शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

माहूर तालुक्यातील पिके गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:13 IST

गेल्या दोन दिवसांपासून माहूर तालुक्यात पावसाने कहर केला आहे. ढगफुटीमुळे तालुक्यातील अपवाद वगळता १०० टक्के शेतातील पिके वाहून गेली. तर अनेक घरांची पडझड झाली आहे. काल दिवसभरात झालेल्या १८८ मिलि पावसाने नदी- नाले, काठावरील गावे, वाडी, तांडे, जलमय झाले होते. विदर्भ मराठवाड्याला जोडणारा राज्य मार्ग क्रमांक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील वाहतूक ही पैनगंगा नदीचा पूर ओरसल्याने हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : गेल्या दोन दिवसांपासून माहूर तालुक्यात पावसाने कहर केला आहे. ढगफुटीमुळे तालुक्यातील अपवाद वगळता १०० टक्के शेतातील पिके वाहून गेली. तर अनेक घरांची पडझड झाली आहे. काल दिवसभरात झालेल्या १८८ मिलि पावसाने नदी- नाले, काठावरील गावे, वाडी, तांडे, जलमय झाले होते. विदर्भ मराठवाड्याला जोडणारा राज्य मार्ग क्रमांक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील वाहतूक ही पैनगंगा नदीचा पूर ओरसल्याने हळूहळू पूर्वपदावर येत आहे.माहूर तालुक्यात १६ आॅगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. माहूर १९० (७००) मि़मी़, वाई बाजार २३२ (७५६) मिमी, वानोला १६३ (६००) मिमी, सिंदखेड १६७ (७२९) मिमी पाऊस पडला. या पावसाची सरासरी १८८ मिमी एवढी आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. या मुसळधार पावसामुळे तालुक्यात नागरिकांची शेती, घरे क्षतिग्रस्त झाली. कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी कोट्यवधी रुपयांचा पिकांचा तर घरातील संसारोपयोगी साहित्य आणि घराची पडझड यात लाखोंचे नुकसान झाले आहे.माहूर शहरातील सखल भागातील शेकडो घरांत पाणी शिरल्याने नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, मुख्याधिकारी विद्या कदम, उपनगर अध्यक्ष राजकुमार भोपी, नगरसेवक इलियास बावानी, वनिता जोगदंड, रफिक सौदागर, अजीज भाई, शीतल जाधव, कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी आणि न.पं.ची टीम पडझड झालेल्या प्रत्येक घराची पाहणी केली. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाच्या वतीने तालुकाभर सर्व्हे सुरू झाला आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपाची तीन दिवसांत व इतर नुकसानीची संपूर्ण मदत तातडीने देण्यात येईल, अशी माहिती आ. प्रदीप नाईक यांनी दिली. यावेळी जि.प.उपाध्यक्ष समाधान जाधव, उपविभागीय महसूल अधिकारी शक्ती कदम, तहसीलदार विक्रम राजपूत आदी उपस्थित होते.@गुरुवारी दुपारी तीन वाजेपासून धनोडा येथील पैनगंगा पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पुलावरील पाण्याची पातळी रात्री २ च्या सुमारास कमी झाली व पुलावरून वाहतूक पहाटे ६ वाजेपासून हळूहळू सुरू झाली. पुरामुळे पुलावरील सर्व कठडे तुटले असून काही रेलिंग वाहून गेले आहे.महागाव सा.बां. उपविभाग यांना सूचित करण्यात आले व त्याअनुषंगाने कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती साबां विभागाचे अभियंता रवींद्र उमाडे, आकाश राठोड यांनी दिली.अतिवृष्टीग्रस्त वानोळा परिसराची पाहणी१६ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे व नाल्याच्या पुरामुळे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. त्याची प्रत्यक्ष पाहणी आ.प्रदीप नाईक यांनी करुन दूरध्वनीसंदेश व तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या आदेशानुसार माहूर तालुक्यातील वानोळासह परिसरातील पाचोंदा, पानोळा, मेंडकी , मुंगशी, रामपूर गावांतील शेतशिवाराची पाहणी तलाठी डी. व्ही.पेंटेवाड , सागर हिवाळे यांनी केली. यावेळी माजी जि.प.सदस्य दत्तराम राठोड, सरपंच डॉ.रविकुमार मेंडके , उपसरपंच सुरेश राठोड, माजी उपसरपंच अभिजित राठोड , अनिल तोडसाम, किशोर पवार, आनंदराव कुडमेते, पंडित धुप्पे, रविकुमार आडे,पत्रकार अ‍ॅड.नितेश बनसोडे उपस्थित होते .

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसFarmerशेतकरी