शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

वीज ग्राहकांकडे दीड कोटीची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:28 IST

तालुका दुष्काळाने होरपळून निघत आहे. दुष्काळी मदत, पीक वीमा रक्कम हाती नाही, खरीप पेरणीपूर्व कामाची लगीनघाई चालू आहे. त्यात घरगुतीसह इतर ग्राहकाकडे १ कोटी ५५ लाखापेक्षा अधिक थकबाकी असल्याचे समोर आले आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या तगाद्याला तोंड कसे द्यायचे? याची चिंता ऐन दुष्काळात थकबाकीदार ग्राहकांना सतावत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकंधार तालुका महावितरण थकबाकी वसुलीला दुष्काळात तोंड द्यायचे कसे? वीज ग्राहकांचा सवाल

कंधार : तालुका दुष्काळाने होरपळून निघत आहे. दुष्काळी मदत, पीक वीमा रक्कम हाती नाही, खरीप पेरणीपूर्व कामाची लगीनघाई चालू आहे. त्यात घरगुतीसह इतर ग्राहकाकडे १ कोटी ५५ लाखापेक्षा अधिक थकबाकी असल्याचे समोर आले आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या तगाद्याला तोंड कसे द्यायचे? याची चिंता ऐन दुष्काळात थकबाकीदार ग्राहकांना सतावत असल्याचे चित्र आहे.तालुक्यात कंधार शहर, कंधार ग्रामीण, कुरूळा, बारूळ, पेठवडज या पी. सी. अंतर्गत घरगुती ग्राहक संख्या सुमारे २३ हजार आहे. कमर्शियल व औद्योगिक ग्राहक सुमारे ४०० पेक्षा जास्त आहे.आजघडीला विद्युत पुरवठा अत्यावश्यक बाब झाली आहे. ब्लब, फॅन, टीव्ही, मिक्सर, हिटर, टयुब, मोबाईल चार्जिंग, अभ्यास आदीसाठी वीज आवश्यक आहे. तसेच औद्योगिक व व्यावसायिकांना आपल्या उत्पादन व सेवेसाठी वीज उपयुक्त असते.वीजपुरवठा खंडीत झाला तर सर्वांची कोंडी होती. ऐन उन्हाळ्यात तर उपकरण बंद असेल तर कुटुंबातील सदस्यांचा जीव कासावीस होतो. एवढे वीजेचे महत्त्व वाढले आहे. परीक्षा काळात वीज पुरवठा खंडीत झाला तर गुणवत्तेवर परीणाम होतो.विजेचे महत्त्व वाढले असतानाच बील भरणा होणे आवश्यक असते.महावितरण सुद्धा नियमित वीज भरणा केले तर सुस्थितीत राहते. अन्यथा डबघाईला येण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ग्राहकाकडून वसुलीसाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. वसुलीचा तगादा लावला जातो. वसुलीसाठी जनजागृती, प्रबोधन केले जाते. सर्व प्रयत्न करूनही बील भरणा होत नसेल तर वीज पुरवठा खंडीत केला जातो. मग थकबाकीदार ग्राहकांना विविध समस्येला सामोरे जावे लागते. आता तर तालुक्यात दुष्काळी चित्र असल्याने शेतकरी, कामगार यांना वीज बील भरणा कसा करावा याची चिंता सतावत आहे.तालुक्यातील १० हजारापेक्षा अधिक घरगुती ग्राहकाकडे सुमारे १ कोटी ५० लाख थकबाकी आहे. तसेच व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकही शेकडयात थकबाकीदार आहेत.दुष्काळाने व्यवसाय व उद्योग उलाढाल मंदावली आहे. त्यामुळे या ग्राहकांना सुद्धा बील भरणा करणे अडचणीचे झाले आहे. वसुलीसाठी महावितरणचे अधिकारी कर्मचारी कधी येणार ? बील भरणा केला नाही तर वीज पुरवठा खंडीत होईल या चिंतेने थकबाकीदार ग्राहकांना ग्रासले आहे.अत्यल्प पावसाने पीक उतारा घटलातालुका खरीप हंगामाचा म्हणून ओळखला जातो. सतत निसर्ग पावसाचा लपंडाव चालू असल्याने शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. अत्याल्प पावसाने पीक उतारा घटला. खर्च अधिक व उत्पादन कमी अशी गत झाली. कमी पीक आणेवारीमुळे दुष्काळ जाहीर झाला. परंतु दुष्काळी अनुदान, पीक वीमा अद्याप हाती आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा खिसा रिकामा आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असताना बील भरणा करण्याची चिंता सतावत आहे.

घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकाकडे दीड कोटीपेक्षा अधिक थकबाकी आहे. ग्राहकात व थकबाकीदार ग्राहकात जनजागृती करून वसूलीचा प्रयत्न सतत केला जातो. सर्व पी.सी.अंतर्गत अधिकारी, कर्मचारी यांना वसुलीसाठीचे निर्देश सातत्याने दिले जातात. त्यानुसार सर्व पीसी अंतर्गत वसुली केली जाते- महेश वाघमारे (उपकार्यकारी अभियंता महावितरण) कंधार

टॅग्स :Nandedनांदेडelectricityवीजbillबिल