शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नांदेड जिल्ह्यातील २० गावांत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:26 IST

जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग मान्सनपूर्व तयारीला लागला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कुठल्याही आजाराची साथ पसरु नये, यासाठीच्या उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील २० गावांत ग्रामस्वराज्य अभियानातंर्गत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्यही राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी व्ही. आर. झिने यांनी सांगितले.

ठळक मुद्देअतिसार नियंत्रणावरही भर : आरोग्य विभागाकडून मान्सूनपूर्व तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग मान्सनपूर्व तयारीला लागला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कुठल्याही आजाराची साथ पसरु नये, यासाठीच्या उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील २० गावांत ग्रामस्वराज्य अभियानातंर्गत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्यही राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी व्ही. आर. झिने यांनी सांगितले.दरवर्षी पावसाळ्यात जलजन्य, कीटकजन्य आजारांची साथ उद्भवते. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मान्सनपूर्व तयारी हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून २८ ते ९ मे या कालावधीत जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत ० ते ५ वर्षे या वयोगटातील बालकांच्या घरोघरी जाऊन ओआरएस पाकिटांचे वाटप करण्यात येणार आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांसह मातांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी विविध शाळांमध्येही प्रात्यक्षिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. डायरियाच्या अनुषंगानेही विशेष दक्षता घेण्यात येत असून मोहिमेमध्ये डायरियाचा रुग्ण आढळल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.याबरोबरच २१ ते २४ मे या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य अभियान राबविण्यात येणार आहे.यासाठी केंद्र शासनाने जिल्ह्यातील १० तालुक्यांतील २० गावांची निवड केली आहे. या गावांमध्ये एप्रिल महिन्यात अभियानाची पहिली फेरी राबविण्यात आली असून आता २१ मे पासून दुसºया फेरीला प्रारंभ होत आहे. या अभियानांतर्गत गरोदरमाता आणि ० ते २ वर्षे या वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार असल्याचेही जिल्हा बालआरोग्य अधिकारी झिने यांनी सांगितले.दरम्यान, दरवर्षी जिल्ह्यात पावसाळ्याच्या काळात जलजन्य, कीटकजन्य आजारामुळे साथीचे रोग पसरतात़ नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाणीपुरवठ्यामुळे पावसाळ्याच्या काळात रुग्णसंख्येत मोठी वाढ होते़ त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व तयारीला वेग आला आहे़साथरोग नियंत्रणासाठी मनपाचा विशेष कक्षमान्सूनपूर्व उपाययोजनांच्या अनुषंगाने महानगरपालिकेने जंगमवाडी येथील दवाखान्यात साथरोग नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. याबरोबरच नांदेड शहराचे १५ झोन तयार करुन झोननिहाय वैद्यकीय अधिकाºयांच्या नेमणुका केल्या आहेत. साथरोग नियंत्रणासाठी मनपाच्या सर्व दवाखान्यांत प्रथमोपचाराची व्यवस्था करण्यात आली असून योग्य त्या संदर्भसेवा या दवाखान्यात नागरिकांना मिळणार आहेत. अतिसंवेदनशील व झोपडपट्टी परिसरात मनपाच्या आरोग्य विभागामार्फत रक्तनमुने तपासणी तसेच औषधोपचारही करण्यात येणार असल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आदी आजार डासांमार्फत तर गॅस्ट्रो, कॉलरा, विषमज्वर, अतिसार या पाण्यामार्फत पसरणाºया आजारांची वाढ होऊ नये यासाठी कर्मचाºयांना दक्ष राहण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. अतिसार नियंत्रण पंधरवडा आणि मिशन इंद्रधनुष्य हे मान्सूनपूर्व तयारी म्हणून राबविण्यात येत आहे. मलेरियाचाच रुग्ण आढळल्यास मलेरिया विभागाच्या वतीने संबंधित ठिकाणी फॉगिंगही करण्यात येणार आहे.-व्ही.आर.झिने, जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नांदेड.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदHealthआरोग्यRainपाऊस