शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

आदिवासींचे जीवनमान उंचावण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:38 IST

जल-जमीन-जंगल यांचा मालक असलेल्या आदिवासी यांचे जीवनमान उंचावण्याची गरज असून त्यासाठी वन-उपोज गौण खनिज गोळा करून त्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार गावपातळीवर करण्याचा हक्क या समाजघटकास बहाल करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांनी केले़

ठळक मुद्देजवरला गावाला भेट : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कमांडवी (जि़नांदेड) : जल-जमीन-जंगल यांचा मालक असलेल्या आदिवासी यांचे जीवनमान उंचावण्याची गरज असून त्यासाठी वन-उपोज गौण खनिज गोळा करून त्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार गावपातळीवर करण्याचा हक्क या समाजघटकास बहाल करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांनी केले़राज्यपाल विद्यासागर राव यांनी ११ फेब्रुवारी रोजी गावातील जल शुद्धीकरण सयंत्र, बिरसा मुंडा सांस्कृतिक भवन, दालमील, शबरी घरकुलाचे उद्घाटन तर जवरला-मांडवी रस्ता व ग्रामीण क्रीडा संकुल उभारणीचे भूमिपूजन केले़ग्रामस्थांशी संवाद साधताना राज्यपाल यांनी आपण पहिल्या गाव भेट दौ-यात प्रस्तावित केलेल्या जवळपास सर्वच कामांची पूर्तता झाली असल्याचे व निजामकालीन राजवटीतला जवरला-आंबाडी-किनवट हा जुना रस्ता नव्याने तयार करून या गावास जोडण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले़ निधीची कमतरता पडू देणार नाही़ पाण्याची बचत आणि त्याचा वापर याची पुरेपूर माहिती अवगत करून देण्यासाठी लवकरच पाणी फाऊंडेशनचे एक पथक येथे पाठविणार आहे़ यासंबंधी सिनेअभिनेता आमिर खान यांच्याशी माझे बोलणे झाले आहे़ मोबाईल क्रांती आणि त्याचा अतिरेक हे एका उदाहरणातून त्यांनी मांडले़ आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता ५ कोटींमधील ५ टक्के रक्कम आता थेट ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा होणार आहे़ असे सांगून आदिवासी गाव दत्तक प्रक्रियेतून मला त्यांच्या गरजा आणि समस्या या जवळून पाहता आल्याचा निर्वाळा दिला़जवरला परिसरातील जवळपास २ हजार एकर पर्यंत सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेती फायदेशीर ठरत नाही़ ही गरज ओळखून प्रशासनाने या भागात सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी दोन- तीन पर्याय असलेले सविस्तर प्रस्ताव तयार करावेत़ त्याला मंजुरी देवून सिंचनासाठी फायदेशीर मार्ग अवलंबला जाईल, असेही त्यांनी सांगितले़ याप्रसंगी मंचावर राज्यपालांसमवेत वेणू गोपालरेड्डी, प्रा़ प्रदीप नाईक, रंजित कुमार, उल्हास मुडेकर, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, सरपंच भूपेंद्र आडे, महाजन माधव मरसकोल्हे, जि़प़ उपाध्यक्ष समाधान जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, तहसीलदार नरेंद्र देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ उपस्थित होते़प्रास्ताविक माधवराव पाटील यांनी केले़ प्रारंभी आदिवासी मुलींचे विद्यासंकुल पिंपळगाव येथील मुलींच्या नृत्यगीताने स्वागत झाले़राज्यपालांनी केले विकास कामांचे उद्घाटनराज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले़ विशेष केंद्रीय सहाय योजनेतून २ लाख रूपये अनुदानातून जंगुबाई आदिवासी महिला शेतकरी गटाने सुरू केलेल्या दालमिलचे उद्घाटन करण्यात आले़ ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतून ७ लाख ५० हजार रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे तसेच २ कोटी ९५ लाख रूपये खर्चून उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केले़ ९९ लाख ६२ हजार रूपयांच्या प्रस्तावित क्रीडा संकुलाचे तसेच मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आले़किनवट तालुक्यातील आदिवासीबहुल जवरला हे गाव २९ मे २०१५ रोजी राज्यपालांनी गावसंवाद कार्यक्रमात हे गाव विकासाकरिता दत्तक घेतल्याचे जाहीर केले़ तेव्हापासून येथे कोणकोणती विकासकामे पूर्णत्वास गेली याची पाहणी करण्यात आली़४खेळीमेळीच्या वातावरणात रिमझिम पावसाच्या गारव्यात अर्धा-पाऊण तास राज्यपालांचा संवाद कार्यक्रम चालला होता़४हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आणि राज्यपालाच्या आगमनानंतर ११़३० वाजता पावसाच्या सरी बरसल्या़यामुळे उपस्थितांची चांगलीच धांदल उडाली़