शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

किनवट तालुक्यावर दुष्काळाची छाया; २१ प्रकल्पांपैक्की ५ मृत तर इतरांमध्ये २० टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 2:01 PM

किनवट तालुक्यातील २१ पैकी पाच प्रकल्पांतील जलसाठा हा मृत अवस्थेत असून हे पाच प्रकल्प कोरड्या अवस्थेत आहेत़ उर्वरित प्रकल्पात केवळ २० टक्केच जलसाठा असल्याने मे अखेर या प्रकल्पाची काय परिस्थिती राहील हे काळच सांगेल़

नांदेड : किनवट तालुक्यातील २१ पैकी पाच प्रकल्पांतील जलसाठा हा मृत अवस्थेत असून हे पाच प्रकल्प कोरड्या अवस्थेत आहेत़ उर्वरित प्रकल्पात केवळ २० टक्केच जलसाठा असल्याने मे अखेर या प्रकल्पाची काय परिस्थिती राहील हे काळच सांगेल़

आजघडीला असलेला प्रकल्पातील जलसाठा याप्रमाणे- नागझरी-५७़५८, लोणी-२३़३३, डोंगरगाव-८१़७३, मुळझरा-१३़५८, थारा-८९़९३, जलधरा-८४़४८, हुडी-२०़७५, पिंपळगाव (कि़)-१७़२१, सिंदगी (बोधडी)-७४़००, लक्कडकोट-१०़५६, निराळा-२४़२० टक्केच असल्याने ऐन उन्हाळ्यात प्रकल्पाखालील गावांत पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची चिन्हे असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे़ 

प्रकल्पाची ही परिस्थिती पाहता तलावातील गाळ  काढण्याचा  उपक्रम प्रशासनाने शेतकर्‍यांवर कोणताही बोजा न टाकता हाती घ्यावा़ गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना  प्रभावीपणे राबवावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत़ गाळात रुतलेले प्रकल्प गाळमुक्त झाल्यास पाणीसाठा वाढून तसेच गाळ शेतात पडल्यास शेतकरी सुजलाम्-सुफलाम् होण्यास मदत होईल, नव्हे उत्पन्नात वाढ होईल. 

किनवट तालुक्यात नागझरी, लोणी, डोंगरगाव मध्यम प्रकल्प आहेत़  उर्वरित १८ प्रकल्प हे लघू व बृहत आहेत़ १ हजार २४० मि़मी़ इतकी वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी असलेल्या तालुक्यात केवळ ४६ टक्केच्या आतच पाऊस पडल्याने व तोही कधी भीज तर कधी रिमझीम़ मोठा पाऊस पडलाच नसल्याने प्रकल्प भरलेच नाहीत़ जे भरले त्यात गाळाचे प्रमाण अधिक असल्याने जानेवारीत अंबाडी-नंदगाव, वरसांगवी, सिरपूर, मांडवी हे पाच प्रकल्प कोरड्या स्थितीत म्हणजे मृतसाठा असलेली आहेत़ निचपूर-०़७२, कुपटी-२़८५, सिंदगी-५़८३, पिंपळगाव मि़-२़२५ व सावरगाव २़४८ अशा एक अंकीच टक्के जलसाठा असल्याने तीही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत़

टॅग्स :WaterपाणीNandedनांदेड