शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

देशातील पहिल्या तीन जिल्ह्यांत नांदेडचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:27 IST

केंद्र सरकारच्या पंतप्रधान एक्सलंन्ट अवॉर्डसाठी सुरु असलेल्या स्पर्धेत पीक विमा योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्हा देशातील पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे. या स्पर्धेचा अंतिम निकाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता असून जिल्ह्याला यश मिळण्याची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान एक्सलंन्ट अवॉर्ड: पीक विमा योजनेची यशस्वी अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : केंद्र सरकारच्या पंतप्रधान एक्सलंन्ट अवॉर्डसाठी सुरु असलेल्या स्पर्धेत पीक विमा योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्हा देशातील पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे. या स्पर्धेचा अंतिम निकाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता असून जिल्ह्याला यश मिळण्याची अपेक्षा आहे.पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत नांदेड जिल्ह्याचा सहभाग हा दिवसेंदिवस चढता राहिला आहे. गतवर्षी तर विम्याची रक्कम मिळविण्यात नांदेड जिल्हा देशात पहिल्या स्थानी होता.केंद्र सरकारच्या पंतप्रधान एक्सलंन्ट अवॉर्डसाठी देशभरातून मागविलेल्या अर्जात नांदेड जिल्ह्याने पीक विमा अंमलबजावणी गटात सहभाग नोंदविला. पहिल्या टप्प्यात देशभरातून आलेल्या ३२४ जिल्ह्यांपैकी १८ जिल्हे पात्र ठरविले. त्यात नांदेडचा समावेश होता. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे या योजनेच्या अंमलबजावणीबाबत सादरीकरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील नांदेडसह बीड, जालना, परभणी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचाही समावेश झाला होता. या सादरीकरणानंतर २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी केंद्राच्या विशेष पथकाने नांदेड जिल्ह्यात पीक विमा अंमलबजावणी योजनेची प्रत्यक्ष माहिती घेतली. केंद्राच्या अन्न व सार्वजनिक विभागाचे संचालक एन. के. कश्मीरा आणि जलसंसाधन विभागाचे उपसचिव एस. के. गर्ग यांचा समावेश असलेल्या पथकाने सांगवी, अर्धापूर, पार्डी, लोहा येथे भेटी देवून प्रत्यक्ष माहिती घेतली. या पथकाच्या अहवालानंतर नांदेड जिल्हा पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत देशात पहिल्या तीन जिल्ह्यांत पोहोचला आहे. यामध्ये मराठवाड्यातील बीडचा समावेश आहे. तर तिसरा जिल्हा तामिळनाडूतील शिवगंगा हा आहे. या स्पर्धेचा अंतिम निकाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येण्याची अपेक्षा आहे.पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत नांदेड जिल्ह्याला २०१५ मध्ये ४ लाख ७३ हजार शेतकऱ्यांना २४५ कोटींचा लाभ मिळाला होता. २०१६ मध्ये ७ लाख ६२ हजार शेतकºयांना ५०६ कोटी रुपये मिळाले होते. तर २०१७ मध्ये जिल्ह्यातील ९ लाख ६६ हजार शेतकºयांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. हा देशातील एक नवा उच्चांक ठरला आहे.८ लाख ४३ हजार बिगर कर्जदार शेतकºयांनी काढला विमापीक विमा योजनेत जिल्ह्यात यंदा ८ लाख ४३ हजार बिगर कर्जदार शेतकºयांनी पीक विमा काढला आहे. कर्जदार शेतकºयांचा पीक विमा हा बँकेकडून काढला जातो. मात्र बिगर कर्जदार शेतकºयांचा योजनेतील समावेश हा महत्त्वपूर्ण ठरला आहे.हीच बाब केंद्रीय पथकासाठी उत्सुकतेची ठरली आहे. योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. तुकाराम मोटे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांचे नियोजन महत्त्वाचे ठरले. पीक विमा भरण्यासाठी बँकांसह जिल्ह्यासह १३०० सेतू सुविधा केंद्र, सीएससी केंद्रांना प्रशिक्षणासह योग्य निर्देशही देण्यात आले होते. त्यामुळेच या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाल्याचे जिल्हाधिकारी डोंगरे यांनी सांगितले.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानNandedनांदेड