शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

नांदेड शहरातील पाणीपुरवठा योजनेतील कामात पारदर्शकतेचा अभावाने अनेक कामे वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 6:36 PM

केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत नांदेड महापालिका हद्दीत पाणीपुरवठा योजनेसाठी २४ कोटी १२ लाख रुपये केंद्र शासनाने वर्षभरापूर्वी मंजूर केले असले तरी या योजने अंतर्गत केली जात असलेली कामे वादाच्या भोवर्‍यात सापडली आहेत. पाणीपुरवठा विभागाकडून कोणती कामे केली जात आहेत, याबाबत अद्यापही पारदर्शकता आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नांदेड : केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत नांदेड महापालिका हद्दीत पाणीपुरवठा योजनेसाठी २४ कोटी १२ लाख रुपये केंद्र शासनाने वर्षभरापूर्वी मंजूर केले असले तरी या योजने अंतर्गत केली जात असलेली कामे वादाच्या भोवर्‍यात सापडली आहेत. पाणीपुरवठा विभागाकडून कोणती कामे केली जात आहेत, याबाबत अद्यापही पारदर्शकता आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमृत अभियानांतर्गत नांदेड शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी अतिरिक्त वितरण व्यवस्थेचे काम हाती घेण्यात आले आहे. ८ फेब्रुवारी २०१७ रोजी या प्रकल्पास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. आगामी ३० वर्षांतील लोकसंख्या अपेक्षित धरुन पाणीपुरवठा योजनेची कामे महापालिका करणार आहे. त्यामध्ये गांधी पुतळा येथे पाण्याची टाकी उभारली जाणार आहे. त्याचवेळी शहराच्या विविध भागात ४५० मि.मी. ते २५० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. शहरात जवळपास १३२.५७ कि.मी. लांबीची जलवाहिनी  टाकण्याचे काम या योजनेतून केले जाणार आहे. त्याचवेळी या योजनेतून केली जाणारी कामे वादाच्या भोवर्‍यातच सापडली आहेत.

अमृत योजनेतून शहरातील नगिनाघाट गुरुद्वारा भागात सुरू केलेले काम ऐनवेळी बंद करण्यात आले. विशेष म्हणजे, हे काम संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते सुरू करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर दोन तासांतच या कामाला आडकाठी आणण्यात आली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सदर उद्घाटनाचा कार्यक्रम आम्हाला माहीतच नव्हता, अशी भूमिका घेतली होती. विशेष म्हणजे, या उद्घाटन सोहळ्यास महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे पाणीपुरवठा विभागातील तत्कालीन अधिकार्‍यांच्या बदलत्या भूमिकेचे कारण काय? असा प्रश्नही पुढे आला आहे. महापौर शीलाताई भवरे यांच्या  प्रभागातील कामही अमृत योजनेतून सुरू करण्यात आले आहे. या कामाच्या दरम्यानही स्थानिक नगरसेवकांना डावलल्याची तक्रार करण्यात आली होती.

अमृतच्या कामासंदर्भातील तक्रार नगरसेवक गुरुप्रीतकौर सोडी यांनी विधानमंडळ अंदाज समितीकडेही केली आहे. त्यामुळे जवळपास २४ कोटींची ही कामे कुठे केली जात आहे़ याबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पारदर्शकता ठेवली जात असल्याने हा निधी कागदावरच खर्च केला जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. गुरू-त्ता-गद्दी कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा व मलनि:सारणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता तीच कामे पुन्हा दाखवून निधीची विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

टॅग्स :NandedनांदेडMuncipal Corporationनगर पालिका