शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

मनरेगा मजुरांना आता आठ दिवसांत मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:15 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांना आता १५ ऐवजी आठ दिवसांत मजुरी दिली जाणार आहे. २०१८-१९ पर्यंत मजुरांची मजुरी ही १५ दिवसांच्या आत दिली जात होती.

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थिती, मजुरांना शासन निर्णयाचा लाभ

अनुराग पोवळे।नांदेड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांना आता १५ ऐवजी आठ दिवसांत मजुरी दिली जाणार आहे. २०१८-१९ पर्यंत मजुरांची मजुरी ही १५ दिवसांच्या आत दिली जात होती. २०१९-२० या आर्थिक वर्षात आठ दिवसांच्या आत मजुरी अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.जिल्ह्यात आजघडीला ९४२ कामावर १३ हजार ५१२ मजूर कामावर आहेत. यात यंत्रणांची २४५ तर ग्रामपंचायतीची ६९७ कामे सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ५८ मजूर किनवट तालुक्यात आहेत. या तालुक्यात १२६ कामे सुरू आहेत. माहूर तालुक्यातही ६८ कामांवर १ हजार ३२० मजूर कार्यरत आहेत तर नायगाव तालुक्यात १०६ कामांवर १ हजार २७८, अर्धापूर तालुक्यात ९४ कामांवर १ हजार ४४२, भोकर तालुक्यात ९४ कामांवर १ हजार ४४२, मुखेड तालुक्यात ५१ कामांवर ४७७ मजूर, बिलोली तालुक्यात ६७ कामांवर ५९५, देगलूर तालुक्यात २९ कामांवर ४३६, हदगाव तालुक्यात ६० कामांवर ९६०, हिमायतनगर तालुक्यात २२ कामांवर ३७३, कंधार तालुक्यात ३४ कामांवर ४४०, लोहा तालुक्यात ३३ कामांवर १ हजार १०, मुदखेड तालुक्यात ५३ कामांवर ४७५, नांदेड तालुक्यात ४८ कामांवर ४४२ आणि उमरी तालुक्यात ५४ कामांवर ७२३ मजूर कार्यरत आहेत.या मजुरांना हजेरीपत्रक संपल्यानंतर आठ दिवसांच्या आत मजुरी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी २०१८-१९ च्या अखेरपर्यंत १५ दिवसांच्या आत मजुरी प्रदान करावी लागायची. त्यावेळी मजुरी प्रदान करण्याचे जिल्ह्याचे प्रमाण १०० टक्के होते. आठ दिवसांच्या आत मजुरी प्रदान करण्याचा आदेश आल्यानंतर ही टक्केवारी ६६.२९ टक्क्यांवर आली आहे. यापुढे विहित वेळेत मजुरी अदा न करणाºया संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर विलंबाची जबाबदारी निश्चित करुन शासन निर्णयानुसार ०.६ टक्के विलंबाची रक्कम संबंधितांकडून वसूल करुन ती शासनखाती जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.जिल्ह्यात १५ दिवसांत मजुरी द्यावी लागत असताना मजुरी प्रदान करण्याचे प्रमाण १०० टक्के होते. आठ दिवसांत मजुरी देण्याचे आदेश आल्यानंतर नांदेड तालुक्याचे मजुरी अदा करण्याचे प्रमाण सर्वाधिक ८८.७४ आहे तर त्याखालोखाल मुदखेडचे तालुक्याचे प्रमाण ८६.७१ इतके आहे. सर्वात कमी प्रमाण भोकर तालुक्याचे असून आठ दिवसांत मजुरी देण्याची टक्केवारी ४०.१८ टक्के इतके आहे. आठ दिवसांत मजुरी देण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील मजुरांना दुष्काळी परिस्थितीत त्याचा लाभ होणार आहे.सहा तालुक्यांत ७४ ग्रा.पं.मध्ये कामच नाहीजिल्ह्यात २०१८-१९ मध्ये दुष्काळाची परिस्थिती होती. या परिस्थितीत ग्रामपंचायतीमार्फत मनरेगाची कामे हाती घेणे आवश्यक होते. मात्र तब्बल ७४ ग्रामपंचायतींनी मनरेगाअंतर्गत एकही काम हाती घेतले नाही. यात दुष्काळी तालुके म्हणून ओळखल्याजाणाºया मुखेड, लोहा तालुक्यासह नांदेड तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींचा समावेश आहे.नांदेड तालुक्यातील ७३ पैकी १९ ग्रामपंचायतींनी २०१८-१९ मध्ये एकही काम केले नाही तर मुखेड तालुक्यातील १८ आणि लोहा तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींनी मनरेगाअंतर्गत काम हाती घेतले नाही. कंधार तालुक्यातील ८, बिलोली तालुक्यातील २, धर्माबाद तालुक्यातील २, किनवट तालुक्यातील ४, मुदखेड तालुक्यातील २ आणि हदगाव तसेच माहूर तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचा काम करण्यामध्ये समावेश आहे

टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळGovernmentसरकारNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडcollectorजिल्हाधिकारी