शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ४६१ कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 01:18 IST

जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी २०१९-२० साठीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या ४६० कोटी ९७ लाख १८ हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या चार सदस्यांचे निलंबनही घेतले मागे

नांदेड : जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी २०१९-२० साठीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या ४६० कोटी ९७ लाख १८ हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता देण्यात आली. याच बैठकीत २९ आॅक्टोबर रोजीच्या सभेत गैरवर्तन केल्याच्या आरोपावरुन निलंबित केलेल्या चार सदस्यांचे निलंबन मागे घेण्याबाबतची आवश्यक प्रक्रिया करण्याचे निर्देशही पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले.जिल्हा नियोजन भवनमध्ये बुधवारी दुपारी पालकमंत्री कदम यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत २०१९-२० च्या जिल्हा प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी २४७ कोटी ९५ लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १५९ कोटी ३ लाख, आदिवासी उपयोजनेसाठी २९ कोटी ११ लाख २९ हजार, आदिवासी क्षेत्र बाह्य उपयोजनेसाठी ११ कोटी ५७ लाख ६ हजार आणि म्हाडा योजनेसाठी १३ कोटी ३० लाख ८३ हजार रुपयांचे नियतव्यय शासनाने ठरवून दिलेल्या कमाल आर्थिक मर्यादेशिवाय प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याचवेळी शासनाच्या सूचनेनुसार ४२ कोटी रुपयांचा निधी संपूर्ण स्वच्छता अभियानासाठी राखीव ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.२०१८-१९ मधील जिल्हा वार्षिक योजनेतील डिसेंबरअखेरीस ७४.३८ टक्के खर्च झालेल्या रकमेचा आढावा सादर करण्यात आला. तसेच अखर्चित निधीतून पुनर्विनियोजनद्वारे विविध विकासकामांसाठी महसूल लेखाशीर्षअंतर्गत १९ कोटी ८८ लाख ५० हजार रुपये तसेच भांडवली लेखा शीर्षकाअंतर्गत १० कोटी ८४ लाख ३५ हजार रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.चालू वर्षाच्या सर्वसाधारण योजनेतील २० कोटी रुपयांच्या अखर्चिक निधीचे पुनर्विनियोजन करताना आवश्यक त्या योजनांसाठी ती रक्कम देण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी दिला. याबाबतचे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. २० कोटी रुपये अखर्चित राहण्याचे कारण तसेच आदिवासी उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजनेतील योजनाचा खर्च त्वरित करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. खर्च न करणाºया विभागांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे.कौठा परिसरात बांधण्यात येणाºया निर्वाचन भवनाचा प्रस्ताव मार्गी लावावा, अशी मागणी खा. चव्हाण यांनी केली. त्यावेळी आवश्यक ती सर्व प्रक्रिया करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.दुसरीकडे, महावितरणचे जिल्ह्यामध्ये बंद पडलेले ट्रान्सफार्मर कधी दुरुस्त होणार? असा प्रश्न खा. चव्हाण यांनी सभागृहात उपस्थित केला. त्याच विषयात आ. सुभाष साबणे, आ. नागेश पाटील आष्टीकर, आ. अमिता चव्हाण यांनीही भाग घेत आपल्या मतदारसंघात वीजव्यवस्था नसल्याने शेतकरी तसेच सामान्य नागरिक त्रस्त असल्याचे सांगितले. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष वाहणे यांनी जिल्ह्यातील १७२ ट्रान्सफार्मर बंद असल्याचे सांगितले. तसेच ते दुरुस्त असल्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. १५ दिवसांत ही कामे पूर्ण करण्यात यावी, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.जिल्ह्यातील शाळा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आ. अमिता चव्हाण यांनी केली. विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्वच्छता व इतर बाबींसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आ. राजूरकर, आ. डी. पी. सावंत यांनी केली.होट्टलच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी आ. साबणे यांनी केली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी एक कोटी रुपये मंजूर केले. तर जिल्ह्यातील तलावांच्या दुरुस्तीसाठी मीनल खतगावकर यांनी सभागृहात विषय मांडला. त्यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील दहा तलावांच्या दुरुस्तीसाठी पर्यावरण विभागाकडून ५ कोटींना मंजुरी देण्यात येईल, असे सांगितले.या बैठकीत प्रारंभी पालकमंत्री कदम यांनी मराठवाडा दुष्काळाने होरपळत असून कोणाचाही सत्कार करु नये, अशी सूचना केली. बैठकीस आ. वसंतराव चव्हाण, आ. हेमंत पाटील, आ. तुषार राठोड, आ. राम पाटील रातोळीकर, जि. प. अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, महापौर शीला भवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़तिळगुळानंतर निलंबन मागेसभेच्या प्रारंभीच पालकमंत्री रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी या नेत्यांनी एकमेकांना तिळगूळ देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. अमिता चव्हाण, आ. अमर राजूरकर यांचीही उपस्थिती होती. या तिळगूळ भेटीनंतर सभेमध्ये प्रारंभीच काँग्रेसच्या चार सदस्यांच्या निलंबनाचा विषय खा. चव्हाण यांनी मांडला. सभागृहात प्रश्न मांडताना दोन्ही बाजूंनी बोलले जाते. त्यामुळे हा वैयक्तिक विषय नसतो. त्यामुळे सभागृहात विषय मांडताना एखाद्या सदस्याकडून काही कमीजास्त झाले असेल तर त्याकडे लक्ष देवू नये, असे सांगत निलंबित सदस्यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती केली. हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे सदर प्रकरणात दाखल केलेली याचिका मागे घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत न्यायालयातून हे प्रकरण मागे घेतल्यानंतर निलंबन मागे घेण्याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करावी,असे निर्देश जिल्हाधिकाºयांना दिले. निलंबनाच्या या विषयावर सभागृहाबाहेरच तोडगा निघाल्याचे खा. अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.

इसापूर प्रकल्पाचे पाणी वळविण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाचा फटका नांदेडसह हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यांनाही बसणार असल्याचे सांगत खा. चव्हाण यांनी मुख्यमंत्री अंतिम करीत असलेल्या जलआराखड्यात उपरोक्त जिल्ह्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता पालकमंत्र्यांनी घ्यावी, अशी मागणी केली. एखाद्या भागाचा अनुशेष दूर करताना दुस-या भागात अनुशेष तयार होऊ नये, ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यावी. त्यातून नांदेडचा पाणीप्रश्न बिकट होणार नाही, असेही खा.चव्हाण यांनी बैठकीत सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदcollectorजिल्हाधिकारीAshok Chavanअशोक चव्हाणRamdas Kadamरामदास कदम