शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

मागासवर्गीयांचे आरक्षण काढण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:35 IST

भारतीय राज्यघटनेला सध्या धोका निर्माण झाला असून मागासवर्गीय समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचा डाव हे सरकार करू पाहत आहे. या सरकारचा डाव आंबेडकरवादी जनतेनी ओळखला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉ. धनराज डहाट यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : भारतीय राज्यघटनेला सध्या धोका निर्माण झाला असून मागासवर्गीय समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचा डाव हे सरकार करू पाहत आहे. या सरकारचा डाव आंबेडकरवादी जनतेनी ओळखला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉ. धनराज डहाट यांनी केले.सत्यशोधक विचारमंच व फुले-आंबेडकर विचारधारा नांदेडच्या वतीने डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डहाट बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले, उद्घाटक दीपक कदम, प्रा. फकरोद्दीन बेनुर, डॉ. बबन जोगदंड, स्वागताध्यक्ष सायलू म्हैसेकर, निमंत्रक डॉ. नागेश कल्याणकर, शीलवंत वाढवे, डॉ. विशाखा कांबळे, महापौर शीला भवरे, रमणी सोनवणे, डॉ. डी.टी. गायकवाड, विलास सिंदगीकर, किशोर भवरे, विजय सोंडारे, भीमराव हटकर, कोंडदेव हटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.डहाट म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देताना सर्वप्रथम ओबीसी समाजाचा विचार केला होता. त्यानंतर इतर मागासवर्गीय समाजाचा त्यांनी विचार केला. सध्याचे सरकार मागासवर्गीय समाजाचे आरक्षण बाद करण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करणारे कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आदींची हत्या झाली. ही बाब चुकीची असून समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले़देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने परिवर्तन होईल. डॉ. आंबेडकरांचे विचार आणि आचार समजून घेतले पाहिजे. समाजाच्या विकासासाठी साहित्याची निर्मिती आवश्यक असल्याचेही डाहाट यांनी सांगितले.प्रास्ताविक सत्यशोधक विचारमंचचे अध्यक्ष कोंडदेव हाटकर यांनी केले. त्यांनी १९९८ पासून साहित्य संमेलनाची केलेली सुरूवात त्यात लाभलेल्या अनेक मान्यवरांची उपस्थिती याबद्दल सविस्तर माहिती देवून मागील संमेलनातील आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. नागेश कल्याणकर यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराची गरज समाजाला असल्याचे सांगितले़डॉ. दीपक कदम यांनी मागासवर्गीय समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असून ते वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले़कार्यक्रमात सत्यशोधक समाज भूषण पुरस्काराने पत्रकार प्रशांत गवळे तर अ‍ॅड. विजय गोणारकर, कुंवरचंद मंडले आदींना सन्मानित करण्यात आले. यशस्वीतेसाठी एन.डी. गवळे, कोंडदेव हाटकर, श्रावण नरवाडे, निमंत्रण डॉ. नागेश कल्याणकर, एन.डी. डोंगरे, संजय जाधव, एम.डी. जोंधळे, एस. ढगे, एन. टी. पंडित, राजा गोडबोले आदींनी परिश्रम घेतले.