शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

नांदेड जिल्ह्यात केवळ १२ टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 12:07 AM

एकीकडे लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना मतदार राजा मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आजघडीला केवळ १२.३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी तीन महिने तहान कशी भागवायची याचीच चिंता अनेक भागातील नागरिकांना पडली आहे.

ठळक मुद्देतीन महिने तहान भागवायची कशी? याचीच जिल्हावासीयांना चिंता

नांदेड : एकीकडे लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना मतदार राजा मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आजघडीला केवळ १२.३७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी तीन महिने तहान कशी भागवायची याचीच चिंता अनेक भागातील नागरिकांना पडली आहे.लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या १४ उमेदवारांचा प्रचार वेगात सुरू आहे. या उमेदवारांना स्थानिकांकडून पाण्याच्या प्रश्नावर उत्तर द्यावे लागत आहे. पाणी प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन देवून उमेदवार परतत आहेत. पण नागरिक मात्र पाण्यासाठी भटकंती करत आहे.जिल्ह्यात असलेल्या दोन मोठ्या प्रकल्पापैकी मानार प्रकल्पात १९.४८ टक्के म्हणजेच २६.९२ दलघमी पाणी साठा आहे तर विष्णूपुरी प्रकल्पात १४.१६ दलघमी म्हणजेच १७.५३ टक्के पाणी उरले आहे. यातीलही उपयुक्त जलसाठा हा केवळ १४.१६ दलघमी इतका आहे. त्यामुळे नांदेड शहरावर भीषण जलसंकट घोंगावत आहे. महापालिकेने तसेच जिल्हा प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्याने शहराला आता पाणी कपातीला तोंड द्यावे लागणार आहे. ही पाणी कपात १८ एप्रिल नंतर होणार हे निश्चित आहे. ही पाणीकपात आता तीन की चार दिवसाची राहील. हेच पहावे लागणार आहे.जिल्ह्यात ९ मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पात फक्त ८ टक्के जलसाठा उरला आहे. मध्यम प्रकल्पात ११.५ दलघमी जलसाठा आहे. उच्च पातळी बंधाऱ्याची क्षमता १२१.७० दलघमी इतकी असताना आजघडीला या बंधाऱ्यात ११.१४ दलघमी पाणी शिल्लक आहे. जिल्ह्यातील लघु प्रकल्पात १०.६३ टक्के पाणी राहिले आहे. ८८ लघु प्रकल्पात २०.३१ दलघमी पाणी राहिले आहे.जिल्ह्यात ८३.५८ दलघमी पाणीसाठा उरला आहे. या पाणी साठ्यातून तीन महिन्याची तहान भागवावी लागणार आहे.प्रशासकीय यंत्रणा १८ एप्रिल पर्यंत निवडणुकीत व्यस्त राहणार आहे. त्यानंतरच जिल्ह्यातील पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आता पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागणार आहे.नांदेड परिमंडळात असलेल्या १४६ प्रकल्पामध्ये केवळ १०.८२ टक्के पाणी शिल्लक आहे. २९१ दलघमी साठा नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि परभणी जिल्ह्यात आहे. त्यातही सर्वाधिक पाणी इसापूर प्रकल्पात २०३.११ दलघमी म्हणजेच २१.७ टक्के आहे. त्याचवेळी हिंगोली जिल्ह्यातील येलदरी, सिद्धेश्वर प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणारमालेगावला इसापूरचे पाणी देण्यास दुजाभाव

  • अर्धापूर तालुक्यातील मालेगाव परिसराला इसापूर ऊर्ध्व पैनगंगा धरणाचे हक्काचे पाणी देण्यास शासन दुजाभाव करीत असून मालेगाव परिसराला पाणी देण्याची मागणी फेटाळली असून यामुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. मालेगाव परिसरातील गावांना ऊर्ध्व पैनगंगा धरणांचे पाणी देण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या काळात झाला होता. सद्यस्थितीत येलदारी व सिद्धेश्वर धरण कोरडे पडले आहेत.
  • या पार्श्वभूमीवर पूर्णा प्रकल्प अंतर्गत येणा-या लाभ क्षेत्रातील गावांना इसापूर धरणाचे पाणी दाभाडी नाल्यातून सोडण्यात यावे अशी मागणी या भागातील जेष्ठ नेते केशवराव इंगोले यांच्यासह अनेक शेतकरी यांनी जलसंपदा मंत्री यांच्याकडे केली. परंतु या मागणीकडे राजकारण पुढे करीत पाणी पाळी न देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप केशवराव इंगोले यांनी केला आहे. पाणी सोडण्याची मागणी या भागातील शेतकरी यांनी पाटबंधारे विभागाकडे केली. पाटबंधारे विभागाने हा विषय महामंडळाकडे वर्ग केला. हिंगोली जिल्हातील दाभाडी नाल्याच्या दुरुस्ती साठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही हे काम रेंगाळले आहे.
  • दुष्काळी परिस्थितीत इसापुर धरणाचे पाणी देण्याचा निर्णय २००९ साली झाला होता. आम्ही निवेदनाद्वारे मागणी करूनही वरिष्ठ अधिकारी पाणी देण्यास टाळाटाळ करीत आहेत. या संदर्भात न्यायालयात धाव घेणार असल्याचे केशवराव इंगोले यांनी सांगितले.
टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीvishnupuri damविष्णुपुरी धरणwater scarcityपाणी टंचाई