शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नांदेडमध्ये बंदला अभूतपूर्व प्रतिसाद; अनेक ठिकाणी कार्यकर्ते-पोलीस आले होते आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 12:17 IST

भीमा कोरेगाव मध्ये झालेल्या हिसांचाराचा निषेध नोंदविण्यासाठी  आयोजित बंदला शहरासह जिल्ह्यातील विविध भागात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला़ बंदमुळे वाहतुक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते़ बहुतांश शाळांना सकाळी सुट्टी दिल्याने परिसरात शुकशुकाट होता़ दरम्यान, काही भागात या बंदला हिंसक वळण लागले

नांदेड : भीमा कोरेगाव मध्ये झालेल्या हिसांचाराचा निषेध नोंदविण्यासाठी  आयोजित बंदला शहरासह जिल्ह्यातील विविध भागात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला़ बंदमुळे वाहतुक ठप्प झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते़ बहुतांश शाळांना सकाळी सुट्टी दिल्याने परिसरात शुकशुकाट होता़ दरम्यान, काही भागात या बंदला हिंसक वळण लागले.

बंदच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळपासूनच बहुतांश ठिकाणच्या बाजारपेठेमध्ये शुकशुकाट होता़ व्यापार्‍यांनीही स्वताहून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती़ नांदेड शहरातील विविध भागासह सिडको-हडको परिसरातही कार्यकर्त्यांनी रॅली काढून बंदला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले़ त्यामुळे बंदला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले़ बंद दरम्यान रुग्णालये तसेच औषधांची दुकाने सोडली तरी, इतर ठिकाणचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते़ भावसार चौकातील आठवडी बाजारातही बंदमुळे तुरळक गर्दी होती़ दुपारी बारा वाजेच्या सुमारास आयटीआय चौक येथून कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ या ठिकाणी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान, बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी  केली.  बंद मागे घेतल्यानंतर शहरातील व्यवहारही सुरळीत झाले.

एसटीच्या ७०० फेर्‍या रद्दभिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते़ त्यामुळे जिल्ह्यात बुधवारी ८३७ पैकी तब्बल ७०० फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या़ त्यामुळे महामंडळाचे जवळपास ३५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. भीमा कोरेगाव येथील हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनेनंतर मंगळवारी जिल्ह्यात आंदोलनकर्त्यांनी दहा बसेसवर दगडफेक केली होती़ त्यामुळे महामंडळाचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले होते़ त्यानंतर बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती़ खबरदारीचा उपाय म्हणून नांदेड विभागातून सकाळच्या वेळी काही बसेस सोडण्यात आल्या़ परंतु दुपारी अकरानंतर एकही बस नांदेड आगारातून बाहेर पडली नाही़

दिवसभर एसटीच्या केवळ ५५ फेर्‍या करण्यात आल्या़ तर ७८२ फेर्‍या रद्द करण्यात आल्या़ कंधार, उमरी आणि अर्धापूर या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी बसेसवर दगडफे केली़ त्यामुळे बसेसच्या काचा फुटल्या होत्या़ बसफेर्‍या रद्द झाल्यामुळे अनेक प्रवासी बसस्थानकावरुन आल्या पावली परतले़ दुपारनंतर नांदेड बसस्थानकात शुकशुकाट होता़ सायंकाळी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा झाल्यानंतर काही आगारातून बसेस सोडण्यात आल्या़ परंतु दिवसभरात महामंडळाचे जवळपास ३५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले़ दरम्यान, वाहतूक सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारNandedनांदेड