शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

देशातील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात; राहुल गांधींनी यावर बोलावे, प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

By सुमेध उघडे | Updated: November 5, 2022 18:54 IST

गुजरात निवडणुकीनंतर देशातील धार्मिक स्वातंत्र्य नष्ट होईल प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले भाकीत

 नांदेड: धम्मदीक्षा सोहळ्यात सहभाग घेतल्याने २२ प्रतिज्ञावरून आपचे मंत्री राजेंद्र पाल यांनी राजीनामा द्यावा लागला आहे. देशातील धार्मिक स्वातंत्र्य गुजरात विधानसभा निवडणुक निकालानंतर नष्ट होईल, असे भाकीत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांनी याबाबत कोणती तरी भूमिका घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

नांदेड येथे आज झालेल्या धम्म मेळाव्यात बाळासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. पुढे देशात एकीकडे संविधानाची समतेची तर दुसरीकडे मनुस्मृतीची असमतेची व्यवस्था सुरु आहे. मनुस्मृती जाळा,जातीवर आधारित पुरोहित वर्गावर कायद्याने बंदी आणा. हिंदू विश्वविद्यालय उघडा. यातून डिग्री घेऊन बाहेर पडणाराच पुजाराचा अर्चा करेल. हे मान्य असेल तर आम्ही आरआरएस सोबत जाऊ, असे खुले आव्हान आंबेडकरांनी केले

आयातनीतीतून मोठा भ्रष्टाचारनरेंद्र मोदींच्या आयातनीतीतून मोठा भ्रष्टाचार होत आहे. पाम तेलाची आयात मोदींनी बंद केली पण व्यापाऱ्यांनी तेच तेल आयात करून महाग विंकल. इथिनोल वापरायची परवानगी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या उसाला जास्त भाव मिळायला हवा पण तो मिळत नाही, कापसाचे भाव १२ हजारापर्यंत गेला पाहिजे. पण सरकार व्यापाऱ्यांचे असल्याने देखील भाव मिळणार नाही. आयात करून आफ्रिकेतून स्वस्त कापूस येत आहे सरकारने आयातीस का परवानगी दिली हे राहुल गांधी यांनी मोदींना विचारावे.

देशातील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यातआम्ही लॉंगमार्च काढले आहेत. रोज यात्रेत चालणे कष्टाचे आहे. यातून राहून गांधी यांचे व्यक्तिमत्व बदलत आहे. पण यातून प्रश्न विचारले जात नाहीत. यात्रा झाली की पुन्हा सोनिया गांधी, राहूल गांधी यांच्यावर सुब्रमण्यम स्वामी प्रश्न विचारातील. यामुळे भारत जोडो यात्रेतून मोदींनी प्रश्न विचारावेत अन्यथा हा एक बुडबुडा ठरेल. दिल्लीत आपचे एक मंत्री राजेंद्र पाल धम्मदीक्षा समारंभात उपस्थित होते. त्यावेळी घेण्यात आलेल्या २२ प्रतिज्ञावरून पाल यांना राजीनामा द्यावा लागला. देशातील धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. यावर राहुल गांधी यांनी काहीतरी बोलावे, भूमिका घ्यावी, काहीच मत न मांडणे हे सगळ्यात धोकादायक असते.गांधी यांनी नांदेडच्या सभेत यावर बोलावे असे आवाहन आंबडेकर यांनी केले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRahul Gandhiराहुल गांधीNandedनांदेड