शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

केदारगुडा आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी गर्भवती प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 1:38 AM

केदारगुडा आदिवासी निवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलगी साडेचार महिन्यांची गर्भवती राहिल्याचा गंभीर व खळबळजनक प्रकार घडूनही येथील मुख्याध्यापक आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगत जबाबदारी झटकत असल्याचा आरोप आहे. ती मुुलगी शाळेत नियमित येत नसल्याचा पुरावाच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे.

हदगाव : केदारगुडा आदिवासी निवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलगी साडेचार महिन्यांची गर्भवती राहिल्याचा गंभीर व खळबळजनक प्रकार घडूनही येथील मुख्याध्यापक आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगत जबाबदारी झटकत असल्याचा आरोप आहे. ती मुुलगी शाळेत नियमित येत नसल्याचा पुरावाच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे.केदारगुडा येथे आदिवासी मुली-मुलांची शासकीय आश्रमशाळा आहे. मुलीसाठी अधीक्षिका असूनही मुलीचे मासिक पाळीचे रिपोर्ट त्यांनी निरंक दाखविले. पीडित मुलगी डिसेंबर महिन्यातही शाळेत उपस्थित असल्याचे हजेरीपटावरुन सिद्ध झाले. तो पुरावाच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. दर महिन्याला मुलीची तपासणी करण्याचा अधिकार अधीक्षिकांना आहे. मुलासाठी स्वतंत्र पुरुष अधीक्षक असतो. मुलीचे जेवण त्यांना स्वतंत्र पुरविण्याची जबाबदारी अधीक्षिकांची असते. त्यांनी दिलेल्या अहवालावर मुख्याध्यापकाची स्वाक्षरी असते. पीडित मुलगी डिसेंबर महिन्यात शाळेत उपस्थित होती. त्या महिन्याच्या तपासणीत तिचा अहवाल निरंक दिला. हा गंभीर प्रकार आहे. याउलट हाती आलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक ए. जे. झुंजारे यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पालकांची भेट घेऊन त्यांना झालेला प्रकार सांगितला व लग्नाचा उपायही सुचविला, असा आरोप आहे. आश्रमशाळेत मुलगी असताना शाळाबाह्य मुले शाळेत येतातच कसे, या प्रश्नाचे उत्तर मुख्याध्यापक देऊ शकत नाहीत. मुलगी शाळेत नियमित येत नसे व मासिक पाळीची तपासणी सहा महिन्याला एकदा होत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगून अधीक्षिकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.या गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी पीओ आले नव्हते तर इतर चौकशीसाठी आल्याचे ते म्हणाले. पण इतर कोणत्या प्रकरणात तपास सुरु आहे, याचे उत्तर मुख्याध्यापकांनी दिले नाही. असा गंभीर प्रकार घडल्यानंतर मुलाला गंभीर शिक्षा असल्यामुुळे ते तत्काळ लग्न करुन स्वत:चा बचाव करुन घेतात. पुन्हा त्या मुलीला वाऱ्यावर सोडून देतात. असे प्रकार यापूर्वी याच शाळेत घडले आहेत. मुख्याध्यापक व स्त्री अधीक्षक या प्रकरणात दोषी असून त्यांच्यावर प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.४मुलीचे लग्न १८ आणि २१ वर्षे झाल्याशिवाय मुलाचा विवाह करता येत नाही. तसा कायदाही आहे. याचाही विसर मुख्याध्यापकांना पडल्याचा दिसतो. या गंभीर प्रकरणामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होतात, याचाही विसर पडल्याचे दिसते. झालेला प्रकार गंभीर असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी तामसा येथील आदिवासी बचाव संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी