शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

जाती-पातीचे राजकारण जनता हाणून पाडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:47 AM

पाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर विरोधकांनी नांदेडसाठी काय केले? हे सांगायला हवे. मात्र जनतेचे खरे मुद्दे टाळून प्रचारसभांत निराधार टीकाटिप्पणी केली जात आहे. नांदेड जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास कोणी केला? याची मतदारांनाही जाणीव आहे.

ठळक मुद्देचव्हाण : नांदेडकर पाठीशी याचा विश्वास

नांदेड : पाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर विरोधकांनी नांदेडसाठी काय केले? हे सांगायला हवे. मात्र जनतेचे खरे मुद्दे टाळून प्रचारसभांत निराधार टीकाटिप्पणी केली जात आहे. नांदेड जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास कोणी केला? याची मतदारांनाही जाणीव आहे. या निवडणुकीत मतदार जाती-पातीचे राजकारण हाणून पाडतील, असा विश्वास व्यक्त करीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे अशोकराव चव्हाण म्हणाले.जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात विविध समाजघटकांशी चव्हाण यांनी रविवारी संवाद साधला. यावेळी व्यंकट मुदीराज, दीपाली मोरे, बालाजी मद्देवाड, छगन पाटील, सिद्धेवर पिटलेवार, बालाजी बोईनवाड, शेख गफार, रमेश यादव आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री असताना आदिवासी कोळी तसेच भोई समाजबांधवांच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्याचे सांगत इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता तुमच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल, असा शब्द चव्हाण यांनी दिला. आदिवासी विरुद्ध मन्नेरवारलू आणि आदिवासी विरुद्ध कोळी असा विनाकारण वाद निर्माण केला जात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. विद्यमान भाजप सरकार दलित, अल्पसंख्याकांच्या विरोधातील आहे. त्यामुळे या सरकारविरोधात मतदानाच्या माध्यमातून आवाज उठवा, असे आवाहनही त्यांनी केले. भोकरमधील लघळूदमध्ये समाजबांधवांचा खून होतो. परंतु अद्यापही त्याचा तपास लागला नसल्याचे सांगत या सरकारच्या काळात पोलीस यंत्रणाही कुचकामी ठरल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. या सरकारला मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आदिवासी कोळी समाज, भोई समाज, मच्छीमार संघटना तसेच ख्रिस्ती बांधवांनी चव्हाण यांना जाहीर पाठिंबा देत काँग्रेसच्याच पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी या संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.अख्खी भाजपा भेदरलीनरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यासह पियुष गोयलसह अख्खी भाजपाची नेतेमंडळी नांदेडमध्ये येते. यावरुन भाजपा किती भेदरलेली आहे हे स्पष्ट होते. मात्र हे नेते येवूनही त्यांचा उपयोग होणार नाही. कारण जिल्ह्याचा विकास कोणी केला? याची जाणीव नांदेडकरांना आहे. कामे आम्ही करायची आणि श्रेय दुसरे लाटणार हे आता चालणार नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडAshok Chavanअशोक चव्हाण