळी दादा काँग्रेसमध्ये असतानाही या ठिकाणी पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला तब्बल १९ हजारांची लीड आहे. त्यामुळे दादांचा या मतदार संघातील प्रभावही ओसरला असल्याचे दिसून आले.

भाजपत राहिले असते, तर मिळाली असती लोकसभेची उमेदवारीभास्करराव खतगावकर यांच्या सुनेला नायगावमधून भाजपाकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी लगेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला, परंतु भाजपतच थांबले असते, तर कदाचित लोकसभेची उमेदवारी मिनल यांना मिळू शकली असती अन् त्या निवडूनही आल्या असत्या, असे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. कारण भाजपकडून लोकसभेसाठी सक्षम उमेदवारांचा शोध सुरू होता. त्यात खतगावकरांचे पारडे इतरांपेक्षा नक्कीच जड होते.

टॅग्स :NandedनांदेडBJPभाजपाcongressकाँग्रेस