शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सुखद ! मराठवाड्यातील प्रकल्प क्षेत्रातही यंदा पावसाची मेहेरबानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 13:54 IST

जायकवाडी प्रकल्प क्षेत्रात मागील वर्षी २१ ऑगस्टपर्यंत केवळ १५४ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा याच तारखेपर्यंत ६२७ मि.मी. पावसाची नोंद असून इतर प्रकल्प क्षेत्रातही असाच जोरदार पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देविष्णूपुरी प्रकल्पातून ७६.१५ क्युसेक विसर्ग जायकवाडीत ७२.४६, तर येलदरीमध्ये ९९.२९ टक्के साठा

- विशाल सोनटक्के 

नांदेड : बीड जिल्ह्यातील मांजरा प्रकल्प वगळता इतर प्रमुख धरणांत यंदा समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाल्याने मराठवाडा सुखावल्याचे चित्र आहे.  दरम्यान, यंदा पावसाने प्रमुख प्रकल्प परिसरातही चांगलीच मेहेरबानी दाखवली आहे. जायकवाडी प्रकल्प क्षेत्रात मागील वर्षी २१ ऑगस्टपर्यंत केवळ १५४ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा याच तारखेपर्यंत ६२७ मि.मी. पावसाची नोंद असून इतर प्रकल्प क्षेत्रातही असाच जोरदार पाऊस झाला आहे.

जायकवाडी प्रकल्पात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ७२.४६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पाचा प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा २१७१ दलघमी आहे. शुक्रवारपर्यंत या प्रकल्पात १५७३.०९ इतके पाणी उपलब्ध होते. परभणी जिल्ह्यातील पूर्णा-येलदरी प्रकल्प तुडुंब भरला असून या धरणात ९९.२९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मागील वर्षी या धरणक्षेत्रात २१ आॅगस्टपर्यंत ४१३ मि.मी. पावसाची नोंद होती. यंदा याच तारखेपर्यंत ६१० मि.मी. पाऊस कोसळला आहे. या धरणाची प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता ८१० दलघमी असून शुक्रवारपर्यंत येथे ८०४.०३ दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. प्रकल्प तुडुंब भरल्याने धरणातून ४७७.९८ क्युमेक्सने विसर्ग करण्यात येत आहे. 

बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण क्षेत्रात मागीलवर्षी २१ आॅगस्टपर्यंत केवळ २७० मि.मी. पावसाची नोंद होती. यंदा ६५६ मि.मी. पाऊस नोंदविला गेला असून शुक्रवारपर्यंत या धरणात ७१.७० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणाची प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता ३१२ दलघमी आहे. शुक्रवार सकाळपर्यंत येथे २२३.७० दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. 

नांदेड जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प परिसरात मागील वर्षी ६५३ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा या प्रकल्प क्षेत्रात ७९४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून शुक्रवारपर्यंत प्रकल्पात ८३.१० टक्के पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. या प्रकल्पाची प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता ९६४ दलघमी असून शुक्रवारी सकाळपर्यंत येथे ८०१.१६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. 

बीड जिल्ह्यातील मांजरा या प्रकल्प क्षेत्रातही यंदा सुमारे दुप्पट पाऊस नोंदविला गेला आहे. मागील वर्षी २१ आॅगस्टपर्यंत या परिसरात १६८ मि.मी. पावसाची नोंद होती. यंदा तेथे ३१६ मि.मी. पाऊस झाला आहे. मात्र, धरण अद्यापही कोरडे असून सद्य:स्थितीत तेथे ०.६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पाची प्रकल्पी उपयुक्त पाणीसाठा क्षमता १७७ दलघमी असून शुक्रवारपर्यंत तेथे १.०६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. 

पूरप्रवण भागावर प्रशासनाचे लक्ष- नांदेड येथील विष्णूपुरी प्रकल्पाची संकल्पित उच्चत्तम स्थिती ३५५ मीटर असून, शुक्रवारी सकाळपर्यंत तेथे ३५४ मीटर पाणीपातळी होती. त्यामुळे या प्रकल्पातून ७६.१५ क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. मराठवाड्यातील इतर पूरप्रवण ठिकाणावरही प्रशासन लक्ष ठेवून आहे.- औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील गोदावरीची इशारा स्थिती ४४०.४१ मी. आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत तेथे ४३२.२१ मी. पाणी होते. - बीड जिल्ह्यातील माजलगाव, तेलगाव रोड येथील सिंदफणा नदीची इशारा स्थिती ४१० मी. आहे. तेथे ४०२.८३ मी. वरून पाणी वाहत आहे. - परभणी जिल्ह्यातील धालेगाव येथील गोदावरी नदीची इशारा स्थिती ३९६.४७ आहे. सध्या तिथे ३८६.५८ मीटर पाणीपातळी आहे. - नांदेडच्या गोदावरीवरील जुन्या पुलाची इशारा स्थिती ३५१ मीटर असून तेथे ३४३.१५ मीटरहून शुक्रवारी सकाळी पाणी वाहत होते. 

टॅग्स :DamधरणRainपाऊसWaterपाणीNandedनांदेडAurangabadऔरंगाबाद