शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

बाभळीतील पाण्यासाठी दोन पर्याय ; अपव्यय टाळून हक्काचे पाणीही होऊ शकते उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 19:22 IST

तेलंगणाला त्यांचा पाण्याचा वाटा देतानाच उर्वरित पाणी समुद्रात वाहून जावू नये म्हणून शासनाला दोन पर्याय सुचविल्याची माहिती खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली.

नांदेड : बाभळी बंधारा प्रकल्प या भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. मात्र २८ आॅक्टोबरला बंधाऱ्याचे गेट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बंद केल्यानंतर या भागात पाणीच उरत नसल्याची विदारक स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत तेलंगणाला त्यांचा पाण्याचा वाटा देतानाच उर्वरित पाणी समुद्रात वाहून जावू नये म्हणून शासनाला दोन पर्याय सुचविल्याची माहिती खा. अशोकराव चव्हाण यांनी दिली.

बाभळी बंधारा प्रकल्पाला १९९५ साली प्रशासकीय मान्यता मिळाली आणि २०१० मध्ये हा प्रकल्प पूर्णही झाला. २००६ मध्ये पाणी वाटपावरुन आंध्र आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर झालेल्या करारानुसार आपल्याला २.७४ टीएमसी पाणी मिळायला हवे. तर तत्कालीन आंध्र आणि आताच्या तेलंगणाला ०.६ टीएमसी पाणी द्यायचे आहे. याच करारानुसार २८ आॅक्टोबरला बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय झाला. 

निवाड्याप्रमाणे पहिल्यावर्षी पाणी उपलब्धही झाले. परंतु, २९ आॅक्टोबरनंतर पाऊसच नसल्याने दरवाजे बंद केले तरीही या भागात पाणीच राहत नसल्याचा अनुभव आपण मागील काही वर्षांत घेतला आहे. दुसरीकडे दरवाजे बंद केल्यानंतर ०.६ टीएमसीपेक्षा कितीतरी अधिक पाणी तेलंगणात वाहून जात आहे. या प्रकारामुळे बाभळी प्रकल्पाचा या भागातील शेतकऱ्यांना काहीही फायदा होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांची भेट घेऊन चर्चा केल्याचे सांगत पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी दोन पर्याय दिल्याची माहितीही खा. चव्हाण यांनी दिली. दोन्ही राज्यांनी संमतीने सदर बंधाऱ्याची क्षमता ०.६ ‘टीएमसी’ ने कमी केल्यास त्यावरील पाणी निश्चित केलेल्या करारानुसार आपोआप तेलंगणाला मिळेल आणि उर्वरित पाणी आपल्याकडे राहील हा एक पर्याय आहे. याबरोबरच पावसाळ्यात जेव्हा पूरपरिस्थिती निर्माण होते तेव्हा बाभळी बंधाऱ्याखाली पोचमपाड येथील श्रीरामसागर धरण भरुन घ्यायचे. 

ज्या दिवशी हे धरण पूर्णपणे भरेल त्याच दिवशी बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे बंद करण्याची परवानगी द्यायची. म्हणजेच, तेलंगणाला त्यांच्या वाट्याचे पाणी मिळेल. शिवाय श्रीरामसागर भरल्यानंतर जे पाणी समुद्रात वाहून जाते त्या पाण्याचा अपव्यय टळेल आणि हेच पाणी आपल्या भागासाठी उपलब्ध होईल. या दोन्ही पर्यायावर दोन्ही राज्यांच्या शासनाने विचार करुन सर्वोच्च न्यायालयास निकालात सुधारणा करण्याची विनंती केल्यास बाभळी बंधाऱ्याच्या पाण्याचा अपव्यय होणार नाही. शिवाय महाराष्ट्रालाही त्याचा फायदा होईल. यासाठी आता राज्य शासनाने पुढाकार घेण्याची आवश्यकता खा. चव्हाण यांनी व्यक्त केली.

टॅग्स :DamधरणWaterपाणीNandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाण