शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

विष्णूपुरीत पोहोचले सात दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:42 IST

भीषण नांदेडकरांसाठी सिद्धेश्वर धरणातून १० जून रोजी पाणी सोडण्यात आले होते़ हे पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यात आले असून तब्बल पंधरा दिवसानंतर विष्णूपुरी प्रकल्पात सोडलेल्या १४ दलघमीपैकी ७ दलघमी पाणी पोहोचले आहे़

ठळक मुद्देसिद्धेश्वर प्रकल्प १० जूनला सोडले होते १४ दलघमी पाणी

नांदेड : भीषण नांदेडकरांसाठी सिद्धेश्वर धरणातून १० जून रोजी पाणी सोडण्यात आले होते़ हे पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यात आले असून तब्बल पंधरा दिवसानंतर विष्णूपुरी प्रकल्पात सोडलेल्या १४ दलघमीपैकी ७ दलघमी पाणी पोहोचले आहे़ या पाण्यामुळे विष्णूपुरीच्या पाणीपातळीत ३ फुटांनी वाढ झाली आहे़ त्यामुळे टंचाईचा सामना करणाऱ्या नांदेडकरांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे़नांदेडकरांची तहान भागवणारा विष्णूपुरी प्रकल्प ३० मे पासूनच कोरडा झाला होता़ त्यामुळे पाण्यासाठी शहरवासियांची भटकंती सुरू आहे़ शहरातील अनेक भागांत आठ-आठ दिवस पाणीपुरवठा झाला नाही़ महापालिकेकडून सुरु करण्यात आलेल्या टँकरची संख्याही अपुरी आहे़ त्यामुळे नांदेडकरांना हजारो रुपये खर्च करुन खाजगी टँकरचालकाकडे धाव घ्यावी लागत आहे़विष्णूपुरी कोरडा पडल्यानंतर येलदरी, दिग्रस हे प्रकल्पही कोरडेच होते. त्यामुळे पाणी कुठून आणणार असा प्रश्न होता़ पालकमंत्री रामदास कदम यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत सिद्धेश्वर धरणातून पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता़सिद्धेश्वर प्रकल्पातून विष्णूपुरीमध्ये पाणी आणणे अवघड काम होते़ त्यासाठी मार्गातील अडथळे दूर करण्याचे काम प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले होते़ त्यानंतर १० जून रोजी सिद्धेश्वर धरणातून विष्णूपुरीकडे पाणी झेपावले़ तब्बल १२० किमीचा प्रवास या पाण्याने केला आहे़ सिद्धेश्वरमधून १२३ क्युसेस विसर्ग सुरू आहे.प्रतितास १ किलोमीटर या वेगाने पाणी नांदेडमध्ये दाखल झाले़ विष्णूपुरीपर्यंत येताना पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यवही झाला़ वसमत येथील वापरात नसलेला तलाव भरुन घेण्यात आला़ या पाण्यावर देखरेखीसाठी असलेल्या पथकांना याचा थांगपत्ताही लागला नाही़सिद्धेश्वरमधून १४ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने हे पाणी सोडण्यात आले असून २५ जूनपर्यंत प्रकल्पात ७ दलघमी एवढे पाणी पोहोचले होते़ या पाण्यामुळे विष्णूपुरीच्या पातळील ३ फुटांनी वाढ झाली आहे़विष्णूपुरीतून ३० दलघमी पाणी आरक्षित४नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो़ चालू वर्षी ३० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले होते़ त्यातच दिग्रस बंधाºयातूनही नांदेडला पाणी घेण्यात आले होते़ परंतु ते पाणीही संपल्यामुळे नांदेडकरांवर पाणीटंचाईचे संकट कोसळले होते़ मात्र पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने आणि विष्णूपुरी प्रकल्पातून अवैधरित्या होणारा पाणी उपसा रोखण्यास प्रशासनाला अपयश आल्याने मे मध्येच पाण्यासाठी भटकंती करावी लागली़ पाऊस लांबत चालली असून पाणी जपून वापरण्याची गरज आहे़

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणwater shortageपाणीटंचाईNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका