शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

शासकीय शाळांचे खासगीकरण करण्याचा डाव

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: September 17, 2023 16:53 IST

६२ हजार शाळा कार्पोरेटकडे देण्यासाठी शासनस्तरावर हालचाली

रामेश्वर काकडे 

नांदेड : शासकीय व जिल्हा परिषदेच्या शाळांचे खासगीकरण करण्याचा सरकारचा डाव आहे. शालेय शिक्षणमंत्र्यांनी ६२ हजार शाळा कार्पोरेटकडे दत्तक म्हणून दिल्या जाण्याची नुकतीच घोषणा केली असून, त्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. यावरून शिक्षणक्षेत्राचे संपूर्णपणे खासगीकरण करून प्राथमिक शिक्षणाच्या कल्याणकारी आणि संवैधानिक जबाबदारीतून बाहेर पडायच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरू झाल्याचे दिसून येते.

कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करून परिसरातील दहा ते पंधरा शाळांचे समायोजन गोंडस शब्दाचा वापर करून केले जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार समूह शाळा अस्तित्वात येणार असून, हा प्रयोग पुणे जिल्ह्यातील पानशेत येथे केला आहे. समूह शाळा, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक शाळा असा प्रचार करत शिक्षण क्षेत्राचे संपूर्ण खासगीकरण करण्यासाठीचा हा प्रकार असल्याच्या भावना शिक्षणतज्ज्ञांतून व्यक्त होत आहेत. यातून सरकारी सेवेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने अतिरिक्त होण्याची भीती आहे.

शासनाच्या शैक्षणिक व अन्य धोरणांचा धोकाराष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे शिक्षण क्षेत्राचे कंपनीकरणासाठीचे धोरण आहे. या शैक्षणिक धोरणानुसार कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम निर्माण केला जात आहे. त्यामध्ये जातीनिहाय तथाकथित परंपरागत व्यवसाय कौशल्याधिष्ठितेच्या नावाखाली इयत्ता आठवीपासून शिकविले जाणार आहेत. त्यामध्ये पूर्वीच्या बलुतेदारांची आणि कालानुरूप त्या पठडीतील कामे (झाडू तयार करणे, मूर्तिकाम, रंगकाम, गवंडी काम सुतारकाम, लोहारकाम, चपता-जोड़े बनवण्याचे काम, बांधकाम, पंक्चर दुरुस्ती) अशा कोर्सचा समावेश आहे. 

विद्यापीठाच्या अनुदान धोरणात फेरबदलाचे वारे

या शैक्षणिक धोरणानुसार उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमासाठीचे विद्यापीठ अनुदान आयोग रद्द होऊन पुढील काळात कॉलेज आणि विद्यापीठाच्या अनुदान धोरणात मोठे फेरबदल होणार आहेत. सध्या देशातील ४० हजार महाविद्यालयांपैकी २५ हजार महाविद्यालये बंद करून मोजकीच महाविद्यालये राहतील आणि त्यांना स्वायत्ततेचा दर्जा दिला जाईल. प्रत्येक महाविद्यालय हे विविध विद्याशाखा असणारे आणि किमान तीन हजार विद्यार्थ्यांचे असावे, असे शैक्षणिक धोरण आहे.

सरकारचे नियंत्रण असणार नाहीकॉलेजला भौतिक सुविधेनुसार आणि नॅकच्या निकषानुसार विद्यापीठाचा दर्जा दिला जाईल. अशी कॉलेजेस / विद्यापीठे ही स्वयंअर्थसाहाय्यित असणार आहेत. या शैक्षणिक संस्थांना स्वतःचा अभ्यासक्रम ठरवण्याचा, स्वतःची परीक्षा पद्धती संचलित करण्याचा, स्वतःची नोकर भरती करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यावर सरकारचे कुठलेही नियंत्रण असणार नाही आणि सरकार अर्थपुरवठासुद्धा करणार नाही. शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचे पगार हे विद्यार्थ्यांनी दिलेल्या शुल्कामधून केले जातील. त्यासाठी सुमारे ४०० पट शुल्क वाढवण्याचे प्रावधान आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांची मोठी कोंडी होईल.कंत्राटी पद्धती लागू करण्याचे धोरण

सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, सरकारी उपक्रमातील नियमित कर्मचारी भरती बंद करून कंत्राटी पद्धत लागू करण्याचे धोरण वेठबिगारी पद्धतीचे असून, कल्याणकारी व्यवस्थेला नकार देणारे आहे. यातून शोषित, वंचितांचा एक पीडित समाज तयार होणार आहे.

तोंड दाबून बुक्क्यांचा मारसध्याचे शैक्षणिक प्रयोग म्हणजे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे. शिक्षणातील स्वायत्तता, स्वातंत्र्यता हरवून टाकणारे हे प्रयोग कागद रंगवण्यापलीकडे काही हाती लागू देणार नाहीत.

शासकीय शाळांचे खासगीकरण करणे हे समाजाच्या दृष्टीने घातक ठरणार आहे. या धोरणामुळे नोकऱ्या राहणार नाहीत. सर्वसामान्य बहुजनांच्या लेकरांना शिक्षण घेणे शक्य नाही. या धोरणाला आमचा विरोध आहे.-विजय कोंबे राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

शासनाचा कार्पोरेटकडे शाळा देत शिक्षणाचा उद्योग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोठ्या उद्योगपतींच्या ताब्यात शाळा देऊन शासन स्वत:ची वैयक्तिक दिवाळखोरी घोषित करत आहे. शिक्षण महाग करून सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दारे बंद करण्याचा डाव आहे. आम्ही शासनाच्या या निर्णयाचा धिक्कार करतो. -व्यंकटराव जाधव, प्रदेशाध्यक्ष महात्मा फुले शिक्षक परिषद

टॅग्स :SchoolशाळाNandedनांदेड