शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

सर्व आघाड्यावर मोदी सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:15 AM

परदेश दौ-यामुळे मोजकेच दिवस भारतात असणारे पंतप्रधान मोदी हे देशाचे अर्धवेळ पंतप्रधान व पूर्ण वेळ वास्को द गामा असल्याची खरमरीत टीका करीत, सर्व आघाड्यावर मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप कन्हैय्याकुमार यांनी केला.

ठळक मुद्देकंधारमध्ये कन्हैय्याकुमार यांचा हल्लाबोल

कंधार : सतत परदेश दौऱ्यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारी, व्यापारी, सामान्य जनतेचे प्रश्र सोडवण्यासाठी वेळ देत नाहीत. परदेश दौ-यामुळे मोजकेच दिवस भारतात असणारे पंतप्रधान मोदी हे देशाचे अर्धवेळ पंतप्रधान व पूर्ण वेळ वास्को द गामा असल्याची खरमरीत टीका करीत, सर्व आघाड्यावर मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप कन्हैय्याकुमार यांनी केला.कंधार येथे जि.प.हायस्कूल मैदानावर आयोजित संविधान बचाओ, देश बचाओ! किसान, मजदूर, युवक बचाओ! देश बचाओ! अभियानातंर्गत जाहीर सभेत ते बोलते होते. अध्यक्षस्थानी माजी आ.शंकरअण्णा धोंडगे होते. तर आ.बाबाजानी दुराणी, माजी आ. गुरूनाथराव कुरूडे, कॉ. प्रदीप नागापूरकर, कॉ. राजू पाटील, कॉ. अभय टाकसाळ, माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.देशातील ज्वलंत प्रश्राकडे दुर्लक्ष करून धर्म व जातीभेदावर भाजपाकडून विशेष भर दिला जात आहे. संविधानाची मूल्ये मोडीत काढली जात आहेत. देशाच्या सीबीआय, रिजर्व्ह बँकेसारख्या संस्था दुबळ्या केल्या जात आहेत. लोकशाही व्यवस्था खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत, देशाचा इतिहास चुकीच्या पद्धतीने पंतप्रधान मोदी मांडत आहेत. मराठा, पटेल, गुर्जर, जाठ, धनगर, मुस्लिम आदीना आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढायचे सोडून एकमेकात दूरावा, भांडणे निर्माण कसे होतील. यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. संविधानात धर्मनिरपेक्षता बळकटीकरणावर भर देण्यात आला आहे. मात्र सामाजिक न्याय, समता, बंधुत्व आदी व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. व्याख्यानाला नगरसेवक सुधाकर कांबळे, अ.मन्नान चौधरी, बबर महमंद, पंकज चव्हाण, दिलीप धोंडगे, रा.कॉ.चे बाबुराव केंद्रे, शिवदास धमार्पूरीकर, राजकुमार केकाटे, हब्बूभाई, गौतम पवार, सुरेश कल्हाळीकर, डॉ. गफारखान, संजय केकाटे, आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन व आभार डॉ. सुनील धोंडगे यानी मानले.भाजपाकडून केवळ फसव्या घोषणाविकासाचे स्वप्न दाखवून भाजपाने अनेक घोषणा केल्या. मात्र त्यांची अंमलबजावणी करण्याऐवजी भावनात्मक मुद्यावर भर दिल्यानेच भाजपा अडचणीत आली आहे. याचाच प्रत्यय पाच राज्यातील निवडणुकीत आल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Nandedनांदेडkanhaiya kumarकन्हैय्या कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी