शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

एफआरपीची रक्कम जमा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 00:21 IST

नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू गाळप हंगाम २०१८-१९ मधील उसाची एफआरपीची रक्कम अद्याप अदा केली नाही. शेतकऱ्यांना ही रक्कम त्वरित अदा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नांदेड येथील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयापुढे सोमवारी आंदोलन केले.

ठळक मुद्देकारखान्यावरील एंट्री शुल्क थांबवण्याची मागणी

नांदेड : नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू गाळप हंगाम २०१८-१९ मधील उसाची एफआरपीची रक्कम अद्याप अदा केली नाही. शेतकऱ्यांना ही रक्कम त्वरित अदा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नांदेड येथील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयापुढे सोमवारी आंदोलन केले.राज्याच्या साखर आयुक्तांनी ६ मे २०१९ रोजी परभणी जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांवर आरआरसीचे आदेश पारित केले आहेत. एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना अदा न केल्याने हे आदेश पारित करण्यात आले होते. एफआरपीची रक्कम सर्वच साखर कारखान्यांनी शेतक-यांना दिली पाहिजे, असा कायदा असतानाही साखर विभागाच्या प्रादेशिक सहसंचालकांनी बघ्याची भूमिका घेतल्याने कारखानदार कायद्याची पायमल्ली करत असल्याचा आरोप स्वाभिमानीने केला आहे.ज्या कारखान्यावर आरआरसीची कारवाई झाली अशा कारखान्यांनी एफआरपीची रक्कम न दिल्यास १५ टक्के व्याजआकारणी करुन शेतकºयांना ही रक्कम द्यावी, कारखान्यावर जात असलेल्या ऊसाच्या गाडीला इंट्रीपोटी ५०० ते ७०० रुपये घेतले जात आहेत ते बंद करावेत, आदी मागण्याही करण्यात आल्या. या मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात.शेतकºयांच्या खात्यावर एआरपीची रक्कम जमा करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. यावेळी प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे, प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे, परभणीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, हिंगोली जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिणे, नांदेड जिल्हाध्यक्ष किशनराव कदम, हनुमान राजेगोरे, केशव आरमळ, उस्मान पठाण, लक्ष्मण शेरे, दिपक भालेराव, बाळासाहेब घाटोळ, ज्ञानेश्वर बोंढारे, ज्ञानोबा लोखंडे, नामदेव मोहिते, ऋषिकेश बर्वे, रामराव मोहिते, अब्दुल रऊफ, संभाजी खानसोळे आदींची उपस्थिती होती.दुष्काळामुळे शेतकरी हवालदिलसततच्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कारखान्यांनी शेतक-यांचा ऊस नेवून ३ ते ४ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरीही एफआरपी रक्कम शेतक-यांना वेळेवर दिली जात नाही. एकीकडे खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतक-यांकडे पैसे नाहीत, बँका पीककर्ज देत नाहीत, अशा परिस्थितीत शेतक-यांवर खाजगी सावकाराकडे हात पसरण्याची वेळ आली आहे. कारखान्यांनी एफआरपीची रक्कम न दिल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे म्हटले आहे.

 

टॅग्स :NandedनांदेडSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना