शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भिजलेला गहू स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:29 IST

गरिबांसाठी असलेल्या स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यासाठी आलेला जवळपास ३ हजार ३०० मेट्रीक टन गहू भिजलेल्या अवस्थेत केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात दाखल झाला असून हा गहू आता स्वस्त धान्य दुकानाकडे रवाना होत आहे. स्वस्त धान्य दुकान लाभार्थ्यांच्या माथी हा गहू मारला जाणार आहे.

ठळक मुद्दे‘खापरा’चेही प्रमाण केंद्रीय वखारमधून तालुकास्तरीय गोदामाकडे गव्हाची वाहतूक

नांदेड : गरिबांसाठी असलेल्या स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यासाठी आलेला जवळपास ३ हजार ३०० मेट्रीक टन गहू भिजलेल्या अवस्थेत केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात दाखल झाला असून हा गहू आता स्वस्त धान्य दुकानाकडे रवाना होत आहे. स्वस्त धान्य दुकान लाभार्थ्यांच्या माथी हा गहू मारला जाणार आहे.जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानासाठी प्रतिमाह जवळपास ८ हजार मेट्रीक टन गहू आवश्यक आहे. आवश्यक असलेला हा गहू प्राप्त झाला असून १५, १६, १७ जून रोजी हा गहू तुप्पा येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात दाखल झाला आहे. विशेष पॉलीश नसलेला गहू आणि १६ टक्क्याहून अधिक आर्द्रता असलेला हा गहू लाभार्थ्यांना वाटप केला जाणार आहे.कृष्णूर धान्य घोटाळ्यापासून संपूर्ण स्वस्त धान्य वितरीत करणारी यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कृष्णूर धान्य घोटाळ्याच्या प्रकरणात आता अधिकारीही रडारवर आले आहेत. स्वस्त धान्याची वाहतूक करणारा कंत्राटदारही आज तुरुंगात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानातून वितरीत होणारे धान्य चांगल्या प्रतिचे आहे की नाही? याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसत आहेत.पंजाबहून आलेला हा गहू उघड्यावरील असल्याचे स्पष्ट होत आहे. सदर गहू भारतीय खाद्यान्न महामंडळामार्फत केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात आला आहे. हा गहू आता तालुकास्तरावरील शासकीय गोदामात पोहचविला जात आहे. त्यानंतर तो स्वस्त धान्य दुकानात आणि पुढे तो लाभार्थ्यांना वितरीत केला जातो.गव्हाची साधारण आर्द्रता ११ टक्के असावी. मात्र केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात आलेल्या गव्हामध्ये १६ ते १७ टक्याहून अधिक आर्द्रता आहे. या गव्हाला पॉलीशही नसल्याचे दिसत आहे. त्याचवेळी गव्हाचे काही वेळातच पिठ करणाºया खापरा किडीचे प्रमाणही अधिक दिसत आहे.विशेष म्हणजे हा गहू केंद्रीय वखार महामंडळाने स्विकारला असल्याचे त्याचे वितरणही सुरू झाले आहे. गव्हाप्रमाणे स्वस्त धान्य दुकानामध्ये वितरीत करण्यासाठी आलला तांदूळही रिसायकल प्रक्रियेतून आला आहे. यासाठी वापरण्यात आलेले बारदानेही जुनेच आहेत. तांदळातील तुकडीचे प्रमाण २९ टक्के ग्राह्य असते. पण जवळपास ४५ टक्के तुकडीचे असलेला तांदुळ केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामातून वितरीत होत आहे.

केंद्रीय वखार महामंडळात प्राप्त झालेला हा गहू पंजाब येथून आलेला आहे. सदर गव्हाचा दर्जा चांगला आहे. हा गहू तालुकास्तरावर आता वितरीत केला जाणार आहे. भारतीय खाद्यान्न महामंडळाकडून चांगला गहू आला आहे.- सी.के.दत्ताव्यवस्थापक, केंद्रीय वखार महामंडळ, नांदेड

टॅग्स :NandedनांदेडagricultureशेतीSocialसामाजिक