शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

आघाडीची एकजुट सत्तापरिवर्तन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:36 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीसह आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकजुटीने लढा दिल्यास या निवडणुकीत आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करीत सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या सेना-भाजपाला धडा शिकविण्याची संधी निवडणुकीच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्देगोरठा येथे मोठा प्रतिसाद काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संयुक्त सभेत व्यक्त केला विश्वास

नांदेड : काँग्रेस-राष्ट्रवादीसह आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकजुटीने लढा दिल्यास या निवडणुकीत आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करीत सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या सेना-भाजपाला धडा शिकविण्याची संधी निवडणुकीच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे देशात सत्तापरिवर्तन करण्यासाठी आघाडीतील सर्वांनी एकजुटीने कामाला लागण्याचा निर्धार बुधवारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला.उमरी तालुक्यातील गोरठा येथे काँग्रेस-राष्ट्रवादीसह रिपाइं (गवई गट), शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी मित्रपक्षांची संयुक्त सभा काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ पार पडली. या सभेला खा. चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर, माजी मंत्री गंगाधर कुंटूरकर, माजी मंत्री कमलकिशोर कदम, आ. अमरनाथ राजूरकर, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, माजी आ. शंकरअण्णा धोंडगे, हरिहरराव भोसीकर, अप्पाराव सोमठाणकर, राजेश कुंटूरकर, संजय लहानकर, शिरीष देशमुख गोरठेकर, संगीता जाधव, डॉ. सुनील कदम, जगन शेळके, सदाशिव पोपुलवाड आदींसह पदाधिकाऱ्यांची मंचावर उपस्थिती होती. खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की, कै. शंकरराव चव्हाण, पद्मश्री श्यामराव कदम, बाबासाहेब गोरठेकर, बन्नाळीकर यांनी नांदेड जिल्ह्यात समन्वयाने राजकारण केल्याचा इतिहास आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी हे वैचारिक मित्र आहेत. देशातील लोकशाही व्यवस्था टिकविण्याची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. त्यामुळे ही मजबूत आघाडी देशात निश्चितपणे सत्तापरिवर्तन घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गावपातळीवरील कार्यकर्ते आमचे काय? असा प्रश्न करीत आहेत. या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी निवडणुकांत आघाडीतील पक्षांनी एकजुटीने कामाला लागायला हवे, असे ते म्हणाले. जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला ३० तर राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या. काँग्रेसला स्वबळावर जिल्हा परिषदेत सत्तेत येता आले असते. परंतु माझी नेहमीप्रमाणेच सामंजस्याची भूमिका होती. त्यामुळेच काँग्रेस ३ व राष्ट्रवादी ३ अशी पदांची विभागणी केल्याचे सांगत, काही ठिकाणी वैचारिक मतभेद होऊ शकतात. परंतु माझे कोणाशीही वैयक्तिक मतभेद नाहीत, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. नव्या पिढीमध्ये विसंवाद नव्हे तर सुसंवाद असला पाहिजे, अशीच आपली भूमिका असल्याचे सांगत पाणीप्रश्न जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पाणी नंतर मिळणार नाही. त्यामुळे पाण्याचा हा लढा आपण आत्ताच लढला पाहिजे अन्यथा उमरी, धर्माबाद तालुक्याचे वाळवंट होईल, असा इशाराही खा. चव्हाण यांनी दिला. कमलबाबूंना एमएलसी करण्यासाठी आम्ही सर्वांनी मेहनत घेवून निवडून आणले. ही माणसे व कार्यकर्ते आज सांभाळायला हवीत, असे उद्गारही त्यांनी काढले.यावेळी बापूसाहेब गोरठेकर, गंगाधरराव कुंटूरकर, कमलकिशोर कदम, शंकरअण्णा धोंडगे यांचीही भाषणे झाली. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगढमध्ये नुकताच काँग्रेसने भाजपाचा सफाया केला, त्याच निकालाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती करु, असा विश्वास कुंटूरकर यांनी व्यक्त केला.राष्ट्रवादी आघाडी धर्म पाळणार-गोरठेकरकाँग्रेस-राष्ट्रवादी सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेवून चालले आहेत. राजकारणात आजवर मी कधी कुठला शब्द दिला नाही. परंतु आघाडी धर्म पाळण्याचा शब्द मी आमचे नेते शरद पवार यांना दिला आहे आणि तो मी पाळणारच असल्याचे सांगत आमच्या रक्तात गद्दारी नसल्याचे उद्गार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी काढले. अशोकराव चव्हाण यांचा विजय निश्चित आहे. तुम्हाला निवडून आणणे आमचे कर्तव्य असल्याचे सांगत प्रचारासाठी मी स्वत: फिरत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :nanded-pcनांदेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा