शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील २० गावांत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:26 IST

जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग मान्सनपूर्व तयारीला लागला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कुठल्याही आजाराची साथ पसरु नये, यासाठीच्या उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील २० गावांत ग्रामस्वराज्य अभियानातंर्गत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्यही राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी व्ही. आर. झिने यांनी सांगितले.

ठळक मुद्देअतिसार नियंत्रणावरही भर : आरोग्य विभागाकडून मान्सूनपूर्व तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग मान्सनपूर्व तयारीला लागला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कुठल्याही आजाराची साथ पसरु नये, यासाठीच्या उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील २० गावांत ग्रामस्वराज्य अभियानातंर्गत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्यही राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी व्ही. आर. झिने यांनी सांगितले.दरवर्षी पावसाळ्यात जलजन्य, कीटकजन्य आजारांची साथ उद्भवते. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मान्सनपूर्व तयारी हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून २८ ते ९ मे या कालावधीत जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत ० ते ५ वर्षे या वयोगटातील बालकांच्या घरोघरी जाऊन ओआरएस पाकिटांचे वाटप करण्यात येणार आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांसह मातांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी विविध शाळांमध्येही प्रात्यक्षिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. डायरियाच्या अनुषंगानेही विशेष दक्षता घेण्यात येत असून मोहिमेमध्ये डायरियाचा रुग्ण आढळल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.याबरोबरच २१ ते २४ मे या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य अभियान राबविण्यात येणार आहे.यासाठी केंद्र शासनाने जिल्ह्यातील १० तालुक्यांतील २० गावांची निवड केली आहे. या गावांमध्ये एप्रिल महिन्यात अभियानाची पहिली फेरी राबविण्यात आली असून आता २१ मे पासून दुसºया फेरीला प्रारंभ होत आहे. या अभियानांतर्गत गरोदरमाता आणि ० ते २ वर्षे या वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार असल्याचेही जिल्हा बालआरोग्य अधिकारी झिने यांनी सांगितले.दरम्यान, दरवर्षी जिल्ह्यात पावसाळ्याच्या काळात जलजन्य, कीटकजन्य आजारामुळे साथीचे रोग पसरतात़ नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाणीपुरवठ्यामुळे पावसाळ्याच्या काळात रुग्णसंख्येत मोठी वाढ होते़ त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व तयारीला वेग आला आहे़साथरोग नियंत्रणासाठी मनपाचा विशेष कक्षमान्सूनपूर्व उपाययोजनांच्या अनुषंगाने महानगरपालिकेने जंगमवाडी येथील दवाखान्यात साथरोग नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. याबरोबरच नांदेड शहराचे १५ झोन तयार करुन झोननिहाय वैद्यकीय अधिकाºयांच्या नेमणुका केल्या आहेत. साथरोग नियंत्रणासाठी मनपाच्या सर्व दवाखान्यांत प्रथमोपचाराची व्यवस्था करण्यात आली असून योग्य त्या संदर्भसेवा या दवाखान्यात नागरिकांना मिळणार आहेत. अतिसंवेदनशील व झोपडपट्टी परिसरात मनपाच्या आरोग्य विभागामार्फत रक्तनमुने तपासणी तसेच औषधोपचारही करण्यात येणार असल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आदी आजार डासांमार्फत तर गॅस्ट्रो, कॉलरा, विषमज्वर, अतिसार या पाण्यामार्फत पसरणाºया आजारांची वाढ होऊ नये यासाठी कर्मचाºयांना दक्ष राहण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. अतिसार नियंत्रण पंधरवडा आणि मिशन इंद्रधनुष्य हे मान्सूनपूर्व तयारी म्हणून राबविण्यात येत आहे. मलेरियाचाच रुग्ण आढळल्यास मलेरिया विभागाच्या वतीने संबंधित ठिकाणी फॉगिंगही करण्यात येणार आहे.-व्ही.आर.झिने, जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नांदेड.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदHealthआरोग्यRainपाऊस