शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

संघ, भाजपाकडून राज्यघटनेला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:32 AM

अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच भाजपाने घटना पुनर्विलोकन समिती नियुक्ती केली होती. मात्र काँग्रेसच्या प्रखर विरोधानंतर तत्कालीन भाजपा सरकारला माघार घ्यावी लागली होती. आजही काही मंत्री भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात.

ठळक मुद्देकाँग्रेस आक्रमक कुमार केतकर, राजू वाघमारे, कमलकिशोर कदम यांचा आरोप

नांदेड : अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच भाजपाने घटना पुनर्विलोकन समिती नियुक्ती केली होती. मात्र काँग्रेसच्या प्रखर विरोधानंतर तत्कालीन भाजपा सरकारला माघार घ्यावी लागली होती. आजही काही मंत्री भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात. हे बरळत नाहीत तर ठरवून बोलतात, असे सांगत राष्टÑीय स्वयंसेवक संघ, भाजपाकडून घटनेला धोका असून या संघटनांचे मनुस्मृती आधारित व्यवस्था आणण्याचे कारस्थान असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी केला.खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ खा. कुमार केतकर यांच्यासह राजू वाघमारे, कमलकिशोर कदम नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. यावेळी कमलकिशोर कदम म्हणाले की, नरेंद्र मोदी, अमित शहा हे देशावरील सर्वात मोठे संकट आहे. देशातील लोकशाही संपवून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपाच्या वर्तनावरुन स्पष्ट होत आहे. विकासाची आश्वासने देवून सत्तेत आलेल्या भाजपाने मागील पाच वर्षे केवळ खोटे बोलून सर्वसामान्यांची फसवणूक करण्याचे काम केले. भाजपाचे लोक देशवासियांना जातीपातीच्या राजकारणात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही कमलकिशोर कदम यांनी केला. काँग्रेससोबत काही ठिकाणी आमचे वैचारिक मतभेदही होतात. मात्र वैयक्तिक पातळीवर येवून आम्ही कधीही राजकारण केले नसल्याचे सांगत खा. अशोकराव चव्हाण यांना निवडून देणे काळाची गरज असल्याचे कदम म्हणाले.खा. कुमार केतकर यांनीही भाजपाचा समाचार घेतला. देशात काँग्रेसमुळेच विकास झाल्याचे सांगत नांदेडलाही शंकरराव चव्हाण आणि त्यानंतर अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्व लाभल्यानेच या भागाचा कायापालट झाल्याचे ते म्हणाले. विशेषत: मराठवाड्यातील सिंचनक्षेत्र वाढीसाठी शंकरराव चव्हाणांनी दिलेले योगदान ऐतिहासिक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याचे सरकार सर्वस्तरातील नागरिकांची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न करीत आहे. मोदी, शहा यांची ही हुकूमशाहीची राजवट बाजूला सारुन सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या काँग्रेसला बळ देण्याची आवश्यकता केतकर यांनी व्यक्त केली.राजू वाघमारे यांनी विद्यमान भाजपा सरकार रिझर्व्ह बँक, सीबीआय यासारख्या देशातील सार्वजनिक संस्था मोडीत काढून देशात अराजकता माजविण्याचा प्रयत्न करीत आहे. निवडणूक आयोगाने तंबी दिल्यानंतरही खुद्द पंतप्रधानच शहीद जवानांच्या आडून भाजपाला मते मागत आहेत. हा प्रकार संतापजनक असल्याचे सांगत भाजपाच्या अशा पद्धतीच्या वर्तवणुकीमुळे देशात लोकशाहीचा खून होत असल्याचे वाघमारे म्हणाले. भाजपाप्रणीत असलेल्या एका सहयोगी संस्थेकडूनच संसदेपासून अगदी काही अंतरावर भारतीय राज्यघटना जाळण्याचे पाप झाले. विशेष म्हणजे या धक्कादायक प्रकाराबाबत ना मोदी काही बोलले, ना अमित शहा. अशा प्रकारे चुप्पी साधून एकप्रकारे भाजप राज्यघटनेला विरोध करणाऱ्यांना मूक पाठिंबाच देत असल्याचा आरोपही वाघमारे यांनी केला.विकासाची दृष्टी काँग्रेसकडेचदेशात टीव्ही, मोबाईल काँग्रेसच्या राजीव गांधींनी आणून आधुनिक क्रांती केली. मात्र मागील पाच वर्षांत विकासाची ही प्रक्रिया थांबली आहे.भाजपाकडून दुहीचे राजकारणसर्व जाती, धर्मांना सोबत घेऊन पुढे जाण्याची काँग्रेसची वृत्ती आहे. मात्र जाती, धर्मात तेढ वाढवून भाजपा देशात दुहीचे राजकारण करत आहे.अशोक चव्हाणच सक्षम नेतृत्वपाच वर्षांतील युतीच्या कारभारामुळे विकासकामांना खीळ बसली आहे. नांदेडच्या विकासासाठी अशोक चव्हाण हेच सक्षम नेतृत्व आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपाAshok Chavanअशोक चव्हाण