शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

Nanded: बडे दिलवाला शेतकरी! पूर पार करत चार दिवसांपासून उपाशी वानरांना दिले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 20:00 IST

पूर ओसरला नाही, पण माणुसकी जागी! पुरात अडकलेल्या वानरांना शेतकऱ्यांनी पोहत जाऊन दिले जीवदान

अर्धापूर (नांदेड): अर्धापूर तालुक्यातील असना नदीच्या पात्रात अतिवृष्टी आणि गोदावरी नदीच्या बॅक वॉटरमुळे पूरस्थिती कायम आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाणी साचल्याने येथील शेतात पुरामुळे एका झाडावर अडकलेल्या वानरांची टोळी उपाशीपोटी तडफडत होती. हा प्रकार परिसरातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यातून पोहत जाऊन या वानरांना अन्न पुरवले आणि त्यांचे प्राण वाचवले.

चार दिवसांपासून पाण्यात अडकले होते वानरअसना नदी गोदावरीला मिळत असल्याने आणि गोदावरी नदी पाणी घेत नसल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील देवगाव शिवारात सखल भागात एक ते दोन परस (सुमारे ५ ते १० फूट) पाणी साचले आहे. याच परिसरातील एका उंच झाडावर वानरांची एक टोळी गेल्या चार दिवसांपासून अडकली होती. चार दिवसांपासून उपाशी असल्याने हे वानर तडफडत असल्याचे शेतकऱ्यांना दिसले.

शेतकऱ्यांनी दाखवली तत्परतापरिसरातील शेतकरी उमाजी कपाटे, ओम जाधव, संतोष जाधव, विठ्ठल जाधव, माधव जाधव, सदाशिव तिडके, उनकेश्वर जाधव, गजानन तिडके, संभाजी जाधव यांनी तातडीने एकत्र येऊन मदतीचा निर्णय घेतला. त्यांनी सुमारे दीड परसभर पाण्यातून मार्ग काढत त्या झाडापर्यंत पोहोचले. शेतकऱ्यांनी झाडावरील वानरांना केळी आणि इतर फळे दिली, ज्यामुळे त्यांना तात्काळ जीवदान मिळाले. इतकेच नाही तर काही वानरांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यातही त्यांनी मदत केली. शेतकऱ्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि माणुसकीमुळे उपाशी असलेल्या अनेक वानरांचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या या धाडसाचे आणि माणुसकीचे परिसरात कौतुक होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded Farmers Risk Lives to Save Starving Monkeys from Flood

Web Summary : Farmers in Nanded bravely rescued a troop of monkeys stranded in floodwaters for four days. Risking their own lives, they waded through the water to deliver food, saving the starving animals from certain death, showcasing remarkable humanity.
टॅग्स :floodपूरNandedनांदेडMonkeyमाकडFarmerशेतकरीRainपाऊस