शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

राहुल गांधीनी केले दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 12:08 IST

नायगाव येथील चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले, अमित देशमुख, आणि अन्य नेत्यांनी चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले.

नांदेड: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या नायगाव येथील निवासस्थानी भेट दिली. नायगाव येथील चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले, अमित देशमुख, आणि अन्य नेत्यांनी चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले. दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या प्रतिमेला काँग्रेस नेत्यांनी पुष्प अर्पण केले. यावेळी राहुल गांधी यांनी चव्हाण कुटुंबांची संवाद साधला. त्यानंतर राहुल गांधी, खर्गे आणि इतर नेते सांगली येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

१४ दिवस मृत्यूशी झुंज१३ ऑगस्ट रोजी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणाहून एअर ॲम्ब्युलन्सद्वारे त्याच दिवशी हैदराबाद येथे हलविण्यात आले. हैदराबाद येथील रुग्णालयात १४ दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर खा. वसंतराव चव्हाण १४ दिवस मृत्यूशी झुंज देत होते. अखेर २६ ऑगस्ट रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. वसंतराव यांच्यावर मंगळवार २७ ऑगस्ट रोजी शासकीय इतमामात नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या चाहत्यांनी साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक दाखल झाले होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत आदरांजली वाहिली. पोलिस पथकाने तीन राऊंड झाडून सलामी दिली. पार्थिव देहास खा. वसंतराव चव्हाण यांचे धाकटे चिरंजीव रणजित चव्हाण यांनी अग्नी दिला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले व त्यांनी वसंतराव चव्हाण अमर रहे च्या घोषणा दिल्या.

काँग्रेसला नांदेड जिल्ह्यात संजीवनी देणारे खासदार वसंतराव चव्हाण १५ ऑगस्ट १९५४ ला जन्म झालेले वसंतराव चव्हाण यांना राजकारणाचे बाळकडू त्यांचे वडील बळवंतराव चव्हाणांकडून मिळाले. १९७८ मध्ये ते नायगावचे पहिल्यांदा सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग २४ वर्षे ते या पदावर होते. १९९० मध्ये जिल्हा परिषदेत निवडून आले. त्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष, विविध सोसायट्यांचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले. २००२ मध्ये राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा विधान परिषद सदस्य म्हणून निवडून गेले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष निवडून आले. त्यानंतर २०१४ मध्ये काँग्रेसकडून त्यांनी नायगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपत गेल्यामुळे काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. अशावेळी भाजप उमेदवाराच्या तोडीस तोड म्हणून वसंतराव चव्हाण यांना काँग्रेसने रिंगणात उतरविले. त्यांच्या प्रकृतीबाबत टीकाटिप्पणी केल्यानंतर त्यांनी एखाद्या कसलेल्या पहिलवानासारखे भरसभेत दंड थोपटून आव्हान दिले होते, तसेच लोकसभेत प्रतापराव चिखलीकर यांचा तब्बल ५० हजारांहून अधिक मतांनी पराभव करीत काँग्रेसचा नांदेड गड शाबूत ठेवला होता. त्यांच्या या विजयामुळे काँग्रेसला जिल्ह्यात संजीवनी मिळाली होती. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNandedनांदेड