शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

'मतदानाला गावाकडे या'; उमेदवारांकडून स्थलांतरीत मतदारांचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 19:27 IST

प्रचार अंतिम टप्प्यात येताच मतदारांचा शोध सुरु

ठळक मुद्देखरिप हंगाम संपताच हजारो कुटुंबांचे मतदारसंघातून स्थलांतरण रोजगारासाठी पुणे, मुंबई तसेच हैद्राबाद येथे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर बाहेरगावातील मतदारांना एकत्रित करुन आणण्याची व्यवस्थाही केली जात आहे.

- अनुराग पोवळे 

नांदेड : एकीकडे रोजगाराचे प्रचारात आश्वासन  देत असलेल्या प्रमुख उमेदवारांकडून आता रोजगारासाठीच स्थलांतरीत झालेल्या मतदारांचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे. या मतदारांना मतदानासाठी आणायचे नियोजनही केले जात आहे.

जिल्ह्यात असलेल्या नऊ मतदारसंघातील  सर्वाधिक स्थलांतर मुखेड, कंधार, लोहा, नायगांव या तालुक्यातून होत असल्याने या मतदारसंघात स्थलांतरीत  मतदारांचा शोध सुरू आहे.  नायगाव मतदारसंघातील नायगावसह सीमावर्ती भागातील उमरी आणि धर्माबाद तालुक्यातून रोजगारासाठी जवळच्या तेलंगणा राज्यात स्थलांतरीत होत आहेत. नायगाव मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या १ लाख ३६ हजार ४०८ इतकी आहे. या मतदारसंघातून स्थलांतरणाचे प्रमाण मोठे आहे. सर्वाधिक चिंताजनक परिस्थिती मुखेड मतदारसंघात आहे. या मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिंचनाची व्यवस्था नसल्याने खरिप हंगाम संपताच हजारो कुटुंब या मतदारसंघातून स्थलांतरण करीत असतात. याच मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कंधारच्या काही भागातूनही रोजगारासाठी पुणे, मुंबई तसेच हैद्राबाद येथे स्थलांतर होते. या मतदारसंघात १ लाख ३४ हजार १६९ मतदार आहेत. 

मुखेड मतदारसंघालगत असलेल्या लोहा मतदारसंघातही स्थलांतरणाचे प्रमाण मोठे आहे. डोंगराळ भाग, रोजगाराची कोणतेही साधन नसल्याने येथे कुटुंबासह आता युवकांनाही मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावे लागत आहे. या मतदारसंघातून मोठ्या संख्येने रोजगारासाठी पुणे, मुंबईसह नाशिक आदी महानगरात स्थलांतर होत आहे. लोहा मतदारसंघात २ लाख ७३ हजार २२२ मतदार आहेत. या मतदारांना उमेदवार रोजगाराचे आश्वासन देत आहेत.  याच स्थलांतरीत मतदारांचा शोध प्रमुख उमेदवारांकडून घेतला जात आहे. मतदार यातील नावे शोधताना तो मतदार गावात नसल्याचे लक्षात येताच त्याचा ठाव ठिकाणा शोधला जात आहे. त्याच्याशी संपर्क करुन मतदानाच्या दिवशी गावाकडे ये, असा निरोप दिला जात आहे. इतकेच नव्हे तर बाहेरगावातील मतदारांना एकत्रित करुन त्यांना आता आणण्याची व्यवस्थाही केली जात आहे.  एकूणच स्थलांतरीत मतदारांची विनवणी आता उमेदवारांकडून सुरू आहे. 

जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योगधंदे नसल्याने स्थलांतरणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. आहे ते कारखानेही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात बंद पडलेल्या कारखान्यांचीही मोठी संख्या आहे. उस्मानशाही मील, टेक्सकॉम उद्योग, सुत गिरण्या बंद अवस्थेत असल्याने रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बहुतांश उमेदवारांनी रोजगाराचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन प्रचारात दिले आहे. दर निवडणुकीत असेच आश्वासने दिले जात असतात. जे की कधीही पूर्ण झाले नाहीत.

लोहा मतदारसंघाचा प्रचार पुण्यातलोहा मतदारसंघातील अनेक युवक हे रोजगारासाठी पुण्यामध्ये स्थलांतरीत झाले आहेत. हीच बाब लक्षात घेवून मतदारसंघातील एका उमेदवाराने चक्क पुणे येथेच या स्थलांतरीत मतदारांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात पुन्हा एकदा मतदारसंघात रोजगार निर्मितीचे आश्वासन देण्यात आले. जिल्ह्यात पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या ही ६३ हजार ५६२ इतकी आहे. विशेष म्हणजे यातील ७० टक्के मतदार हे सुशिक्षित असले तरीही इतर मतदार हे  या ना त्या कारणाने मतदारसंघाबाहेर स्थलांतरीत झाले आहे. त्यात रोजगाराचे मुख्य कारण आहे. स्थलांतरीत मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आता आवश्यक ती वाहन व्यवस्था उमेदवारांकडून केली जात आहे. मतदारांची संख्या पाहून वाहन निश्चित केले जात आहे. त्याचवेळी काही उमेदवार मतदारांना आपण स्वत:हून यावे. आल्यानंतर जो काही खर्च झाला तो दिला जाईल, असे आश्वासनही दिले जात आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nandedनांदेडloha-acलोहाmukhed-acमुखेड