शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

'मराठा समाजासाठी राजीनामा द्या'; अशोक चव्हाणांच्या कार्यक्रमात आंदोलकांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 16:33 IST

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून याचा फटका राजकारण्यांना बसत आहे.

- गोविंद टेकाळे अर्धापूर (जिल्हा नांदेड) : कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाणांच्या अर्धापूर येथील एका कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. मराठा समाजासाठी राजीनामा द्या, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले.

अर्धापूर शहरात वडगाव ( ता. हदगाव) येथील तरूणाने, नायगाव तालुक्यातील भोपळा येथील विद्यार्थी आणि हिमायत नगर येथील एका तरुणाने अशा जिल्ह्यातील तिघांनी मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांत आत्महत्या केली. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून याचा फटका राजकारण्यांना बसत आहे. आज तालुक्यातील भाऊराव कारखाना येथील कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाण उपस्थित होते.यावेळी भास्करराव खतगावकर, अमर राजूरकर, आ.मोहन हंबर्डे, आ. जितेश अंतापूरकर, ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष गोविंद नागेलीकर आदींची उपस्थिती होती. दरम्यान, चव्हाण भाषण करत असतानाच मराठा आरक्षणाची मागणी करत काही तरुणांनी घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाच्या सन्मानार्थ राजीनामा द्या., अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांचे कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पिंपळगाव महादेव येथील जगन कल्याणकर, दिगंबर कल्याणकर व शैलेश कल्याणकर अशी आंदोलकांची नावे आहेत.

अर्धापुरातील प्रत्येक गावात नेत्यांना गावबंदी..सोमवारी अर्धापूर येथील सकल मराठा  समाजाने प्रत्येक गावात मुख्य ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नेत्यांना गाव बंदीचे फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात नेत्यांना गावबंदी केली आहे. नेत्यांना तालुका बंदीचे फलक लवकरच लावण्यात येतील अशी माहिती संयोजक समितीने दिली आहे.

मीच टार्गेट का ?मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. मात्र, माझ्या भागातील आंदोलक मलाच टार्गेट का करत आहेत ? तिकडे लोहा, कंधार, मुखेड या भागात का आंदोलने होत नाहीत?  हे मराठा समाजाच्या आपल्या पोरांनी समजून घेतले पाहिजे. आरक्षण देणे हा राज्याचा विषय नसून केंद्राचा विषय आहे. ईडब्ल्यूएस च्या धर्तीवर केंद्राने आरक्षण दिले पाहिजे, असे आ. चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाण