शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील विद्यार्थ्यांची सर्वाधिक उपस्थिती तर हिंगोलीतील विद्यार्थी अद्यापही घरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:54 IST

नांदेड-कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर टप्या-टप्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते ...

नांदेड-कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर टप्या-टप्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये हिंगोली जिल्हा वगळला तर मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती दिसू लागली आहे. ४ जानेवारी रोजीच्या शिक्षण विभागाच्या अहवालानुसार मराठवाड्यात सर्वाधिक ८५.८ टक्के विद्यार्थी परभणी जिल्ह्यात उपस्थित होते. तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे १२.८ टक्के विद्यार्थीच शाळेमध्ये आले होते.राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात इयत्ता ९ वी ते १२ वीच्या शाळा सुरु केल्या आहेत. राज्यात इयत्ता ९ वी ते १२ वीच्या एकूण २२ हजार २०४ शाळा असून यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या ५६ लाख ४८ हजार २८ इतकी आहे. २३ नोव्हेंबर रोजी यातील ९ हजार १२७ शाळा सुरु होऊन २९ लाख ९१हजार ८३ विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये उपस्थिती लावली होती. त्यानंतर हळूहळू इतर शाळाही सुरु होवू लागल्या. ४ जानेवारीपर्यंत ९ वी ते १२ वी या वर्गाच्या राज्यातील १९ हजार ५२४ शाळा सुरु झाल्या असून १५ लाख ७० हजार ८०७ विद्यार्थी शाळेमध्ये दाखल झाले आहेत.

मराठवाड्यातील शाळांचा विचार करता मराठवाड्यातील इयत्ता ९ वी ते १२वीच्या ४ हजार ७८६ शाळा सुरु झाल्या आहेत. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील ४६५, लातूर जिल्ह्यातील ४९१, जालना जिल्ह्यातील ५१९, औरंगाबाद जिल्हयातील ११२०, बीड जिल्ह्यातील ७६०, नांदेड जिल्ह्यातील ८५४, परभणी जिल्ह्यातील ५३७ तर हिंगोली जिल्ह्यातील १४६ शाळांचा यामध्ये समावेश असून मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ८५.८ टक्के विद्यार्थी शाळेमध्ये हजर झालेले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात हेच प्रमाण ३५.४ टक्के, लातूर ५२ टक्के, जालना ५३.१ टक्के, बीड १८ टक्के, नांदेड ३०.३ टक्के तर हिंगोली जिल्ह्यातील ४ जानेवारी रोजी १२.८ टक्के विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित होते.

चौकट........

सर्वाधिक शाळा नांदेड जिल्ह्यात सुरु

इयत्ता ९ वी ते १२वीच्या शाळांना सध्या प्रारंभ झालेला आहे. यामध्ये सर्वाधिक ९९.५ टक्के शाळा नांदेड जिल्ह्यात सुरु झाल्या आहेत. या शाळामध्ये ४ जानेवारी रोजी ५७ हजार ४१२ विद्यार्थी उपस्थित होते. उस्मानाबाद जिल्हयात ९४.७ टक्के, लातूर ८७.१ टक्के, जालना ९८.७ टक्के, औरंगाबाद ९६.७ टक्के, बीड ९९ टक्के, परभणी ८९.८ टक्के तर हिंगोली जिल्ह्यातील ४८ टक्के शाळा ४ जानेवारीपर्यंत सुरु झालेल्या आहेत.