शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

दहावीत विद्यार्थी होणार नाही नापास; विद्यार्थ्यांसह पालकांतून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने दिलासादायक नियम आणला आहे. त्यात विविध ऐच्छिक विषय देण्यात ...

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाने दिलासादायक नियम आणला आहे. त्यात विविध ऐच्छिक विषय देण्यात आले आहेत. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स इत्यादी हे ऐच्छिक विषय आहेत. त्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ‘बेस्ट ऑफ फाइव्ह सब्जेक्टस’ या नियमाच्या आधारावर ठरवली जाईल. म्हणजेच सीबीएससीच्या परीक्षेत कुणीच नापास होणार नाही तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. बोर्डाकडून हा नियम विशेषत: अशा विद्यार्थ्यांसाठी बनवला आहे. जे विद्यार्थी हुशार आहेत. परंतु अभ्यासात थोडे कच्चे आहेत. भारत सरकारचे स्किल इंडिया इनिशिएटिव्हसुद्धा समोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएससीने निश्चित केलेल्या कौशल्याधारित विद्यार्थ्यांचा रस वाढतो आहे. त्यामुळे या निर्णयाचे पालक, विद्यार्थी व शिक्षकांकडून स्वागत करण्यात आले आहे.

चौकट

विद्यार्थ्यांना पाच विषय अनिवार्य असतात. तसेच ऐच्छिकमध्ये कौशल्याधारित विषय निवडण्याची संधी आहे. त्यामुळे या विषयात नापास होण्याचा प्रश्नच येत नाही. परिणामी पाचपैकी एखाद्या विषयात नापास झालेल्या विद्यार्थीदेखील उत्तीर्ण घोषित केले जाणार आहे. या निर्णयाचे सर्वांकडूनच स्वागत होत आहे. - सुनील श्रीवास्तव, किड्स किंगड्म, नांदेड.

विद्यार्थ्यांना ऐच्छिक आणि आवडीचा विषय निवडण्याची संधी बोर्डाने उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा फायदा घेत आवड असलेल्या विषयाचे नॉलेज शालेयस्तरावर मिळत आहे. भविष्यात करिअर करताना याचा निश्चितच फायदा होईल यात शंका नाही. - प्रवीण सेलमोकर, पालक

सीबीएससीमध्ये ऐच्छिक विषय देऊन एकप्रकारे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना देण्याचे काम या शिक्षणातून होणार आहे. ऐच्छिक विषय निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना असल्यामुळे ते आवडीचा विषय निवडून त्यात यश संपादन करतील. परंतु, या विषयाचे सखोल मार्गदर्शन शाळेतून मिळायला हवे. - सुनीता मिरटकर, पालक

शालेयस्तरावर प्रात्यक्षिकांवर भर देऊन व्यावहारिक आणि कौशल्याधारित शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. त्यानुसार सीबीएससीमध्ये ऐच्छिक विषय घेऊन आपल्याला आवडणाऱ्या विषयाचे ज्ञान मिळविण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. या निर्णयाचे स्वागतच आहे. - विकास धोंडगे, पालक