शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

पाटोदा ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:52 AM

लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : तालुक्यातील पाटोदा (थ) येथील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे दोन महिन्यांपासून ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी १७ जानेवारी रोजी धर्माबाद पंचायत समितीवर धडक घागरमोर्चा काढला़ यावेळी गटविकास अधिकारी अजयसिंह पवार यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला.दोन महिन्यांपासून पाणी मिळत नाही, पिण्यासाठी पाणी आणायचे कोठून? ...

ठळक मुद्दे पंचायत समितीवर घागरमोर्चा दोन महिन्यांपासून पाणीटंचाई; गटविकास अधिका-यांना विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : तालुक्यातील पाटोदा (थ) येथील ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे दोन महिन्यांपासून ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी १७ जानेवारी रोजी धर्माबाद पंचायत समितीवर धडक घागरमोर्चा काढला़ यावेळी गटविकास अधिकारी अजयसिंह पवार यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला.दोन महिन्यांपासून पाणी मिळत नाही, पिण्यासाठी पाणी आणायचे कोठून? सरपंच, ग्रामसेवक लक्ष देत नाहीत, नळपट्टी ,घरपट्टी देतो़ मग गावात पाणी का मिळत नाही? आम्हाला पाणी मिळाले पाहिजे, मूलभूत सुविधा गावात मिळत नसतील तर ग्रामपंचायत कोणत्या कामाची, अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करीत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी अजयसिंह पवार यांना धारेवर धरले. त्यावेळी पवार यांनी प्रश्नांचे सविस्तर उत्तरे देवून समाधान केले़ येत्या एक - दोन दिवसांत पाण्याची व्यवस्था करू, असे आश्वासनही त्यांनी दिले़ त्यामुळे ग्रामस्थांनी मोर्चा मागे घेतला.दरम्यान, गटविकास अधिकारी पवार यांनी सरपंच विजय गिरी यांना ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड गायब होणे, मोटर चोरीला जाणे, जे कोणी पाईप फोडत असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही? यासंदर्भात प्रश्न विचारले़ मी माझ्या पद्धतीने कारवाई करीत आहे, तुम्ही काय करत आहे, असे म्हणत गटविकास अधिकाºयांनी सरपंचांना धारेवर धरले. गावातील राजकारणामुळे सर्वसामान्य, नागरिकांना वेठीस धरण्याचे काम राजकारणी लोकांनी करू नये हे योग्य नाही. राजकारणामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात असल्याचेही गटविकास अधिकारी यांनी सरपंचाला सांगितले़मोर्चात सरपंच विजय गिरी, शंकर बोंबले, दत्ताहारी शेळपुरी, हणमंत पाटील, किशन तुरे, प्रतिमा वाघमारे, गंगुबाई आंबेकर, लक्ष्मीबाई तुरे, अशोक तुरे, हानमंत तुरे, शंकर येताळे, कोंडिबा तुरे, राजू तुरे, जळबा तुरे,विलास तुरे, विठ्ठल तुरे, शेषराव रोन्टे, लक्ष्मण रोन्टे, सुनीता तुरे, संगीता तुरे,मरूबाई रोडेवार, श्याम तुरे, देऊबाई रोडेकर, सुनीता रोन्टे, गंगाधर तुरे, अशोक तुरे, पौर्णिमा तुरे, तुळसाबाई तुरे, सावित्रीबाई आंबेकर, दिलीप तुरे, तुळसाबाई रोन्टे भारतबाई तुरे, गंगूबाई आंबेकर, महादाबाई रोन्टे, पद्मीनबाई आंबेकर, अनुसयाबाई आंबेकर, सुनीता रोन्टे, देऊबाई रोडेकर, दीक्षा तुरे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.