शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

विद्यार्थ्यांनी केला पाहुण्यांकडेच मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:30 AM

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हदगाव तालुक्यातील मनुला, माटाळगा येथील विद्यार्थ्यांना पर्याय नसल्यामुळे पैनगंगेचे नदीपात्र ओलांडूनच शाळेत जावे लागते़ सध्या पाऊस सुुरु असल्यामुळे शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत न येण्याचा सल्ला दिला होता़ त्यानंतरही शनिवारी नदीपात्र ओलांडून शाळेत गेलेल्या तीन विद्यार्थ्यांना पाणीपातळी वाढल्यामुळे परत गावाकडे येताच आले नाही़ त्यामुळे पळशीनजीक इतर गावात असलेल्या पाहुण्यांकडेच त्यांना मुक्काम करावा लागला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हदगाव तालुक्यातील मनुला, माटाळगा येथील विद्यार्थ्यांना पर्याय नसल्यामुळे पैनगंगेचे नदीपात्र ओलांडूनच शाळेत जावे लागते़ सध्या पाऊस सुुरु असल्यामुळे शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत न येण्याचा सल्ला दिला होता़ त्यानंतरही शनिवारी नदीपात्र ओलांडून शाळेत गेलेल्या तीन विद्यार्थ्यांना पाणीपातळी वाढल्यामुळे परत गावाकडे येताच आले नाही़ त्यामुळे पळशीनजीक इतर गावात असलेल्या पाहुण्यांकडेच त्यांना मुक्काम करावा लागला़पळशी येथील विवेकानंद विद्यालयात सेमी इंग्लिश हा अभ्यासक्रम असल्यामुळे हदगावच्या सीमेवरील अनेक गावांतील विद्यार्थ्यांनी तिथे प्रवेश घेतला आहे़ दररोज हदगाव तालुक्यातील जवळपास ९० विद्यार्थी पैनगंगेचे पात्र ओलांडून पळशी येथील शाळेत जातात़सध्या पाऊस सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांनी जीव धोक्यात घालून शाळेत येवू नये, असे आवाहन शाळेच्या शिक्षकांनी केले आहे़ त्यामुळे जोपर्यंत नदीपात्रातील पाणीपातळी कमी होत नाही़ तोपर्यंत या विद्यार्थ्यांना शाळेला सुटीच घ्यावी लागते़ तर काही विद्यार्थी त्यानंतरही जीव धोक्यात घालून शाळेत येतात़ शनिवारी माटाळगा येथील तीन विद्यार्थी नदीपात्रातील कंबरेपर्यंतच्या पाण्यातून शाळेत आले़ परंतु सायंकाळी नदीचे पाणी वाढल्यामुळे त्यांना परत आपल्या गावी जाण्याची पंचाईत झाली़ त्यानंतर शिक्षकांनी त्या मुलांचे नातेवाईक असलेल्या कुपटी, पळशी येथे नेवून सोडले़ या विद्यार्थ्यांना रात्रभर नातेवाईकांकडेच मुक्काम करावा लागला़नातेवाईकांकडे सोडण्याची जबाबदारीही शाळेतील शिक्षकांवरच येवून पडते़ पावसाळ्यात निर्माण झालेल्या या समस्येमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून पाणी कमी होत नाही, तोपर्यंत हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत़मुख्यमंत्र्यांना दिले निवेदनमुख्याध्यापक राजकुमार पेंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोबाईलवर या प्रकाराबाबत माहिती पाठविली होती़ तसेच त्यांना ई-मेलसुद्धा केला आहे़ पिंपरी येथील ओढा ओलांडता येत नसल्यामुळे या ठिकाणी फक्त ३० फुटांचा रस्ता करुन दिल्यास अनेक विद्यार्थ्यांची सोय होणार आहे़ त्याचबरोबर माटाळगा आणि मनुला येथील विद्यार्थ्यांसाठी ५०० मीटरचा रस्ता केल्यास ही समस्या दूर होणार आहे, असेही मुख्याध्यापक पेंदे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे़

टॅग्स :RainपाऊसStudentविद्यार्थी