शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार पावणे तीन कोटींची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 19:55 IST

एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी  शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्दे मराठवाड्यातील ४ हजार ९२० शेतकऱ्यांना २ कोटी ८३ लाखांची नुकसान भरपाई मिळणार आहे.

- विशाल सोनटक्के

नांदेड : एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी  शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे मराठवाड्यातील ४ हजार ९२० शेतकऱ्यांना २ कोटी ८३ लाखांची नुकसान भरपाई मिळणार आहे. यासंदर्भातील पत्र नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाला बुधवारी प्राप्त झाले आहे. 

ही मदत महसूल व कृषी विभागाच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्याबाबत देण्यात येणार आहे. ही रक्कम बाधितांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबरोबरच रक्कम खात्यात जमा करताना कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करु नये. याबरोबरच नुकसान भरपाईचे वाटप केल्यानंतर सदर लाभार्थ्यांची यादी त्यांना प्रदान केलेल्या रक्कमेच्या माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहे. 

नांदेड-लातूरला सर्वाधिक नुकसानभरपाईएप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच अवेळी पाऊस झाल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मराठवाड्यातील ३ हजार ८८१ हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसला होता. शासनाने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईत लातूर जिल्ह्याला सर्वाधिक ९२ लाख ७६ हजार तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८५ लाख ४० हजार रुपये मिळणार आहेत. औरंगाबाद १० लाख २९ हजार, जालना- १२ लाख २९ हजार, परभणी- ७० लाख, ७ हजार, बीड- ६ लाख ७७ हजार, हिंगोली ५ लाख १९ हजार तर उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन बाधित शेतकऱ्यांना २४ हजारांची नुकसान भरपाई मिळणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीfundsनिधीRainपाऊसState Governmentराज्य सरकारMarathwadaमराठवाडा