शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीने १८ वर्ष पूर्ण होताच ८०० किमीवरील प्रियकराचे घर गाठले, मागोमाग पालकही आले आणि....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 19:02 IST

'ती' ठाण्यासारख्या मेट्रो सिटीतील तर 'तो' हदगाव तालुक्यातील मनाठा या खेड्यातील.

हदगाव (नांदेड): अल्लड वयातील प्रेमाला पूर्णत्वास नेण्यासाठी एका तरुणीने वयाचे १८ वर्ष पूर्ण होताच तब्बल ८०० किमीचा प्रवास करून थेट प्रियकराचे घर गाठले (As young lady completed 18 years, she reached her lover's house by traveling 800 km). ठाणे ते नांदेड जिल्ह्यातील मनाठा असा प्रवास तरुणीने केल्याची घटना रविवारी पुढे आली. दरम्यान, माग काढत पाठीमागे आलेल्या मुलीच्या पालकांनी पोलिसांना कारवाईची मागणी केली. मात्र, पोलिसांनी दोघेही सज्ञान असल्याचे सांगत समजूत काढली. अखेर मुलीच्या पालकांच्याशिवाय त्या तरुण-तरुणीचा विवाह पार पडला. 

'ती' ठाण्यासारख्या मेट्रो सिटीतील तर 'तो' हदगाव तालुक्यातील मनाठा या खेड्यातील. पाचवर्षांपूर्वी ठाण्यात कामानिमित्त आल्यामुळे त्याची आणि तिची ओळख झाली. अल्लड वयात दोघांचेही प्रेम जुडले. मुलीच्या घरी याची भनक लागली. दोघांच्या जाती वेगळ्या असल्याने त्यांनी या नात्यास विरोध केला. यामुळे दोघेही हतबल झाले. शिवाय मुलगी बालिक असल्याने पळून जाऊन लग्नाचा मार्गही बंद होता. दरम्यान, काही कारणास्तव तरुण घरी परतला. मात्र, दोघेही मोबाईलवरून संपर्कात होते. तरुणाने घरी येताच सर्व जबाबदाऱ्या अंगावर घेतल्या. बहिणीचे लग्न लावून दिले, घर बांधले. इकडे वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्याने तरुणीने लग्नाचा आग्रह सुरु केला. दरम्यान, वडिलास अर्धांगवायूचा झटका आल्याने तरुण थोडा विचलित झाला. मात्र, लग्नावर ठाम असलेल्या मुलीने १८ नोव्हेंबरला ठाणे स्टेशन गाठून थेट नांदेड गाठले. येथून तालुक्यातील मनाठा गावी ती आली. 

पोलिसांची साथ, बंधने झुगारून आले एकत्र मुलगी घरातून निघून गेल्याने पालकांनी ठाणे येथील पोलीसात तक्रार दिली. तपासात मोबाईल लोकेशन मनाठा दाखवत असल्याने पालकांनी मुली पाठोपाठ मनाठा गाठले. स्थानिक पोलिसांनी मुलीच्या पालकांनी घटनेची माहिती दिली. यावरून सपोनि विनोद चव्हाण यांनी दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले. यावेळी दोघांनीही वयाची पुरावे सादर केली. दोघेही सज्ञान असल्याने पोलिसांनी कारवाईची मागणी करणाऱ्या मुलीची पालकाची समजूत काढली. पोलिसांनी सहकार्याचा सल्ला दिल्याने मुलीने परजातीचा मुलगा निवडला, खेड्यातील मुलासाठी घर सोडले, असा त्रागा करत पालकांनी तेथून काढता पाय घेतला. अखेर जातीपातीच्या,गरीब-श्रीमंत, शहर-खेडे अशा अनेक जुन्या विचारांच्या भिंती तोडून ते दोघे विवाह बंधनात अडकले. 

टॅग्स :marriageलग्नNandedनांदेडthaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस