शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मागासवर्गीयांचे आरक्षण काढण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:35 IST

भारतीय राज्यघटनेला सध्या धोका निर्माण झाला असून मागासवर्गीय समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचा डाव हे सरकार करू पाहत आहे. या सरकारचा डाव आंबेडकरवादी जनतेनी ओळखला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉ. धनराज डहाट यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : भारतीय राज्यघटनेला सध्या धोका निर्माण झाला असून मागासवर्गीय समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचा डाव हे सरकार करू पाहत आहे. या सरकारचा डाव आंबेडकरवादी जनतेनी ओळखला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉ. धनराज डहाट यांनी केले.सत्यशोधक विचारमंच व फुले-आंबेडकर विचारधारा नांदेडच्या वतीने डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डहाट बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले, उद्घाटक दीपक कदम, प्रा. फकरोद्दीन बेनुर, डॉ. बबन जोगदंड, स्वागताध्यक्ष सायलू म्हैसेकर, निमंत्रक डॉ. नागेश कल्याणकर, शीलवंत वाढवे, डॉ. विशाखा कांबळे, महापौर शीला भवरे, रमणी सोनवणे, डॉ. डी.टी. गायकवाड, विलास सिंदगीकर, किशोर भवरे, विजय सोंडारे, भीमराव हटकर, कोंडदेव हटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.डहाट म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देताना सर्वप्रथम ओबीसी समाजाचा विचार केला होता. त्यानंतर इतर मागासवर्गीय समाजाचा त्यांनी विचार केला. सध्याचे सरकार मागासवर्गीय समाजाचे आरक्षण बाद करण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करणारे कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आदींची हत्या झाली. ही बाब चुकीची असून समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले़देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने परिवर्तन होईल. डॉ. आंबेडकरांचे विचार आणि आचार समजून घेतले पाहिजे. समाजाच्या विकासासाठी साहित्याची निर्मिती आवश्यक असल्याचेही डाहाट यांनी सांगितले.प्रास्ताविक सत्यशोधक विचारमंचचे अध्यक्ष कोंडदेव हाटकर यांनी केले. त्यांनी १९९८ पासून साहित्य संमेलनाची केलेली सुरूवात त्यात लाभलेल्या अनेक मान्यवरांची उपस्थिती याबद्दल सविस्तर माहिती देवून मागील संमेलनातील आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. नागेश कल्याणकर यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराची गरज समाजाला असल्याचे सांगितले़डॉ. दीपक कदम यांनी मागासवर्गीय समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असून ते वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले़कार्यक्रमात सत्यशोधक समाज भूषण पुरस्काराने पत्रकार प्रशांत गवळे तर अ‍ॅड. विजय गोणारकर, कुंवरचंद मंडले आदींना सन्मानित करण्यात आले. यशस्वीतेसाठी एन.डी. गवळे, कोंडदेव हाटकर, श्रावण नरवाडे, निमंत्रण डॉ. नागेश कल्याणकर, एन.डी. डोंगरे, संजय जाधव, एम.डी. जोंधळे, एस. ढगे, एन. टी. पंडित, राजा गोडबोले आदींनी परिश्रम घेतले.