शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

मालवाहतुकीमध्ये नांदेड विभाग अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST

२५ किसान रेल्वे चालविल्या, सव्वापाच कोटींचा महसूल नांदेड : दमरेच्या नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा ...

२५ किसान रेल्वे चालविल्या, सव्वापाच कोटींचा महसूल

नांदेड : दमरेच्या नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. दरम्यान, नांदेड विभागाने कोरोनानंतरच्या काळात सुरू केलेल्या मालवाहतुकीमध्ये अत्यंत चांगली कामगिरी करत सव्वापाच कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागभूषण राव यांच्यासह विविध रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबीय उपस्थित होते.

नांदेड रेल्वे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी नांदेड यांनी कोरोना महामारीच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केल्याबद्दल विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी कौतुक केले. या वर्षभरात नांदेड रेल्वे विभागातून श्रमिकांकरिता २८ श्रमिक विशेष गाड्या चालविण्यात आल्या. तसेच गेल्या वर्षभरात नांदेड रेल्वे विभागाने उन्हाळी सुट्ट्या आणि इतर सणानिमित्त १ हजार ६५ विशेष गाड्या चालविल्या. तसेच शेतीमालाच्या लवकर आणि किफायतशीर वाहतुकीकरिता नांदेड रेल्वे विभागातून ५ जानेवारीपासून किसान विशेष रेल्वे चालविण्यात येत आहेत. नांदेड रेल्वे विभागातून आत्तापर्यंत २५ किसान विशेष रेल्वे गाड्या चालविल्या आहेत. ज्यात प्रामुख्याने कांदा पाठविण्यात येत आहे. या किसान रेल्वे न्यू गुवाहाटी, न्यू जालपाईगुडी, चितपूर, मालडा, अगरतला आदी ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत. या वर्षी मार्च महिन्याअखेरीस आणखी ७५ किसान विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे उद्दिष्ट आहे.

तीन स्थानकात विलगीकरण कक्ष

नांदेड रेल्वे विभागाने नांदेड, पूर्णा आणि जालना येथे कोविड-१९ विलगीकरण कक्ष बनवले आहेत. ज्यात वाय-फाय इंटरनेट सुविधासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वर्षी जालना रेल्वे स्थानकावर ४० सी.सी. टी. व्ही. कॅमेरे लावण्यात आले आहेत.

नांदेड रेल्वे स्थानकावरून निघणाऱ्या सर्व गाड्यांतील सर्व डब्यांना रोज सॅनिटायिझ करण्यात येत आहे. यावर्षी अकोला ते अकोट दरम्यान ४४.८ किलोमीटरचा नवीन ट्रेक बनविण्यात आला.

कर्मचाऱ्यांचा गौरव

उपिंदर सिंघ यांनी दक्षिण मध्य रेल्वे महिला कल्याण संगठन करत असलेल्या कार्याचा गौरव केला. कोरोना महामारीच्या काळात महिला कल्याण संगठनने पुढाकार घेऊन कार्मचाऱ्यांकरिता मास्क, सॅनिटायझर बनवले आणि मुबलक प्रमाणात पुरवठा केल्याचा विशेष उल्लेख केला. तसेच गरजूंना अन्नधान्याचे वाटप केल्याचे सांगितले.