शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

जिल्हयात लाॅकडाऊन काळातील तीन हजारांवर गुन्हे रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST

नांदेड : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात एप्रिल महिन्यापासूनच कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवांशिवाय अन्य कुणालाही घराबाहेर पडता ...

नांदेड : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात एप्रिल महिन्यापासूनच कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवांशिवाय अन्य कुणालाही घराबाहेर पडता येत नव्हते. त्यातही कोरोनासाठी नियमावलीही कठोर केल्या होत्या. परंतु, या काळातही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत होते तर ठराविक वेळेनंतरही दुकाने सुरु होती. मास्कचा वापर न करणे, सामाजिक अंतर न पाळणे, विनापरवानगी प्रवास अशाप्रकारे कोरोनाच्या नियमावलींचे भंग केल्याप्रकरणी जिल्ह्यात या कालावधीत जवळपास तीन हजार गुन्हे नोंदविण्यात आले होते. आता राज्य शासनाने हे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नांदेड शहराशेजारी हिंगोली, परभणी, यवतमाळ, तेलंगणाच्या सीमा आहेत. त्यामुळे या सीमावर्ती भागातून नांदेडात प्रवेश करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी पकडून शहरातच क्वारंटाईन केले होते.

गुन्हे परत कसे घेतले जातात?

लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील नागरिकांनी प्रवेश करु नये, यासाठी सीमाभागात तपासणी नाके लावण्यात आले होते. याठिकाणी विनापरवानगी शहरात शिरणाऱ्या अनेकांना पकडण्यात आले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहर व जिल्ह्यातही ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरात फिक्स पॉईंट तयार करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. त्यानंतरही अनेक नागरिकांनी नियमांचा भंग केला. काही जणांनी आंदोलनेही केली. पोलिसांशी हुज्जत घालणे यासह कोविडच्या नियमासंदर्भात जिल्ह्यात कलम १३५ आणि १८८नुसार गुन्हे नोंदविण्यात आले होते. - द्वारकादास चिखलीकर, स्थागुशा पोलीस निरीक्षक.

यापूर्वीही सरकारे बदलली की, राजकीय स्वरुपाचे गुन्हे मागे घेण्यात येत होते. आता कोविडच्या काळात साथरोग नियमाचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारच्यावतीने पोलीसच या गुन्ह्यात तक्रारदार असतात. त्यामुळे सरकार एक आदेश काढून हे गुन्हे मागे घेत असल्याचे नमूद करते. त्यानंतर हे सर्व गुन्हे रद्द होतात. जिल्ह्यात कोविडच्या काळात किरकोळ कारणावरुन गुन्हे दाखल झालेल्यांना त्यामुळे दिलासा मिळेल.

विनापरवानगी प्रवासाचे जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे

कोरोना काळात प्रवास करण्याला बंदी घालण्यात आली होती. त्यानंतरही अनेकजण विनापरवानगी प्रवास करत होते. अशा नागरिकांना सीमेवरच अडविण्यात आले होते. काहीजण मात्र पोलिसांची नजर चुकवून प्रवेश करण्यात यशस्वी झाले होते. परंतु, त्यांना शहरात पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. लॉकडाऊनमध्ये विनापरवानगी प्रवासाचे सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर जमावबंदी आदेश, ठराविक वेळेपेक्षा अधिक वेळ दुकाने उघडी ठेवणे, विनामास्क फिरणे, सामाजिक अंतर न पाळणे अशाप्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊनच्या कारणामुळे पोलिसांशी हुज्जत घालण्याचेही प्रकार घडले आहेत.