शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

सरपंच संघटना पुन्हा तेलंगणा मुद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 12:51 AM

तालुक्यासाठी मंजूर झालेल्या निधीला जिल्हा परिषद विभाग एनओसी देत नसल्याने संतप्त झालेल्या सरपंच संघटनेने धर्माबाद पंचायत समितीसमोर ३ जानेवारी रोजी उपोषण सुरू केले़

धर्माबाद : तालुक्यासाठी मंजूर झालेल्या निधीला जिल्हा परिषद विभाग एनओसी देत नसल्याने संतप्त झालेल्या सरपंच संघटनेने धर्माबाद पंचायत समितीसमोर ३ जानेवारी रोजी उपोषण सुरू केले़ उपोषणास तालुक्यातील सरपंच व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली़ दरम्यान, संघटनेने पुन्हा तेलंगणा राज्यात धर्माबाद तालुक्याचा समावेश करण्याची मागणी सुरू झाली आहे़धर्माबाद तालुक्याचा विकास करा अन्यथा चाळीस गावे तेलगंणात समाविष्ट करा, ही मागणी सरपंच संघटनेने केल्यानंतर शासनाची झोप उडाली होती़ त्यावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री रामदास कदम यांना निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या.पालकमंत्री रामदास कदम यांनी धर्माबाद तालुक्याच्या विकासासाठी ४० कोटी रूपयांची निधी मंजूर करून त्यातील १४ कोटी रूपये विविध कामाच्या विकासकामासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविले आहे. परंतु सदरील विकासकामे जि. प. अंतर्गत असल्यामुळे विकासकामे सुरू करण्यासाठी जि. प. ची नाहरकत घेणे बंधनकारक आहे.सदरील कामासाठी आलेला निधी जि. प. मार्फत कामे व्हावे, यासाठी जि.प. सदस्यांनी अडचणी निर्माण करून नाहरकत देण्यासाठी विरोध करीत असल्यामुळे जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे.तालुक्यातील दोन जि. प. सदस्य उपोषणाकडे फिरकलेच नाहीत. विकासकामांच्या निधीतून आपला विकास कसा करता येईल याकडे दोन्ही जि.प.सदस्य विचार करीत असल्याचा आरोप करण्यात आला़ सदरील कामासाठी ना हरकत तात्काळ देण्यात यावे, अन्यथा यापुढील आंदोलन उग्र करण्यात येणार असल्याचे सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबूराव कदम यांनी सांगितले़यावेळी सरपंच विनोद जोगंदड, गोविंद मोकलीकर, शिवदर्शन दाणेकर, राम रोनटेवार, कुशलराव गुंडाळे, अनिल कोलेवाड, संतोष कावडे, बानाबाई जिंकलोर, राधिका राजूरे, मौलाना पठाण, आसिफअल्ली सय्यद अल्ली, बाबूराव जगदंबे, सुरेखा उमरे, साईनाथ ताकलोड, विजय गिरी, लक्ष्मण धनूरे, माजी उपनगराध्यक्ष रमेशचंद्र तिवारी, माजी नगरसेवक रवींद्र शेट्टी, मतीनभाई, शंकर पाटील होट्टे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष रामचंद्र रेड्डी, शिवसेना संघटक गणेश गिरी, शहर प्रमुख राजू सिरामणे, बालाजी बनसोडे, मनोज मनूरकर, आनंदा गायकवाड यांच्यासह शेकडोंच्या संख्येने तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.१४ कोटी विकासासाठी प्रशासनाला पाठविलेपालकमंत्री रामदास कदम यांनी धर्माबाद तालुक्याच्या विकासासाठी ४० कोटी रूपयांची निधी मंजूर करून त्यातील १४ कोटी रूपये विविध कामाच्या विकासकामासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविले आहेत. परंतु सदरील विकासकामे जि.प.अंतर्गत असल्यामुळे विकासकामे सुरू करण्यासाठी जि.प.ची ना हरकत घेणे बंधनकारक आहे.

टॅग्स :Nandedनांदेडagitationआंदोलनsarpanchसरपंच