शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

रबी हंगाम होणार सुखाचा; अप्पर मानार लिंबोटीची शेतकऱ्यांसाठी तीन आवर्तने देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 15:09 IST

कंधार -लोहा तालुक्यातील ६ हजार हेक्टरला होणार फायदा

ठळक मुद्देलिंबोटी प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही १०७ .९८६ दलघमी आहे.शेलगाव वितरिकेची चाचणी  डिसेंबरअखेर 

कंधार (जि. नांदेड) : कंधार व लोहा तालुक्यातील रबी हंगामाचा शिवार हिरवा होण्यास अप्पर मानार लिंबोटी प्रकल्प पर्वणी ठरणार आहे. लोहा येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ३ आवर्तन पाणी देण्याचा निर्णय झाला असून, याचा  या दोन तालुक्यातील ६ हजार हेक्टरवरील शेतीला फायदा होणार आहे. 

अप्पर मानार प्रकल्प निर्माण करण्यामागे हरित शेतीची संकल्पना होती. परंतु शेतीपेक्षा प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरण्याकडे कल वाढला. त्यातूनच शेजारच्या तालुक्यापेक्षा दूरच्या तालुक्यात पाणी नेण्याचा प्रयत्न सुरू झाला. यातून संघर्ष उभा राहू लागला. उदगीर शहराला व पालमसह अनेक गावांना या  प्रकल्पातील पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी व जनतेत नाराजी आहे. लिंबोटी प्रकल्प यंदा तुडुंब भरला आहे. या पार्श्वभूमीवर ३ डिसेंबर रोजी लोहा तहसील कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली.  

या बैठकीत रबी हंगामाकरिता ३ आवर्तन पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. लिंबोटी प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही १०७ .९८६ दलघमी आहे. या प्रकल्पातील पाण्यामुळे लोहा व कंधार तालुक्यातील ३० गावातील ६ हजार हे.शेती सिंचनासाठी फायद होतो. यंदा प्रकल्प तुडुंब आहे. त्यामुळे कंधार तालुक्यातील बोरी, घोडज, गंगनबीड, बाबुळगाव, बाळांतवाडी, पानभोसी, चिखलभोसी या ७ गावांना तर  लोहा तालुक्यातील २३ गावाची रबीची शेती बहरण्यासाठी या पाण्याचा लाभ होणार आहे. पहिले पाणी डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवडयात देण्यात येणार आहे.त्यामुळे लोहा व कंधार तालुक्यातील ६ हजार हेक्टर जमिन रबी हंगामाने बहरणार आहे.याचा लाभ दोन्ही तालुक्यातील ३० गावांना होणार आहे. पाण्याची स्थिती पाहून उपलब्ध जलसाठा यावरून उन्हाळी हंगाम पाण्याचा विचार केला जाणार असल्याचे समजते.

बारूळ प्रकल्पातील आवर्तन कधी?निम्न मानार प्रकल्प बारूळची पाणी साठवण क्षमता  १४६.९२ दलघमी आहे. कंधार, नायगाव व बिलोली तालुक्यातील ९९ गावांतील २३ हजार ३१० हेक्टर शेती सिंचन या प्रकल्पामुळे होते. कंधार तालुक्यातील ३८ गावे, बिलोली १२ व नायगावमधील ४९ गावांतील शेतीला याचा फायदा होतो; परंतु अद्याप कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त लागला नाही. त्यामुळे पाणी कधी मिळणार, हा प्रश्र आहे. 

शेलगाव वितरिकेची चाचणी  डिसेंबरअखेर ५८ कि.मी. डाव्या कालव्यातून पाणी लोहा व कंधार तालुक्यांतील  ३० गावांना दिले जाते. त्यात शेलगाव वितरिकेचे चाचणीचे काम होणे गरजेचे होते. याची चाचणी डिसेंबरअखेर होणार असल्याचे बैठकीत ठरले असल्याचे समजते. 

टॅग्स :DamधरणNandedनांदेडWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती