शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

रबी हंगाम होणार सुखाचा; अप्पर मानार लिंबोटीची शेतकऱ्यांसाठी तीन आवर्तने देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 15:09 IST

कंधार -लोहा तालुक्यातील ६ हजार हेक्टरला होणार फायदा

ठळक मुद्देलिंबोटी प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही १०७ .९८६ दलघमी आहे.शेलगाव वितरिकेची चाचणी  डिसेंबरअखेर 

कंधार (जि. नांदेड) : कंधार व लोहा तालुक्यातील रबी हंगामाचा शिवार हिरवा होण्यास अप्पर मानार लिंबोटी प्रकल्प पर्वणी ठरणार आहे. लोहा येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ३ आवर्तन पाणी देण्याचा निर्णय झाला असून, याचा  या दोन तालुक्यातील ६ हजार हेक्टरवरील शेतीला फायदा होणार आहे. 

अप्पर मानार प्रकल्प निर्माण करण्यामागे हरित शेतीची संकल्पना होती. परंतु शेतीपेक्षा प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरण्याकडे कल वाढला. त्यातूनच शेजारच्या तालुक्यापेक्षा दूरच्या तालुक्यात पाणी नेण्याचा प्रयत्न सुरू झाला. यातून संघर्ष उभा राहू लागला. उदगीर शहराला व पालमसह अनेक गावांना या  प्रकल्पातील पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी व जनतेत नाराजी आहे. लिंबोटी प्रकल्प यंदा तुडुंब भरला आहे. या पार्श्वभूमीवर ३ डिसेंबर रोजी लोहा तहसील कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली.  

या बैठकीत रबी हंगामाकरिता ३ आवर्तन पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. लिंबोटी प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही १०७ .९८६ दलघमी आहे. या प्रकल्पातील पाण्यामुळे लोहा व कंधार तालुक्यातील ३० गावातील ६ हजार हे.शेती सिंचनासाठी फायद होतो. यंदा प्रकल्प तुडुंब आहे. त्यामुळे कंधार तालुक्यातील बोरी, घोडज, गंगनबीड, बाबुळगाव, बाळांतवाडी, पानभोसी, चिखलभोसी या ७ गावांना तर  लोहा तालुक्यातील २३ गावाची रबीची शेती बहरण्यासाठी या पाण्याचा लाभ होणार आहे. पहिले पाणी डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवडयात देण्यात येणार आहे.त्यामुळे लोहा व कंधार तालुक्यातील ६ हजार हेक्टर जमिन रबी हंगामाने बहरणार आहे.याचा लाभ दोन्ही तालुक्यातील ३० गावांना होणार आहे. पाण्याची स्थिती पाहून उपलब्ध जलसाठा यावरून उन्हाळी हंगाम पाण्याचा विचार केला जाणार असल्याचे समजते.

बारूळ प्रकल्पातील आवर्तन कधी?निम्न मानार प्रकल्प बारूळची पाणी साठवण क्षमता  १४६.९२ दलघमी आहे. कंधार, नायगाव व बिलोली तालुक्यातील ९९ गावांतील २३ हजार ३१० हेक्टर शेती सिंचन या प्रकल्पामुळे होते. कंधार तालुक्यातील ३८ गावे, बिलोली १२ व नायगावमधील ४९ गावांतील शेतीला याचा फायदा होतो; परंतु अद्याप कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त लागला नाही. त्यामुळे पाणी कधी मिळणार, हा प्रश्र आहे. 

शेलगाव वितरिकेची चाचणी  डिसेंबरअखेर ५८ कि.मी. डाव्या कालव्यातून पाणी लोहा व कंधार तालुक्यांतील  ३० गावांना दिले जाते. त्यात शेलगाव वितरिकेचे चाचणीचे काम होणे गरजेचे होते. याची चाचणी डिसेंबरअखेर होणार असल्याचे बैठकीत ठरले असल्याचे समजते. 

टॅग्स :DamधरणNandedनांदेडWaterपाणीFarmerशेतकरीagricultureशेती