शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

"चुलीत गेले नेते अन् चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष्य"; नांदेड जिल्ह्यात फलक लावून पुढाऱ्यांना गावबंदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 18:38 IST

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मूकमोर्चा, ठोकमोर्चा, राज्य बंद अशा आंदोलनांनंतर आता पुढाऱ्यांना गावबंदचे अस्त्र उपसण्यात आले आहे.

नांदेड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मूकमोर्चा, ठोकमोर्चा, राज्य बंद अशा आंदोलनांनंतर आता पुढाऱ्यांना गावबंदचे अस्त्र उपसण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील सहा गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी करीत वेशीवर  ‘चुलीत गेले नेते अन् चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष्य’ असे फलक लावले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पुढाऱ्यांची गोची झाली आहे. 

मराठा समाजाचे आरक्षणासाठीचे आंदोलन गेल्या काही महिन्यांत तीव्र झाले होते़ त्यासाठी अनेकांनी आत्महत्या केल्या़ आत्महत्यांचे हे सत्र अद्यापही सुरुच आहे़ परंतु, अद्यापही समाजाला आरक्षण मिळाले नाही़ त्यामुळे संतप्त झालेल्या हदगाव तालुक्यातील रुई, उंचेगाव, महातळा, पेवा आणि धानोरा या पाच ग्रामपंचायतींनी सर्व ग्रामस्थांच्या संमतीने मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे़ पुढाऱ्यांनी आपली मानमर्यादा ओळखून गावात प्रवेश करावा, असा इशाराही या गावकऱ्यांनी दिला आहे. या प्रत्येक गावाच्या वेशीवर लावलेले फलक सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय झाले आहेत. तसेच राज्यातील इतर ग्रामपंचायतींनीही अशा प्रकारचा ठराव घेवून आरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ या चार गावांनंतर नांदेड तालुक्यातील चिखली या गावीदेखील असा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात सुरु झालेले हे लोण आता राज्यभर पोहोचण्याची शक्यता आहे़. 

दोन ग्रामपंचायतींनी घेतला ठराव मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गावात पुढाऱ्यांना बंदी करण्याचा ठराव उंचेगाव आणि पेवा ग्रामपंचायतीने घेतला आहे.  पुढाऱ्यांनी आता विचार करुनच गावात पाऊल ठेवावे असा इशारा उंचेगावचे सरपंच पंजाबराव शिंदे यांनी दिला आहे़ पेवा येथे सरपंच अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष ग्रामसभेत आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याच पक्षाच्या पुढाऱ्यांना गावात प्रवेश करू द्यायचा नाही, असा एकमताने ठराव घेण्यात आला़ ठरावाचे सूचक अनिल जाधव, तर अनुमोदन धनंजय जाधव यांनी दिले़  

चिखलीत तरूणांचा पुढाकारगावातील तरुणांच्या पुढाकारातून गावात फलक लावण्यात आल्याची माहिती चिखलीतील प्रभाकर शेजुळे यांनी दिली़  

आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरुच ठेवणार  मराठा समाजाने आतापर्यंत आरक्षणासाठी अनेक मोर्चे काढले़ बंद पाळले़ परंतु, आरक्षण मिळाले नाही़ आता पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे़ पुढाऱ्यांनीही मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत गावात पाय ठेवू नये. - अनिल कदम, कैलाश कदम, रूई, ता. हदगाव

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNandedनांदेडState Governmentराज्य सरकार