शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

नांदेडमध्ये रेल्वेत चोऱ्या करणारी अल्पवयीन मुलांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:49 IST

खेळण्या, बागडण्याच्या वयात चोरीसारखे गंभीर गुन्हे करणा-या अल्पवयीन मुलांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा बलाने पकडले आहे़ या टोळीत अवघ्या सहा वर्षापासून ते सोळा वर्षापर्यंतच्या मुलांचा समावेश आहे़ पकडलेल्या या आठ जणांनी रेल्वेने प्रवास करणा-या महिला आणि वृद्धांना टार्गेट केले होते़ त्यांची चोरीची पद्धत ऐकून रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारीही अव्वाक झाले़

ठळक मुद्देटोळीत आठ चिमुकल्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : खेळण्या, बागडण्याच्या वयात चोरीसारखे गंभीर गुन्हे करणा-या अल्पवयीन मुलांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा बलाने पकडले आहे़ या टोळीत अवघ्या सहा वर्षापासून ते सोळा वर्षापर्यंतच्या मुलांचा समावेश आहे़ पकडलेल्या या आठ जणांनी रेल्वेने प्रवास करणा-या महिला आणि वृद्धांना टार्गेट केले होते़ त्यांची चोरीची पद्धत ऐकून रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारीही अव्वाक झाले़रेल्वेतून दागिने, मोबाईल लंपास झाल्याच्या अनेक घटना घडतात़ परंतु त्यापैकी मोजक्याच तक्रारी ठाण्यापर्यंत येतात़ प्रवाशांना प्रवासात नेमक्या कोणत्या ठिकाणी चोरी झाली हे बहुतेक वेळी लक्षात राहत नाही़ त्यात चोरटे जर अल्पवयीन असतील तर त्यांच्यावर सहसा संशयही येत नाही़ याचाच फायदा घेत गेल्या काही दिवसांपासून नांदेड ते औरंगाबाद प्रवास करणा-या महिला व वृद्धांना टार्गेट करणारी एक अल्पवयीन मुलांची टोळी सक्रिय झाली होती़ गर्दी असणा-या रेल्वे गाड्यांची त्यासाठी त्यांनी निवड केली होती़ गर्दीचा फायदा घेत चलाखीने ते प्रवाशाचा ऐवज लंपास करीत होते़गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हे प्रकार घडत असल्यामुळे रेल्वे सुरक्षा बलही हैराण झाले होते़ याचा छडा लावण्यासाठी त्यांनी खब-याचे नेटवर्क वापरले़ त्यानंतर खब-याकडून या टोळीची सुरक्षा बलाचे पोनि़नवीन प्रतापसिंह यांना माहिती मिळाली़ त्यानंतर काही दिवस त्यांनी कर्मचा-यांना या अल्पवयीन मुलांवर पाळत ठेवण्याच्या सूचना दिल्या़ २ जून रोजी नंदीग्राम एक्स्प्रेस निघण्याच्या वेळी या अल्पवयीन मुलांना चोरी करताना रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचा-यांनी पकडले़ एकूण आठ अल्पवयीन मुले यावेळी नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये हातसफाईसाठी तयार होते़ पोनि़नवीन प्रतापसिंह यांनी या सर्व अल्पवयीन मुलांची चौकशी केली असता ही मुले औरंगाबाद, जालना, सिल्लोड अशा वेगवेगळ्या भागांतील असल्याचे समजले़ एकदा मोहीम फत्ते झाल्यानंतर ते आपल्या गावी परत जात होते़ त्यानंतर चोरीसाठी ते पुन्हा एकत्र जमत़ त्यांच्याकडे चोरीतील कुठलाही मुद्देमाल मात्र मिळाला नाही़ त्यानंतर त्यांना चाईल्ड लाईनच्या ताब्यात देण्यात आले़ दरम्यान, चिमुकल्या मुलांची ही टोळी चालविणारा कुणीतरी प्रमुख असून त्याचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोनि़ नवीन प्रतापसिंह यांनी दिली़---अशी होती चोरीची पद्धतआठ अल्पवयीन मुलांची ही टोळी नजरेनेच आपले सावज हेरत होते़ त्यानंतर प्रत्यक्ष चोरी करणारा वेगळा आणि त्याच्या सुरक्षेसाठी म्हणून इतर सर्व जण आजूबाजूला कडे करीत होते़ एकाने हातसफाई केल्यानंतर तो ऐवज लगेच दुस-याकडे नंतर तिस-याकडे असे करीत काही सेकंदात ही अल्पवयीन मुले चलाखीने आपली मोहीम फत्ते करीत होते़ त्यांची चोरीची ही पद्धत पाहून कर्मचारीही अवाक् झाले़---समुपदेशनाची गरजरेल्वेस्टेशनवर यापूर्वीही अनेकवेळा अल्पवयीन मुलांना चोरी करताना पकडण्यात आले आहे़ आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणाचा अभाव यामुळे ही मुले कोवळ्या वयातच गुन्हेगारीकडे वळतात़ त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समुपदेशनाची गरज आहे़ त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन नवीन प्रतापसिंह यांनी केले़

टॅग्स :Nandedनांदेडrailwayरेल्वेtheftचोरीCrimeगुन्हा