शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

बाभळीतील पाण्यासाठी दोन पर्याय ; अपव्यय टाळून हक्काचे पाणीही होऊ शकते उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 19:22 IST

तेलंगणाला त्यांचा पाण्याचा वाटा देतानाच उर्वरित पाणी समुद्रात वाहून जावू नये म्हणून शासनाला दोन पर्याय सुचविल्याची माहिती खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली.

नांदेड : बाभळी बंधारा प्रकल्प या भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. मात्र २८ आॅक्टोबरला बंधाऱ्याचे गेट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बंद केल्यानंतर या भागात पाणीच उरत नसल्याची विदारक स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत तेलंगणाला त्यांचा पाण्याचा वाटा देतानाच उर्वरित पाणी समुद्रात वाहून जावू नये म्हणून शासनाला दोन पर्याय सुचविल्याची माहिती खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली.

बाभळी बंधारा प्रकल्पाला १९९५ साली प्रशासकीय मान्यता मिळाली आणि २०१० मध्ये हा प्रकल्प पूर्णही झाला. २००६ मध्ये पाणी वाटपावरुन आंध्र आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर झालेल्या करारानुसार आपल्याला २.७४ टीएमसी पाणी मिळायला हवे. तर तत्कालीन आंध्र आणि आताच्या तेलंगणाला ०.६ टीएमसी पाणी द्यायचे आहे. याच करारानुसार २८ आॅक्टोबरला बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय झाला. 

निवाड्याप्रमाणे पहिल्यावर्षी पाणी उपलब्धही झाले. परंतु, २९ आॅक्टोबरनंतर पाऊसच नसल्याने दरवाजे बंद केले तरीही या भागात पाणीच राहत नसल्याचा अनुभव आपण मागील काही वर्षांत घेतला आहे. दुसरीकडे दरवाजे बंद केल्यानंतर ०.६ टीएमसीपेक्षा कितीतरी अधिक पाणी तेलंगणात वाहून जात आहे. या प्रकारामुळे बाभळी प्रकल्पाचा या भागातील शेतकऱ्यांना काहीही फायदा होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांची भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगत पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी दोन पर्याय दिल्याची माहितीही खा. चव्हाण यांनी दिली. दोन्ही राज्यांनी संमतीने सदर बंधाऱ्याची क्षमता ०.६ ‘टीएमसी’ ने कमी केल्यास त्यावरील पाणी निश्चित केलेल्या करारानुसार आपोआप तेलंगणाला मिळेल आणि उर्वरित पाणी आपल्याकडे राहील हा एक पर्याय आहे. याबरोबरच पावसाळ्यात जेव्हा पूरपरिस्थिती निर्माण होते तेव्हा बाभळी बंधाऱ्याखाली पोचमपाड येथील श्रीरामसागर धरण भरुन घ्यायचे. 

ज्या दिवशी हे धरण पूर्णपणे भरेल त्याच दिवशी बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करण्याची परवानगी द्यायची. म्हणजेच, तेलंगणाला त्यांच्या वाट्याचे पाणी मिळेल. शिवाय श्रीरामसागर भरल्यानंतर जे पाणी समुद्रात वाहून जाते त्या पाण्याचा अपव्यय टळेल आणि हेच पाणी आपल्या भागासाठी उपलब्ध होईल. या दोन्ही पर्यायावर दोन्ही राज्यांच्या शासनाने विचार करुन सर्वोच्च न्यायालयास निकालात सुधारणा करण्याची विनंती केल्यास बाभळी बंधाऱ्याच्या पाण्याचा अपव्यय होणार नाही. शिवाय महाराष्ट्रालाही त्याचा फायदा होईल. यासाठी आता राज्य शासनाने पुढाकार घेण्याची आवश्यकता खा. चव्हाण यांनी व्यक्त केली.

टॅग्स :DamधरणWaterपाणीNandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाण