शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांचे आरक्षण काढण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:35 IST

भारतीय राज्यघटनेला सध्या धोका निर्माण झाला असून मागासवर्गीय समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचा डाव हे सरकार करू पाहत आहे. या सरकारचा डाव आंबेडकरवादी जनतेनी ओळखला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉ. धनराज डहाट यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : भारतीय राज्यघटनेला सध्या धोका निर्माण झाला असून मागासवर्गीय समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचा डाव हे सरकार करू पाहत आहे. या सरकारचा डाव आंबेडकरवादी जनतेनी ओळखला पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉ. धनराज डहाट यांनी केले.सत्यशोधक विचारमंच व फुले-आंबेडकर विचारधारा नांदेडच्या वतीने डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डहाट बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले, उद्घाटक दीपक कदम, प्रा. फकरोद्दीन बेनुर, डॉ. बबन जोगदंड, स्वागताध्यक्ष सायलू म्हैसेकर, निमंत्रक डॉ. नागेश कल्याणकर, शीलवंत वाढवे, डॉ. विशाखा कांबळे, महापौर शीला भवरे, रमणी सोनवणे, डॉ. डी.टी. गायकवाड, विलास सिंदगीकर, किशोर भवरे, विजय सोंडारे, भीमराव हटकर, कोंडदेव हटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.डहाट म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देताना सर्वप्रथम ओबीसी समाजाचा विचार केला होता. त्यानंतर इतर मागासवर्गीय समाजाचा त्यांनी विचार केला. सध्याचे सरकार मागासवर्गीय समाजाचे आरक्षण बाद करण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करणारे कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी आदींची हत्या झाली. ही बाब चुकीची असून समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले़देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने परिवर्तन होईल. डॉ. आंबेडकरांचे विचार आणि आचार समजून घेतले पाहिजे. समाजाच्या विकासासाठी साहित्याची निर्मिती आवश्यक असल्याचेही डाहाट यांनी सांगितले.प्रास्ताविक सत्यशोधक विचारमंचचे अध्यक्ष कोंडदेव हाटकर यांनी केले. त्यांनी १९९८ पासून साहित्य संमेलनाची केलेली सुरूवात त्यात लाभलेल्या अनेक मान्यवरांची उपस्थिती याबद्दल सविस्तर माहिती देवून मागील संमेलनातील आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. नागेश कल्याणकर यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराची गरज समाजाला असल्याचे सांगितले़डॉ. दीपक कदम यांनी मागासवर्गीय समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असून ते वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले़कार्यक्रमात सत्यशोधक समाज भूषण पुरस्काराने पत्रकार प्रशांत गवळे तर अ‍ॅड. विजय गोणारकर, कुंवरचंद मंडले आदींना सन्मानित करण्यात आले. यशस्वीतेसाठी एन.डी. गवळे, कोंडदेव हाटकर, श्रावण नरवाडे, निमंत्रण डॉ. नागेश कल्याणकर, एन.डी. डोंगरे, संजय जाधव, एम.डी. जोंधळे, एस. ढगे, एन. टी. पंडित, राजा गोडबोले आदींनी परिश्रम घेतले.