शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

भिजलेला गहू स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:29 IST

गरिबांसाठी असलेल्या स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यासाठी आलेला जवळपास ३ हजार ३०० मेट्रीक टन गहू भिजलेल्या अवस्थेत केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात दाखल झाला असून हा गहू आता स्वस्त धान्य दुकानाकडे रवाना होत आहे. स्वस्त धान्य दुकान लाभार्थ्यांच्या माथी हा गहू मारला जाणार आहे.

ठळक मुद्दे‘खापरा’चेही प्रमाण केंद्रीय वखारमधून तालुकास्तरीय गोदामाकडे गव्हाची वाहतूक

नांदेड : गरिबांसाठी असलेल्या स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यासाठी आलेला जवळपास ३ हजार ३०० मेट्रीक टन गहू भिजलेल्या अवस्थेत केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात दाखल झाला असून हा गहू आता स्वस्त धान्य दुकानाकडे रवाना होत आहे. स्वस्त धान्य दुकान लाभार्थ्यांच्या माथी हा गहू मारला जाणार आहे.जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानासाठी प्रतिमाह जवळपास ८ हजार मेट्रीक टन गहू आवश्यक आहे. आवश्यक असलेला हा गहू प्राप्त झाला असून १५, १६, १७ जून रोजी हा गहू तुप्पा येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात दाखल झाला आहे. विशेष पॉलीश नसलेला गहू आणि १६ टक्क्याहून अधिक आर्द्रता असलेला हा गहू लाभार्थ्यांना वाटप केला जाणार आहे.कृष्णूर धान्य घोटाळ्यापासून संपूर्ण स्वस्त धान्य वितरीत करणारी यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कृष्णूर धान्य घोटाळ्याच्या प्रकरणात आता अधिकारीही रडारवर आले आहेत. स्वस्त धान्याची वाहतूक करणारा कंत्राटदारही आज तुरुंगात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानातून वितरीत होणारे धान्य चांगल्या प्रतिचे आहे की नाही? याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसत आहेत.पंजाबहून आलेला हा गहू उघड्यावरील असल्याचे स्पष्ट होत आहे. सदर गहू भारतीय खाद्यान्न महामंडळामार्फत केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात आला आहे. हा गहू आता तालुकास्तरावरील शासकीय गोदामात पोहचविला जात आहे. त्यानंतर तो स्वस्त धान्य दुकानात आणि पुढे तो लाभार्थ्यांना वितरीत केला जातो.गव्हाची साधारण आर्द्रता ११ टक्के असावी. मात्र केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात आलेल्या गव्हामध्ये १६ ते १७ टक्याहून अधिक आर्द्रता आहे. या गव्हाला पॉलीशही नसल्याचे दिसत आहे. त्याचवेळी गव्हाचे काही वेळातच पिठ करणाºया खापरा किडीचे प्रमाणही अधिक दिसत आहे.विशेष म्हणजे हा गहू केंद्रीय वखार महामंडळाने स्विकारला असल्याचे त्याचे वितरणही सुरू झाले आहे. गव्हाप्रमाणे स्वस्त धान्य दुकानामध्ये वितरीत करण्यासाठी आलला तांदूळही रिसायकल प्रक्रियेतून आला आहे. यासाठी वापरण्यात आलेले बारदानेही जुनेच आहेत. तांदळातील तुकडीचे प्रमाण २९ टक्के ग्राह्य असते. पण जवळपास ४५ टक्के तुकडीचे असलेला तांदुळ केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामातून वितरीत होत आहे.

केंद्रीय वखार महामंडळात प्राप्त झालेला हा गहू पंजाब येथून आलेला आहे. सदर गव्हाचा दर्जा चांगला आहे. हा गहू तालुकास्तरावर आता वितरीत केला जाणार आहे. भारतीय खाद्यान्न महामंडळाकडून चांगला गहू आला आहे.- सी.के.दत्ताव्यवस्थापक, केंद्रीय वखार महामंडळ, नांदेड

टॅग्स :NandedनांदेडagricultureशेतीSocialसामाजिक