शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
2
IND vs SA: गुवाहाटी कसोटीत भारताचा विजय अशक्य का? आतापर्यंत एकदाच गाठलाय ३००+ स्कोर!
3
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
5
बिग बॉस मराठी ६ लवकरच...! अखेर झाली घोषणा, कोण असणार होस्ट? प्रेक्षकांची वाढली उत्सुकता
6
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
7
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
8
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
9
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
10
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
11
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
12
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
13
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
14
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
15
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
16
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
17
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
18
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
19
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
20
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचे जीवनमान उंचावण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:38 IST

जल-जमीन-जंगल यांचा मालक असलेल्या आदिवासी यांचे जीवनमान उंचावण्याची गरज असून त्यासाठी वन-उपोज गौण खनिज गोळा करून त्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार गावपातळीवर करण्याचा हक्क या समाजघटकास बहाल करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांनी केले़

ठळक मुद्देजवरला गावाला भेट : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कमांडवी (जि़नांदेड) : जल-जमीन-जंगल यांचा मालक असलेल्या आदिवासी यांचे जीवनमान उंचावण्याची गरज असून त्यासाठी वन-उपोज गौण खनिज गोळा करून त्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार गावपातळीवर करण्याचा हक्क या समाजघटकास बहाल करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांनी केले़राज्यपाल विद्यासागर राव यांनी ११ फेब्रुवारी रोजी गावातील जल शुद्धीकरण सयंत्र, बिरसा मुंडा सांस्कृतिक भवन, दालमील, शबरी घरकुलाचे उद्घाटन तर जवरला-मांडवी रस्ता व ग्रामीण क्रीडा संकुल उभारणीचे भूमिपूजन केले़ग्रामस्थांशी संवाद साधताना राज्यपाल यांनी आपण पहिल्या गाव भेट दौ-यात प्रस्तावित केलेल्या जवळपास सर्वच कामांची पूर्तता झाली असल्याचे व निजामकालीन राजवटीतला जवरला-आंबाडी-किनवट हा जुना रस्ता नव्याने तयार करून या गावास जोडण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले़ निधीची कमतरता पडू देणार नाही़ पाण्याची बचत आणि त्याचा वापर याची पुरेपूर माहिती अवगत करून देण्यासाठी लवकरच पाणी फाऊंडेशनचे एक पथक येथे पाठविणार आहे़ यासंबंधी सिनेअभिनेता आमिर खान यांच्याशी माझे बोलणे झाले आहे़ मोबाईल क्रांती आणि त्याचा अतिरेक हे एका उदाहरणातून त्यांनी मांडले़ आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता ५ कोटींमधील ५ टक्के रक्कम आता थेट ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा होणार आहे़ असे सांगून आदिवासी गाव दत्तक प्रक्रियेतून मला त्यांच्या गरजा आणि समस्या या जवळून पाहता आल्याचा निर्वाळा दिला़जवरला परिसरातील जवळपास २ हजार एकर पर्यंत सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेती फायदेशीर ठरत नाही़ ही गरज ओळखून प्रशासनाने या भागात सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी दोन- तीन पर्याय असलेले सविस्तर प्रस्ताव तयार करावेत़ त्याला मंजुरी देवून सिंचनासाठी फायदेशीर मार्ग अवलंबला जाईल, असेही त्यांनी सांगितले़ याप्रसंगी मंचावर राज्यपालांसमवेत वेणू गोपालरेड्डी, प्रा़ प्रदीप नाईक, रंजित कुमार, उल्हास मुडेकर, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, सरपंच भूपेंद्र आडे, महाजन माधव मरसकोल्हे, जि़प़ उपाध्यक्ष समाधान जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, तहसीलदार नरेंद्र देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ उपस्थित होते़प्रास्ताविक माधवराव पाटील यांनी केले़ प्रारंभी आदिवासी मुलींचे विद्यासंकुल पिंपळगाव येथील मुलींच्या नृत्यगीताने स्वागत झाले़राज्यपालांनी केले विकास कामांचे उद्घाटनराज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले़ विशेष केंद्रीय सहाय योजनेतून २ लाख रूपये अनुदानातून जंगुबाई आदिवासी महिला शेतकरी गटाने सुरू केलेल्या दालमिलचे उद्घाटन करण्यात आले़ ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतून ७ लाख ५० हजार रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे तसेच २ कोटी ९५ लाख रूपये खर्चून उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केले़ ९९ लाख ६२ हजार रूपयांच्या प्रस्तावित क्रीडा संकुलाचे तसेच मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आले़किनवट तालुक्यातील आदिवासीबहुल जवरला हे गाव २९ मे २०१५ रोजी राज्यपालांनी गावसंवाद कार्यक्रमात हे गाव विकासाकरिता दत्तक घेतल्याचे जाहीर केले़ तेव्हापासून येथे कोणकोणती विकासकामे पूर्णत्वास गेली याची पाहणी करण्यात आली़४खेळीमेळीच्या वातावरणात रिमझिम पावसाच्या गारव्यात अर्धा-पाऊण तास राज्यपालांचा संवाद कार्यक्रम चालला होता़४हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आणि राज्यपालाच्या आगमनानंतर ११़३० वाजता पावसाच्या सरी बरसल्या़यामुळे उपस्थितांची चांगलीच धांदल उडाली़