शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

नांदेड जिल्ह्यातून नुकसानीपोटी तुटपुंज्या निधीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 16:20 IST

प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रूपये अपेक्षित निधी

ठळक मुद्देशेतकऱ्यांमधून नाराजी

नांदेड : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनामे करुन मदतीसाठी प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला आहे.  परंतु हेक्टरी ६ हजार ८०० रुपये अपेक्षित निधी प्रस्तावात दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  

आॅक्टोबर महिन्याच्या २० तारखेनंतर बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावली. त्यापाठोपाठ शेवटच्या आठवड्यात अनेक ठिकाणी  मुसळधार पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे हाती आलेले सोयाबीन पावसाने मातीमोल केले. तर शेतातील अवजारांसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा असून सदर कालावधीत सोयाबीन काढणीला आले होते तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन कापून त्याची वळई लावली होती. सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. परिणामी ढिगारे करुन ठेवलेल्या सोयाबिनच्या वळईचे नुकसान झाले तर ज्वारीच्या कणसाला अंकुर फुटले. सोयाबीन, कापूस या पिकांसह फुलांच्या शेतीचे तसेच भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या वतीने तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांच्या मदतीने युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्यात आला. परंतु ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांची आकडेवारी शासनदरबारी पाठविण्यात आली आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, ज्वारी, तूर,मूग आदी पिकांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये निधी अपेक्षित असल्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत किती मिळेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावानुसार जिल्ह्यात जिरायती पिकाखालील बाधित क्षेत्र ६ लाख ३३ हजार २३१ हेक्टर असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख ७५ हजार ३७३ हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र आहे तर कापूस २ लाख ४ हजार १६५, मका- ४ हेक्टर, ज्वारी- ३५ हजार ८८४ हेक्टर, तूर- १२ हजार ५००, मूग १२२३ हेक्टर तर ४ हजार ६ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे.  बागायत पिकाखाली भाजीपाला व इतर पिकांसाठी ८ लाख २३ हजार ५०० रुपये निधी अपेक्षित आहे. यामध्ये सर्वाधिक ५९ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्या पाठोपाठ १७७ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये  मोसंबी- ७ हेक्टर, आंबा- ६ हेक्टर, चिकू ३ हेक्टर आदी फळबागांचा समावेश आहे. त्यासाठी ३१ लाख ८६ हजार निधी अपेक्षित असून हेक्टरी १८ हजार          रुपये प्रस्तावित केले आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त बाधित क्षेत्र नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ६ लाख ३३ हजार ४६९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के व त्यापेक्षा अधिक जास्त नुकसान झाले आहे. यामध्ये जिरायत- ६ लाख ३३ हजार २३१ हेक्टर, बागायत- ६१ हेक्टर, फळपिके- १७७ हेक्टर बाधित क्षेत्र आहे. या सर्व पिकांसाठी ४३० कोटी ९९ लाख ८० हजार ३०० रुपये अपेक्षित निधीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे़

धर्माबाद तालुक्यात भाजीपाल्याचे नुकसानधर्माबाद तालुक्यात सर्वाधिक ३७ हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ २ हेक्टरवरील केळींचे नुकसान असून प्रती हेक्टरी १३ हजार ५०० निधी अपेक्षित असून एकूण ५ लाख २६ हजार ५०० रुपये अपेक्षित निधी प्रस्तावित आहे. त्याचबरोबर मुखेड तालुक्यात २२ हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान असून येथील ३० शेतकऱ्यांना २ लाख ९७ हजार निधी अपेक्षित असल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी फळ पिके सोडून जिरायत पिकाखालील क्षेत्रासाठी ४३० कोटी ५९ लाख ७० हजार ८०० रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचे प्रस्तावात नमुद केले आहे. त्याचबरोबर बागायत पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रूपये मदत अपेक्षीत असून त्यासाठी ८ लाख २३ हजार ५०० रूपये तर फळ पिकाखालील बाधीत क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रूपये मदत प्रस्तावित केली असून त्यासाठी ३१ लाख ८६ हजार रूपयांचा निधी अपेक्षित असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे़ 

८५ हजार शेतकऱ्यांचे दोन हेक्टरपेक्षा अधिक नुकसान४२ हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ८५ हजार ८५० असून बाधित क्षेत्र १ लाख ८६ हजार ५४७ हेक्टर आहे. त्याचबरोबर २ हेक्टरपर्यंतचे ६ लाख ३२ हजार २४९ शेतकऱ्यांची ४ लाख ६१ हजार ५३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मुखेड तालुक्यात ६६ हजार ३८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ हदगाव - ६४ हजार ५००, कंधार तालुक्यात ६४ हजार ३१५, लोहा तालुक्यात ६३ हजार ३५४ त्यापाठोपाठ देगलूर तालुक्यात ४४ हजार ९९०, नायगाव तालुक्यात ४६ हजार ६३३, हिमायतनगर तालुक्यात ३४ हजार ४०५, बिलोली तालुक्यात ३२ हजार ८२६, नांदेड तालुक्यात ३० हजार ६७९, अर्धापूर तालुक्यात २५ हजार २८६, मुदखेड तालुक्यात १६ हजार ९२५, धर्माबाद तालुक्यात २४ हजार २३५, किनवट तालुक्यात ४३ हजार २१५, माहूर तालुक्यात २१ हजार ४०९,  भोकर तालुक्यात ४१ हजार ५०७ तर उमरी तालुक्यात २७ हजार ६५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती