शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
6
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
7
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
8
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
9
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
10
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
11
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
12
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
13
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
14
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
15
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
16
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
17
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
18
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
19
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
20
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?

जिल्हयात लाॅकडाऊन काळातील तीन हजारांवर गुन्हे रद्द होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST

नांदेड : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात एप्रिल महिन्यापासूनच कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवांशिवाय अन्य कुणालाही घराबाहेर पडता ...

नांदेड : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात एप्रिल महिन्यापासूनच कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवांशिवाय अन्य कुणालाही घराबाहेर पडता येत नव्हते. त्यातही कोरोनासाठी नियमावलीही कठोर केल्या होत्या. परंतु, या काळातही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत होते तर ठराविक वेळेनंतरही दुकाने सुरु होती. मास्कचा वापर न करणे, सामाजिक अंतर न पाळणे, विनापरवानगी प्रवास अशाप्रकारे कोरोनाच्या नियमावलींचे भंग केल्याप्रकरणी जिल्ह्यात या कालावधीत जवळपास तीन हजार गुन्हे नोंदविण्यात आले होते. आता राज्य शासनाने हे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नांदेड शहराशेजारी हिंगोली, परभणी, यवतमाळ, तेलंगणाच्या सीमा आहेत. त्यामुळे या सीमावर्ती भागातून नांदेडात प्रवेश करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी पकडून शहरातच क्वारंटाईन केले होते.

गुन्हे परत कसे घेतले जातात?

लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील नागरिकांनी प्रवेश करु नये, यासाठी सीमाभागात तपासणी नाके लावण्यात आले होते. याठिकाणी विनापरवानगी शहरात शिरणाऱ्या अनेकांना पकडण्यात आले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहर व जिल्ह्यातही ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरात फिक्स पॉईंट तयार करण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. त्यानंतरही अनेक नागरिकांनी नियमांचा भंग केला. काही जणांनी आंदोलनेही केली. पोलिसांशी हुज्जत घालणे यासह कोविडच्या नियमासंदर्भात जिल्ह्यात कलम १३५ आणि १८८नुसार गुन्हे नोंदविण्यात आले होते. - द्वारकादास चिखलीकर, स्थागुशा पोलीस निरीक्षक.

यापूर्वीही सरकारे बदलली की, राजकीय स्वरुपाचे गुन्हे मागे घेण्यात येत होते. आता कोविडच्या काळात साथरोग नियमाचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारच्यावतीने पोलीसच या गुन्ह्यात तक्रारदार असतात. त्यामुळे सरकार एक आदेश काढून हे गुन्हे मागे घेत असल्याचे नमूद करते. त्यानंतर हे सर्व गुन्हे रद्द होतात. जिल्ह्यात कोविडच्या काळात किरकोळ कारणावरुन गुन्हे दाखल झालेल्यांना त्यामुळे दिलासा मिळेल.

विनापरवानगी प्रवासाचे जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे

कोरोना काळात प्रवास करण्याला बंदी घालण्यात आली होती. त्यानंतरही अनेकजण विनापरवानगी प्रवास करत होते. अशा नागरिकांना सीमेवरच अडविण्यात आले होते. काहीजण मात्र पोलिसांची नजर चुकवून प्रवेश करण्यात यशस्वी झाले होते. परंतु, त्यांना शहरात पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. लॉकडाऊनमध्ये विनापरवानगी प्रवासाचे सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर जमावबंदी आदेश, ठराविक वेळेपेक्षा अधिक वेळ दुकाने उघडी ठेवणे, विनामास्क फिरणे, सामाजिक अंतर न पाळणे अशाप्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊनच्या कारणामुळे पोलिसांशी हुज्जत घालण्याचेही प्रकार घडले आहेत.