शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

‘ग्रंथोत्सवातून वाचन संस्कृतीची जोपासना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 11:53 PM

पुस्तक वाचनातून वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. यातून समाज सुसंस्कृत होत जातो, यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.

नांदेड : पुस्तक वाचनातून वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. यातून समाज सुसंस्कृत होत जातो, यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय नांदेड यांच्यावतीने आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या हस्ते झाले़ त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड़ गंगाधर पटणे हे होते. तर विभागीय सहनिबंधक तथा साहित्य अकादमी पुरस्कारविजेते साहित्यिक श्रीकांत देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर, औरंगाबादचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, उच्च शिक्षण विभागाचे वरिष्ठ लेखाधिकारी नीळकंठ पांचगे, जि़ प़ चे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे, माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख, ग्रंथालय चळवळीचे बी. जी. देशमुख, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले, नवीन पिढीचे समाजमाध्यमांवरील वाचन वाढले आहे, अशावेळी पुस्तक वाचनाला विसरुन चालणार नाही. वाचनातील आकलन करुन ते कृतीत विचार आले पाहिज़े‘उज्ज्वल नांदेड’ या उपक्रमात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची डोंगरे यांनी यावेळी माहिती दिली. पुस्तक वाचनातून स्पर्धा परीक्षा देणाºया अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडले आहे. त्यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके देवून त्यांना उज्ज्वल जीवनाकडे नेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन डोंगरे यांनी केले़माजी आमदार अ‍ॅड़ पटणे म्हणाले, अवांतर वाचनाची आवड लहानवयातून झाली तर कोणत्याही क्षेत्रात त्यांना सहज यश मिळते. नांदेड ग्रंथोत्सवात विविध दालनांत उपयुक्त ग्रंथ उपलब्ध आहेत. ते खरेदी करुन वाचली पाहिजे,असे आवाहन करताना नांदेड महानगरपालिकेने त्यांच्या राममनोहर लोहिया सार्वजनिक वाचनालयाची नवीन इमारत वाचकांसाठी लवकर उभी करावी, अशी मागणी केली.विभागीय सहनिबंधक श्रीकांत देशमुख म्हणाले, ग्रंथवाचनातून विचार करण्याची क्षमता वाढते. अनेक समाजसुधारकांनी ज्ञानातून समाज घडविला. आधुनिक भारत ज्ञानातून घडत आहे. अनावश्यक खर्च टाळून पुस्तके खरेदी करावीत. घराचा स्वर्ग करायचे असेल, तर त्याठिकाणी पुस्तक असले पाहिजे. ती वाचली पाहिजेत असेही ते म्हणाले़सहाय्यक ग्रंथालय संचालक हुसे यांनी ‘नांदेड ग्रंथोत्सव’ हा नेहमीच राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. जिल्ह्यातील ग्रंथालयांनी येथील दालनातून उपयुक्त ग्रंथांची खरेदी करुन आपले ग्रंथालये विविध ग्रंथांनी परिपूर्ण ठेवावीत, असे आवाहन केले.जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी प्रास्ताविकात ‘नांदेड ग्रंथोत्सव’ आयोजनामागची भूमिका मांडली. वाचनसंस्कृती वाढावी, त्यांना नवीन ग्रंथ मिळावे यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. ग्रामीण भागात ग्रंथचळवळीचे चांगले काम होत आहे. शासनाने पुस्तकाचे गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील भिल्लार गावाची निवड केली आहे, तशी गावे नांदेड येथे झाली पाहिजेत, असेही ते म्हणाले़ प्रास्ताविक देवदत्त साने यांनी केले तर प्रताप सूर्यवंशी यांनी आभार मानले.ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाला सुरुवातशनिवारी सकाळी ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाची सुरुवात करण्यात आली. ही ग्रंथदिंडी महात्मा फुले पुतळा आयटीआयपासून कुसुम सभागृहमार्गे जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या आवारात पोहोचली. ग्रंथदिंडीची सुरुवात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते पूजनाने झाली.४ या ग्रंथदिंडीमध्ये मधुबन महाराज हायस्कूल (धनेगाव), शारदा भवन हायस्कूल (नांदेड), विमलेश्वर वारकरी शिक्षण संस्था (मरळक), वारकरी सांप्रदाय भजनी मंडळ (हाळदा), बंजारा महिला नृत्य (वर्ताळा तांडा ता. मुखेड), तसेच शाहीर जाधव व चमू (सुजलेगाव ता. नायगाव) इत्यादींनी सहभाग घेतला होता. या दिंडीत साहित्यिक, ग्रंथप्रेमी आणि ग्रंथचळवळीतील मान्यवर सहभागी झाले होते.

टॅग्स :NandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडcollectorजिल्हाधिकारी