शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

लालपरी असुरक्षित, अग्निशमन यंत्र, प्रथमोपचार पेट्याही गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:50 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागात जवळपास साडेसहाशे बसगाड्या आहेत. त्यापैकी साडेचारशे ते पाचशे बस नियमित रस्त्यावर असतात. ...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागात जवळपास साडेसहाशे बसगाड्या आहेत. त्यापैकी साडेचारशे ते पाचशे बस नियमित रस्त्यावर असतात. प्रवाशांना सुरक्षित आणि कमी खर्चात प्रवास देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यात धावणाऱ्या तसेच नांदेड विभागातून मुंबई, नागपूर, कोल्हापूर, लातूर, शेगाव, औरंगाबाद, बीड आदी लांब पल्ल्यासाठी धावणाऱ्या बसलादेखील सोयी-सुविधा नसल्याचे चित्र दिसत आहे. या गाड्यामध्ये ना अग्निशमन यंत्रणा ना प्रथमोपचार पेट्या, अशी अवस्था आहे. पूर्वी पाट्यांचा वापर करून प्रवाशांना बस कुठे चालली, याची माहिती मिळत होती; परंतु आजच्या स्थितीत बहुतांशी गाड्याच्या काचावर चुन्याने नावे टाकली जातात. ती अनेक वेळा मिटवली जात नाहीत, त्यामुळे बस नेमकी कोणत्या गावाला चालली, हेच प्रवाशांच्या लक्षात येत नाही.

चौकट

प्रथमोपचार पेट्याही गायब

बसला किरकोळ अपघात झाला अथवा प्रवासात एखाद्या प्रवाशाला काही इजा पोहोचली तर त्यांना वेळीच प्रथमोपचार मिळावा. या उद्देशाने सर्वच गाड्यामध्ये प्रथमोपचार पेट्या, किट ठेवलेली असते; परंतु नांदेड आगार आणि विभागातील जवळपास सर्वच बसमधील प्रथमोपचार पेट्या गायब झाल्याचे दिसून येत आहे. तर ज्या बसमध्ये पेट्या आहेत, त्यात उपचारासाठी लागणारे कोणतेही साहित्य आढळून आले नाही. त्यामुळे सर्व गाड्यामध्ये तपासणी करून मेडिकल किट ठेवण्याची गरज आहे.

आगारात आओ जाओ घर तुम्हारा

नांदेड आगारात पोलीस चौकी आहे; परंतु ती केवळ नावालाच आहे. बसस्थानकातच काय आगारात कुठेही, कोणत्याही कार्यालयाच्या केबिनमध्ये चक्कर मारा, तुम्हाला कोणीही हटकणार नाही. बसस्थानकात फेरफटका मारून बस चालविण्याचा प्रयत्न केला तरी कोणीही विचारणा केली नाही. उलट प्रवाशांनी बस कुठे चालली, अशी विचारणा करून बसमध्ये बसू देण्याची विनंती केली.

हा तर स्मोकिंग झोन

बसस्थानक परिसरातील अस्वच्छता आणि दुर्गंधीला प्रवासी की प्रशासन जबाबदार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जवळपास सर्वच प्रवासी लघुशंकेसाठी बसस्थानकाच्या संरक्षक भिंतीचा सहारा घेतात. तर प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या पानटपऱ्या आणि हॉटेलमध्ये बिनधास्तपणे सिगारेट, बिडी ओढणारे टोळकेच्या टोळके बसलेले असतात. त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने या ठिकाणी स्मोकिंग झोन असल्याचाच भास होतो.

वायफाय सुविधा नावालाच

बसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली त्यावेळी शासनाने मोठा गाजावाजा केला; परंतु अल्पावधीतच ही योजना फेल ठरली. बऱ्याच प्रवाशांना बसमध्ये वायफाय सेवा असते अथवा होती, हेदेखील माहिती नाही. त्यामुळे वायफायपेक्षा सुरक्षित आणि सवलतीत प्रवास द्यावा, अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करत आहेत.