शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

शिवाजी महाराजांच्या जयघोषाने भाषणाची सुरुवात, यात्रेला कोणीही रोखू शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 11:36 PM

७ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३६ वाजता खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा देगलूरमध्ये दाखल झाली

देगलूर (जि. नांदेड) : छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष करत खासदार राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. एवढ्या उशिरापर्यंत आपण माझे स्वागत करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही यात्रा सरळ ठरल्याप्रमाणे श्रीनगर येथे जाऊनच थांबेल. त्याला कोणतीही शक्ती अथवा आंधी, तुफान रोखू शकत नाही, असे खासदार राहुल गांधी यांनी देगलूरमध्ये उपस्थितांना मागदर्शन करताना केले.

७ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३६ वाजता खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा देगलूरमध्ये दाखल झाली. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदींनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून खासदार राहुल गांधी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, देशातील जनतेविषयी, सामान्यांविषयी असलेली नफरत, क्रोध संपवायचा आहे, बंधुभाव वाढवायचा आहे. यात्रेत आम्ही कुठल्याही प्रकारची भाषणबाजी करीत नाहीत. सकाळी ६ वाजता सुरू झालेल्या पदयात्रेत व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, मजूर, गोरगरीब, कष्टकरी आम्हाला भेटून संवाद साधतात. त्या सर्वांसाठी आमच्या मनाचे दरवाजे आणि दिल खुले आहे. संवादातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

जीएसटी आणि नोटाबंदीमध्ये छोटे व्यापारी संपुष्टात आले. बेरोजगारी वाढली. सामान्यांसह व्यापारी परेशान आहेत. आता कोणीही रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेरोजगारी आणि महागाईवर आज बोलायला तयार नाहीत. गॅसचे दर वाढले, पेट्रोल आणि डिझेलचे भाव कुठे गेले, यावर मोदी काहीच बोलत नाहीत. हा आवाज बुलंद करण्यासाठी आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे सुख-दुःख, प्रश्न जाणून घेण्यासाठी आम्ही पदयात्रेत सर्वांशी संवाद साधतोय. मला अभिमान वाटतो की, महाराष्ट्रातील यात्रा ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिवादनाने सुरू झाली आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या पदयात्रेला सुरुवात होत असल्याचा अभिमान असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNandedनांदेडdeglur-acदेगलूरBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज