शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपीची रक्कम जमा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:21 IST

नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू गाळप हंगाम २०१८-१९ मधील उसाची एफआरपीची रक्कम अद्याप अदा केली नाही. शेतकऱ्यांना ही रक्कम त्वरित अदा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नांदेड येथील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयापुढे सोमवारी आंदोलन केले.

ठळक मुद्देकारखान्यावरील एंट्री शुल्क थांबवण्याची मागणी

नांदेड : नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू गाळप हंगाम २०१८-१९ मधील उसाची एफआरपीची रक्कम अद्याप अदा केली नाही. शेतकऱ्यांना ही रक्कम त्वरित अदा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नांदेड येथील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयापुढे सोमवारी आंदोलन केले.राज्याच्या साखर आयुक्तांनी ६ मे २०१९ रोजी परभणी जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांवर आरआरसीचे आदेश पारित केले आहेत. एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना अदा न केल्याने हे आदेश पारित करण्यात आले होते. एफआरपीची रक्कम सर्वच साखर कारखान्यांनी शेतक-यांना दिली पाहिजे, असा कायदा असतानाही साखर विभागाच्या प्रादेशिक सहसंचालकांनी बघ्याची भूमिका घेतल्याने कारखानदार कायद्याची पायमल्ली करत असल्याचा आरोप स्वाभिमानीने केला आहे.ज्या कारखान्यावर आरआरसीची कारवाई झाली अशा कारखान्यांनी एफआरपीची रक्कम न दिल्यास १५ टक्के व्याजआकारणी करुन शेतकºयांना ही रक्कम द्यावी, कारखान्यावर जात असलेल्या ऊसाच्या गाडीला इंट्रीपोटी ५०० ते ७०० रुपये घेतले जात आहेत ते बंद करावेत, आदी मागण्याही करण्यात आल्या. या मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात.शेतकºयांच्या खात्यावर एआरपीची रक्कम जमा करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. यावेळी प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे, प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे, परभणीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, हिंगोली जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे, नांदेड जिल्हाध्यक्ष किशनराव कदम, हनुमान राजेगोरे, केशव आरमळ, उस्मान पठाण, लक्ष्मण शेरे, दिपक भालेराव, बाळासाहेब घाटोळ, ज्ञानेश्वर बोंढारे, ज्ञानोबा लोखंडे, नामदेव मोहिते, ऋषिकेश बर्वे, रामराव मोहिते, अब्दुल रऊफ, संभाजी खानसोळे आदींची उपस्थिती होती.दुष्काळामुळे शेतकरी हवालदिलसततच्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कारखान्यांनी शेतक-यांचा ऊस नेवून ३ ते ४ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरीही एफआरपी रक्कम शेतक-यांना वेळेवर दिली जात नाही. एकीकडे खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतक-यांकडे पैसे नाहीत, बँका पीककर्ज देत नाहीत, अशा परिस्थितीत शेतक-यांवर खाजगी सावकाराकडे हात पसरण्याची वेळ आली आहे. कारखान्यांनी एफआरपीची रक्कम न दिल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे म्हटले आहे.

 

टॅग्स :NandedनांदेडSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना