शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

जलयुक्तमध्ये भ्रष्टाचार; आता वॉटरग्रीडच्या नावे मराठवाड्याची धूळफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 14:03 IST

भाजप सरकारच्या मागील पाच वर्षाच्या कारभाराकडे पाहिले असता या सरकारने महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते़

ठळक मुद्देपैनगंगेचे पाणी पळविल्याने नांदेडचे वाळवंट होईलपीएमसी बँक घोटाळ्यात भाजपाच्या जवळचे १२ महत्त्वाचे लोक गुंतलेलेविरोधकांना नमविण्यासाठी सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग

- विशाल सोनटक्केनांदेड : जलयुक्त शिवार योजना ही मुळची काँग्रेसची योजना होती़ या योजनेतून काही चांगली कामे झाली असली तरी यात भाजपा सरकारकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला़ त्यामुळे योजनेमागचा हेतू सफल होवू शकला नाही़ आता वॉटरग्रीडच्या नावाने प्रचार केला जात आहे़ मात्र एकीकडचे पाणी काढायचे आणि दुसरीकडे टाकायचे, यातून दुष्काळमुक्ती कशी काय होणार? असा प्रश्न करीत या योजनेच्या नावे मराठवाड्यातील जनतेची निव्वळ धूळफेक सुरू असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला़ 

बुधवारी सकाळी ते खास लोकमतशी बोलत होते़ भाजप सरकारच्या मागील पाच वर्षाच्या कारभाराकडे पाहिले असता या सरकारने महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते़ आज प्रचाराच्या निमित्ताने गावागावात फिरत आहे़ मात्र एकाही गावात संपूर्ण कर्जमाफी झालेला एकही शेतकरी भेटला नसल्याचे ते म्हणाले़ भाजपाने कालच संकल्प पत्र जाहीर केले़ पाच वर्षात एक कोटी रोजगार देण्याची घोषणा केली़ मागच्या वर्षीच्या जाहीरनाम्यातही त्यांनी अशीच आश्वासने दिली होती़ त्या आश्वासनांचे काय झाले? रोजगार सोडा, आहे तो कामधंदा बंद पडला आहे़ त्यामुळे बेरोजगारांची फौज निर्माण झाली आहे़ मात्र या प्रश्नाबाबत  सरकार अद्यापही गंभीर नाही़  विरोधकांना नमविण्यासाठी सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला़ 

पीएमसी बँकेसंदर्भात विचारले असता सदर बँक घोटाळ्यात भाजपाच्या जवळचे १२ महत्त्वाचे लोक गुंतलेले आहेत़ ईडी आणि इतर कारवाईच्या नोटीसा तुम्ही दुसऱ्यांना पाठवता, मग पीएमसी घोटाळ्यात अद्यापपर्यंत सरकारने ठोस कारवाई का केली नाही? असे ते म्हणाले़  नांदेडचा पाण्याचा विषय गंभीर आहे़ सहा तालुक्याला सध्या उर्ध्व पैनगंगेचे पाणी येते़ मात्र या भागातील १५ हजार हेक्टरवरील पाणी वळविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़ असे झाल्यास आमच्या भागातील शेती काय, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे़ भाजपाचा हा निर्णय भविष्यात नांदेडचे वाळवंट करणारा आहे़ त्यामुळेच या विरोधात मी सर्व पातळीवर लढा देत आहे़ मात्र सरकार ढिम्म आहे़ मुख्यमंत्री दोन वेळा जिल्ह्यात येवून गेले़ मात्र या पाणीप्रश्नाबाबत त्यांनी चकार शब्द काढला नसल्याचेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले़

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ashok Chavanअशोक चव्हाणNandedनांदेडbhokar-acभोकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस